शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सहा संचालकांचे राजीनामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:36 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ९ संचालकानी १६ आॅगस्ट ला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकांचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ. निळंकठ गडदे यांनी मंजूर केले. उर्वरित तिन संचालकांचे राजीनामे मंजूरीची प्रक्रिया करण्यासाठी प्रंलबीत ठेवले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ९ संचालकानी १६ आॅगस्ट ला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकांचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ. निळंकठ गडदे यांनी मंजूर केले. उर्वरित तिन संचालकांचे राजीनामे मंजूरीची प्रक्रिया करण्यासाठी प्रंलबीत ठेवले आहेत. सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सध्या अस्तिवात आलेले संचालक मंडळ तिन वषार्पूर्वी झालेल्या निवडणूकीच्या माध्यमातून सत्तेवर आले.लोकशाही मार्गाने आलेल्या या सत्तेची सुत्रे बाजार समितीच्या विकासासाठी भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे व माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर गटाकडे मतदारांनी सोपवली; पंरतु या दोन गटाचा युती मधील सत्तेची तडजोड अन् विरोधी गटाने सत्ताधारी संचालकाविरोधात अपात्रेतेची दाखल केलेली प्रकरणे त्यावर झालेली कारवाई यामुळे तीन वर्षात बाजार समितीच्या राजकारणातील सघंर्ष टोकाला गेला आहे. शेतकरी हिताचे बाजार समिती ,विकासाचे निर्णय कमी झाले. त्याउलट सत्तेचा सारीपाटच तीन वर्षरंगत गेला. सत्तेच्या राजकारण सत्ताधारी संचालकानी त्याचा गटाच्याच सभापती डॉ. निळकंठ गडदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. सभापती गडदे यांनी विरोधी संचालकाची मदत घेवून हा ठराव बारगळवला. अशा परिस्थितीत सत्ताधारी संचालकानी सामूहिक राजीनामे दिले असून बाजार समिती चे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे राजकीय गणित माडले आहे. या राजकीय डावात आ. मुटकुळे यांनी स्व:तहा उडी घेतली. माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर हे मात्र दोन्ही बाजूंनी काँग्रेसचेच संचालक असल्याने घडामोडीत अलिप्त राहिले आहेत.आगामी काळात सत्तेचे राजकारण कोणत्या वळणावर जाणार हे पहावे लागणार आहे. असे असले तरी या राजकारणात बाजार समिती हिताचे कोणत्याच गटाला काही देणे घेणे नसून राजकारणासाठी आर्थिक नाडी मजबूत करणाऱ्या सेनगाव बाजार समितीच्या कारभाराचे शेतकरी हिताच्या धोरणांचे राजकारणाने मात्र कंबरडे मोडले आहे. राजीनामे देवून प्रशासकीय संचालक मंडळ आणण्याचा डाव भाजपचा गटाचे यशस्वी होतात का? सभापती गडदे हे सत्ता आणि पद कसे राखतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.९ संचालकांचे १६ आॅगस्ट रोजी राजीनामे९ संचालकानी १६ आॅगस्टला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकाचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ.निळकंठ गडदे यांनी मंजूर केले. यामध्ये अमोल चंद्रकांत हराळ, शिक्षण सभापती संजय देशमुख, माजी सभापती शंकरराव बोरुडे, कांतराव कोटकर, गोदावरी शिंदे, द्वारकदास सारडा आदी सहा संचालकाचे राजीनामे मंजूर केले. संचालक गोपाळराव देशमुख, गिरीधारी तोष्णीवाल, सुमित्रा नरवाडे या तीन संचालकांचे राजीनामे प्रलंबित ठेवले आहेत. या तीन्ही संचालकांचे राजीनामे संबंधी कार्यलयीन प्रकीयेत बाकी असल्याने ते मंजूर झाले नाहीत, असे सभापती गडदे यांनी सांगितले. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाची संख्या दहावर येवून ठेपली आहे. एकुण १८ संचालकीय बाजार समितीमध्ये यापूर्वी एक रिक्त, एक मयत असे सोळा संचालक होते. सहा संचालकानी राजीनामे दिल्याने दहा संचालक कार्यरत राहिले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड