शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

जिल्ह्यातील ८६ गावांमध्ये ४४२ शेतकऱ्यांना रेशीम संजिवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

हिंगोली : जिल्ह्यातील एकूण ८६ गावांमध्ये ४४२ शेतकरी ४५६ एकरमध्ये यशस्वीपणे रेशीम शेती करीत आहेत, अशी माहिती जिल्हा रेशीम ...

हिंगोली : जिल्ह्यातील एकूण ८६ गावांमध्ये ४४२ शेतकरी ४५६ एकरमध्ये यशस्वीपणे रेशीम शेती करीत आहेत, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी दिली.

सद्यस्थितीत शासनाच्या आयएसडीएस, आयआरकेव्हीवाय, नादेकृसंप्र मनरेगा या प्रमुख योजनांच्या अनुदानाचा लाभ रेशीम शेतकरी घेत आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये म्हणजे ३१ मार्च २०२१ अखेर जिल्ह्यातील २६८ शेतकऱ्यांनी ८५ हजार ४०० अंडीपुजांचे यशस्वीपणे संगोपन करून ४५ हजार ४१० किलोग्रॅम कोष उत्पादन घेतले असून, त्यातून १ कोटी ३६ लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

मागील आर्थिक वर्षामध्ये ‘आयएसडीएसआय’ या अनुदानाच्या योजनेमधून लाभार्थ्यांना ४७ लाख ३८ हजार ५३१ रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘मनरेगा’ या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही जिल्हा रेशीम विकास कार्यालयाने सांगितले. कोरोना महामारीच्या परिस्थितीत ‘मनरेगा’तून ४२ हजार ४६२ मनुष्य दिवसांची निर्मिती करून मजुरी म्हणून १ कोटी १० लाख ६० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. सन २०२१ - २२ या चालू वर्षात हिंगोली जिल्ह्यातील २३ गावांमधील ३१२ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी केली आहे.

रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा

गत काही दिवसांपासून कोरोना ओसरत चालला आहे. रेशीम शेती करण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास किंवा काही सल्ला हवा असल्यास जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, म्हणजे रेशीम शेतीबाबत माहिती देता येईल, पर्यायाने शंकांचे निरसन होईल.