शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

खोडमाशीपासून सोयाबीन जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:06 IST

मराठवाड्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून गतवर्षी चक्रीभुंगा व खोडमाशीने या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा सुरुवातीपासूनच कीड व्यवस्थापन करण्याचे उपाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठवाड्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून गतवर्षी चक्रीभुंगा व खोडमाशीने या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा सुरुवातीपासूनच कीड व्यवस्थापन करण्याचे उपाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविले आहेत.जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सव्वा दोन लाख हेक्टरच्या आसपास असते. या पिकाची उगवण झाल्यावर लगेच खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर बीजदल पोखरते. नंतर ती मुख्य खोडामध्ये शिरते. त्यामुळे अशी रोपे कोमेजतात व वाळून जातात. पीक मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. तर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत आढळतो. अळी पानाचे देठ, खोड पोखरून आत शिरते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त भाग सुकून जातो. या दोन्हींचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. तर किडी खोडामध्ये राहात असल्याने व्यवस्थापन करणे अवघड जाते. त्यामुळे आता पेरणीपासूनच काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यात शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावा. सोयाबीन पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपायला हवी. सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवायला हवे. प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या आतील किडीसह नष्ट कराव्यात, पेरणी करताना जमिनीमध्ये फोरेट १0 टक्के सीजी हे १0 किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे जमिनीत मिसळावे, किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ट्रायझोफॉस ४0 ईसी १२ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली याची फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक व्ही.डी. लोखंडे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी