शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सेवा देताना सामाजिक बांधिलकी जोपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:40 IST

नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे असून, प्रशासकीय कामे पार पाडतांना जबाबदारीचे भान जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी केले.     

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे असून, प्रशासकीय कामे पार पाडतांना जबाबदारीचे भान जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी केले.                  जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित नागरी सेवा दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर आदी उपस्थित होते.  राज्याच्या, देशाच्या विकासात प्रशासकीय यंत्रणेचे मोठे योगदान आहे. दैनंदिन प्रशासकीय कामकाज पार पाडतांना मानवी आस्था जपणे खुप आवश्यक आहे. उदारीकरणाच्या धोरण स्विकारल्यानंतर नागरी विकासाच्या अनुषंगाने प्रशासनाचे स्वरुपही बदलले आहे. लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाही बदलली. शिक्षण आणि नागरिकांना झालेल्या अधिकारांची जाणीव यामुळे परस्थिती बदलली आहे. यापुढे प्रशासनातील विविध घटकांना नागरिकांना सेवा देण्याचे दायित्त्व स्विकारावेच लागणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी मनीयार यांनी सांगितले. ग्राम स्वराज्य योजना आणि ग्राम विकास परिवर्तत अभियान बाबतही त्यांनी माहिती दिली.उपजिल्हाधिकारी बोरगावकर म्हणाले २१ एप्रिल १९४७ रोजी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीच्या मेटकाफ हाऊस येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या तुकडीतील अधिकाऱ्यांना संबोधित केले होते. त्यानिमित्त नागरी सेवा दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. नव्या भारताची उभारणी हे या दिनाचे घोषवाक्य होय. नागरिकांच्या सनदीनुसार नागरीक हा राजा आहे. त्यांच्यासाठीच आपण सर्वजण प्रशासकीय सेवेत काम करीत आहोत. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाºयांनी कर्तव्याची जाणीव ठेऊन या दिनाचा मुख्य उद्देश समजून घ्यावा असे त्यांनी सांगितले. तसेच शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शिवाय जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब अपेक्षित आहेत असेही बोरगावर म्हणाले.कार्यालयीन वेळेबाबत कर्मचारी अनभिज्ञ४अनेक शासकीय कर्मचाºयांना कार्यालयीन वेळ देखील माहिती नाही. शासकीय कर्मचारी यांची कार्यालयीन वेळ ही सकाळी ९.४५ असून, सदर कर्मचारी ९.५५ नंतर कार्यालयात आल्यास त्यास लेट मस्टर मध्ये स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. तसेच ३ वेळेस उशीरा आल्यास १ दिवसाची किरकोळ रजा घेणे हा नियम आहे. परंतू याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. प्रशासकीय यंत्रणेवर अनेक महत्वाची सेवा पुरविण्याचे कामे सोपविण्यात आले असून या सेवा नागरिकांना देण्यासाठी कालमयार्दा निश्चित केलेली आहे. त्याकरीता प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली कामे अचूक व वेळत पार पाडण्याचा प्रयत्न करावा असेही बोरगावकर म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली