शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दुकाने उघडणार; कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

हिंगोली : जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिलपासून संचारबंदीच्या नियमांत शिथिलता दिली असून, नियम व अटी पाळून दुकाने, आस्थापना उघडण्यास परवानगी ...

हिंगोली : जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिलपासून संचारबंदीच्या नियमांत शिथिलता दिली असून, नियम व अटी पाळून दुकाने, आस्थापना उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे, तर प्रत्येक आठवड्यात शुक्रवारी सायंकाळी ७ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ४ एप्रिल रोजी काढले आहेत.

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत संचारबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. संचारबंदीची मुदत संपली असून, ५ एप्रिलपासून संचारबंदीमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, यासाठी आस्थापना चालक, दुकानदार, व्यापारी, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे, तसेच दर १५ दिवसाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. या कालावधीत रात्रीची संचारबंदी मात्र कायम राहणार असून, शुक्रवारी सायंकाळी ७ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत कडक संचारबंदी असणार आहे.

संचारबंदी काळात केवळ औषधी दुकाने, अत्यावश्यक सेवा, तसेच परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजार, गावामध्ये, तसेच घराबाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

आजपासून सुरू राहणार

- कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी सेवा दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळात सुरू राहतील.

- भाजीपाला दुकाने, फळविक्री दुकाने, मांस, मच्छी, मटन विक्री दुकाने, दारू व बीअर विक्री दुकाने सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत उघडण्यास परवानगी. यात नगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच भाजीपाला दुकाने लावावी लागणार आहेत.

- मेडिकल दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ तर इतर दुकाने १० ते दुपारी ३ या कालावधीत उघडता येणार.

- बँका नागरिकांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहतील.

- एसटी बसला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. मात्र, शासकीय बसस्थानकाव्यतिरिक्त इतर कोठेही बस थांबविता येणार नाही.

-ऑटोरिक्षात चालकासह तिघे, जीप व त्या प्रकारातील वाहतुकीस चालकासह सहा जण, खाजगी कार वाहनात केवळ चालकासह चौघा प्रवाशांनाच वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे.

- दोनचाकी वाहनावर केवळ एका व्यक्तीस परवानगी असणार आहे.

- शासकीय कार्यालये पूर्णवेळ तर खाजगी कार्यालये सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल.

-लग्न व लग्नासंबंधित कार्यक्रमांना केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. मात्र, यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

- अंत्ययात्रेस केवळ २० व्यक्तींना परवानगी असेल. यासाठी कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही.

-रेस्टॉरंट, हॉटेल्स, बीअर, वाइन बार इत्यादींना केवळ ग्राहकांना पार्सल सुविधा देण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत उघडण्यास परवानगी असणार आहे.

यांना असणार प्रतिबंध

-शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, लॉन्स, मंगल कार्यालये, जलतरण तलाव

-धार्मिक, प्रार्थनास्थळे बंद राहणार

-धरणे, आंदोलने, प्रदर्शने आदींना बंदी