शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

काही भागांत कामे सुरू; मजूरांचा मात्र पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:50 IST

रोहयोची मजूर उपस्थिती ६४ हजारांवर; दुष्काळ!

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन महिन्यांत हळूहळू वाढत चाललेली साप्ताहिक मजूर उपस्थिती शेवटच्या टप्प्यात ६४ हजारांवर पोहोचली. यामुळे दररोज किमान सहा हजार मजूर रोहयोच्या कामांवर येत असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीत याचा मजुरांना दिलासा मिळत आहे. मात्र काही भागात मजुरांविनाच ही कामे सुरू असल्याचेही चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात विदारक दुष्काळी चित्र आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात दिवाळीनंतर अनेक भागात मजुरांकडून कामांची मागणी होताना दिसत होती. वाट पाहून थकलेल्या मजुरांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला. तशाही जिल्ह्यातील काही भागातील ऊसतोड कामगारांच्या टोळ्या दरवर्षीच स्थलांतर करतात. मोठ्या शहरात बांधकामावर काम करणारे मजूर अधून-मधूनच गावाकडे हजेरी लावतात. यंदा दुष्काळामुळे शेतमजुरांसह शेतकऱ्यांनाही एकतर रोहयोचे काम अथवा स्थलांतर असे दोनच पर्याय होते. मात्र रोहयोचे काम सुरू नसल्याने अनेकांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला. तर काहींनी गावातच राहून प्रतीक्षा केली. अशांना आता रोहयोच्या कामावर गावातच मजुरी मिळत आहे. या कामांची संख्याही आता वाढत चालली आहे. ग्रामपंचायतींनी कामांचा हजाराचा आकडा ओलांडला आहे. सेनगाव तालुक्यात सर्वाधिक ३0९ कामांवर २१ हजार साप्ताहिक मजूर उपस्थिती आहे. तर औंढ्यात सर्वांत कमी २४१५ मजुरांची उपस्थिती आहे. यंत्रणांच्या कामांची संख्याही वाढली आहे. यंत्रणांनी २३६ कामे सुरू केली असून ६३२0 मजुरांची उपस्थिती आहे. एकूण साप्ताहिक मजूर उपस्थिती ६४ हजार ८0२ च्या घरात पोहोचली आहे.जिल्ह्यात काही भागात विदारक दुष्काळी चित्र निर्माण झाल्याने मात्र अख्खे गावेच कामाच्या शोधात स्थलांतरीत झाले. विशेष म्हणजे मजूरवर्गाला हाताला काम मिळत नसल्याने दिवाळीनंतर स्थलांतराचे प्रमाण वाढले होते. ऊसतोडीसाठी तसेच वीटाच्या कारखान्यांवर मजूर कामासाठी गेले. यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे बळीराजा हतबल झाला. शेतीत मजूरी करणाºयांचे हाल होत आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्थलांतर झाले. सध्या रोहयोच्या कामांमुळे मजूरांना दिलासा मिळाला.काही भागात मात्र कामे सुरू असली तरीही त्यावर मजुरांचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. गावात मजूर उपलब्ध असताना त्यांनाही काम दिले जात नसून कामे मात्र होत आहेत. काही ठिकाणी बाहेरून मजूर आणण्याचा फार्सही होत आहे. ही कामे करताना स्थानिक कामगारांना कामे मिळण्यासाठीही तेवढेच दक्ष राहण्याची काळजी यंत्रणांनी घेण्याची गरज आहे. मजुरांच्या कामाच्या मागणीची चाचपणी तरी निदान होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागwater shortageपाणीटंचाई