शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन अनुदानाचा गुंता सुटला; मुख्यमंत्र्यांच्या पणन संचालकांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 18:14 IST

खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले होते. या शेतकर्‍यांना अनुदान मिळवून देण्याची कार्यवाही शासन पातळीवर सुरू झाली आहे. अनुदानापासून वंचित शेतकर्‍यांची तपासणी करून अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना खुद्द मुख्यमंत्र्यांनी पणन संचालकांना दिल्याने या शेतकर्‍यांचा अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देजवळपास ६ हजार शेतकरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केल्याने अनुदानापासून वंचित होती अनुदानापासून वंचित शेतकर्‍यांची तपासणी करून अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना खुद्द मुख्यमंत्र्यांनी पणन संचालकांना दिल्या

सेनगाव ( हिंगोली ): खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले होते. या शेतकर्‍यांना अनुदान मिळवून देण्याची कार्यवाही शासन पातळीवर सुरू झाली आहे. अनुदानापासून वंचित शेतकर्‍यांची तपासणी करून अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना खुद्द मुख्यमंत्र्यांनी पणन संचालकांना दिल्याने या शेतकर्‍यांचा अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गतवर्षी शासनाने सोयाबीनच्या भावातील फरकापोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १७ हजार ५११ शेतकरी अनुदानास पात्र ठरले होते. या शेतकर्‍यांना एकूण २ लाख ८३ हजार ५६१ क्विंटल सोयाबीनकरिता ५ कोटी ६७ लाख १२ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी उपलब्ध झाला असून शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाला आहे. असे असताना सेनगाव येथे संत नामदेव खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री करणारे ४ हजार ६६२ तर हिंगोली येथील आदर्श खाजगी बाजार समितीतील १२८० शेतकर्‍यांना या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले होते.

जवळपास ६ हजार शेतकरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केल्याने अनुदानापासून वंचित राहिल्याने या संबंधी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून खास बाब म्हणून या शेतकर्‍यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन दिले होते. तसेच आ. रामराव वडकुते यांनी विधान परिषदमध्येही यासंबंधी तारांकित प्रश्न उपस्थित करून या दोन्ही बाजार समितीतील वंचित शेतकर्‍यांना अनुदान देण्याची मागणी केली होती. या दोन्ही आमदारांच्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन संचालक यांना सूचना देवून या संबंधी तपासणी करून कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनुदानापासून वंचित शेतकर्‍यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली