शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

जिल्ह्यातील ८६ गावांमध्ये ४४२ शेतकऱ्यांना रेशीम संजिवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

हिंगोली : जिल्ह्यातील एकूण ८६ गावांमध्ये ४४२ शेतकरी ४५६ एकरमध्ये यशस्वीपणे रेशीम शेती करीत आहेत, अशी माहिती जिल्हा रेशीम ...

हिंगोली : जिल्ह्यातील एकूण ८६ गावांमध्ये ४४२ शेतकरी ४५६ एकरमध्ये यशस्वीपणे रेशीम शेती करीत आहेत, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी दिली.

सद्यस्थितीत शासनाच्या आयएसडीएस, आयआरकेव्हीवाय, नादेकृसंप्र मनरेगा या प्रमुख योजनांच्या अनुदानाचा लाभ रेशीम शेतकरी घेत आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये म्हणजे ३१ मार्च २०२१ अखेर जिल्ह्यातील २६८ शेतकऱ्यांनी ८५ हजार ४०० अंडीपुजांचे यशस्वीपणे संगोपन करून ४५ हजार ४१० किलोग्रॅम कोष उत्पादन घेतले असून, त्यातून १ कोटी ३६ लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

मागील आर्थिक वर्षामध्ये ‘आयएसडीएसआय’ या अनुदानाच्या योजनेमधून लाभार्थ्यांना ४७ लाख ३८ हजार ५३१ रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘मनरेगा’ या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही जिल्हा रेशीम विकास कार्यालयाने सांगितले. कोरोना महामारीच्या परिस्थितीत ‘मनरेगा’तून ४२ हजार ४६२ मनुष्य दिवसांची निर्मिती करून मजुरी म्हणून १ कोटी १० लाख ६० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. सन २०२१ - २२ या चालू वर्षात हिंगोली जिल्ह्यातील २३ गावांमधील ३१२ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी केली आहे.

रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा

गत काही दिवसांपासून कोरोना ओसरत चालला आहे. रेशीम शेती करण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास किंवा काही सल्ला हवा असल्यास जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, म्हणजे रेशीम शेतीबाबत माहिती देता येईल, पर्यायाने शंकांचे निरसन होईल.