शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काही भागांत कामे सुरू; मजूरांचा मात्र पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:50 IST

रोहयोची मजूर उपस्थिती ६४ हजारांवर; दुष्काळ!

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन महिन्यांत हळूहळू वाढत चाललेली साप्ताहिक मजूर उपस्थिती शेवटच्या टप्प्यात ६४ हजारांवर पोहोचली. यामुळे दररोज किमान सहा हजार मजूर रोहयोच्या कामांवर येत असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीत याचा मजुरांना दिलासा मिळत आहे. मात्र काही भागात मजुरांविनाच ही कामे सुरू असल्याचेही चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात विदारक दुष्काळी चित्र आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात दिवाळीनंतर अनेक भागात मजुरांकडून कामांची मागणी होताना दिसत होती. वाट पाहून थकलेल्या मजुरांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला. तशाही जिल्ह्यातील काही भागातील ऊसतोड कामगारांच्या टोळ्या दरवर्षीच स्थलांतर करतात. मोठ्या शहरात बांधकामावर काम करणारे मजूर अधून-मधूनच गावाकडे हजेरी लावतात. यंदा दुष्काळामुळे शेतमजुरांसह शेतकऱ्यांनाही एकतर रोहयोचे काम अथवा स्थलांतर असे दोनच पर्याय होते. मात्र रोहयोचे काम सुरू नसल्याने अनेकांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला. तर काहींनी गावातच राहून प्रतीक्षा केली. अशांना आता रोहयोच्या कामावर गावातच मजुरी मिळत आहे. या कामांची संख्याही आता वाढत चालली आहे. ग्रामपंचायतींनी कामांचा हजाराचा आकडा ओलांडला आहे. सेनगाव तालुक्यात सर्वाधिक ३0९ कामांवर २१ हजार साप्ताहिक मजूर उपस्थिती आहे. तर औंढ्यात सर्वांत कमी २४१५ मजुरांची उपस्थिती आहे. यंत्रणांच्या कामांची संख्याही वाढली आहे. यंत्रणांनी २३६ कामे सुरू केली असून ६३२0 मजुरांची उपस्थिती आहे. एकूण साप्ताहिक मजूर उपस्थिती ६४ हजार ८0२ च्या घरात पोहोचली आहे.जिल्ह्यात काही भागात विदारक दुष्काळी चित्र निर्माण झाल्याने मात्र अख्खे गावेच कामाच्या शोधात स्थलांतरीत झाले. विशेष म्हणजे मजूरवर्गाला हाताला काम मिळत नसल्याने दिवाळीनंतर स्थलांतराचे प्रमाण वाढले होते. ऊसतोडीसाठी तसेच वीटाच्या कारखान्यांवर मजूर कामासाठी गेले. यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे बळीराजा हतबल झाला. शेतीत मजूरी करणाºयांचे हाल होत आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्थलांतर झाले. सध्या रोहयोच्या कामांमुळे मजूरांना दिलासा मिळाला.काही भागात मात्र कामे सुरू असली तरीही त्यावर मजुरांचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. गावात मजूर उपलब्ध असताना त्यांनाही काम दिले जात नसून कामे मात्र होत आहेत. काही ठिकाणी बाहेरून मजूर आणण्याचा फार्सही होत आहे. ही कामे करताना स्थानिक कामगारांना कामे मिळण्यासाठीही तेवढेच दक्ष राहण्याची काळजी यंत्रणांनी घेण्याची गरज आहे. मजुरांच्या कामाच्या मागणीची चाचपणी तरी निदान होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागwater shortageपाणीटंचाई