शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

जिल्ह्यातील ८६ गावांमध्ये ४४२ शेतकऱ्यांना रेशीम संजिवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

हिंगोली : जिल्ह्यातील एकूण ८६ गावांमध्ये ४४२ शेतकरी ४५६ एकरमध्ये यशस्वीपणे रेशीम शेती करीत आहेत, अशी माहिती जिल्हा रेशीम ...

हिंगोली : जिल्ह्यातील एकूण ८६ गावांमध्ये ४४२ शेतकरी ४५६ एकरमध्ये यशस्वीपणे रेशीम शेती करीत आहेत, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी दिली.

सद्यस्थितीत शासनाच्या आयएसडीएस, आयआरकेव्हीवाय, नादेकृसंप्र मनरेगा या प्रमुख योजनांच्या अनुदानाचा लाभ रेशीम शेतकरी घेत आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये म्हणजे ३१ मार्च २०२१ अखेर जिल्ह्यातील २६८ शेतकऱ्यांनी ८५ हजार ४०० अंडीपुजांचे यशस्वीपणे संगोपन करून ४५ हजार ४१० किलोग्रॅम कोष उत्पादन घेतले असून, त्यातून १ कोटी ३६ लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

मागील आर्थिक वर्षामध्ये ‘आयएसडीएसआय’ या अनुदानाच्या योजनेमधून लाभार्थ्यांना ४७ लाख ३८ हजार ५३१ रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘मनरेगा’ या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही जिल्हा रेशीम विकास कार्यालयाने सांगितले. कोरोना महामारीच्या परिस्थितीत ‘मनरेगा’तून ४२ हजार ४६२ मनुष्य दिवसांची निर्मिती करून मजुरी म्हणून १ कोटी १० लाख ६० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. सन २०२१ - २२ या चालू वर्षात हिंगोली जिल्ह्यातील २३ गावांमधील ३१२ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी केली आहे.

रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा

गत काही दिवसांपासून कोरोना ओसरत चालला आहे. रेशीम शेती करण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास किंवा काही सल्ला हवा असल्यास जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, म्हणजे रेशीम शेतीबाबत माहिती देता येईल, पर्यायाने शंकांचे निरसन होईल.