शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

आजपासून दुकाने उघडणार; कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

हिंगोली : जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिलपासून संचारबंदीच्या नियमांत शिथिलता दिली असून, नियम व अटी पाळून दुकाने, आस्थापना उघडण्यास परवानगी ...

हिंगोली : जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिलपासून संचारबंदीच्या नियमांत शिथिलता दिली असून, नियम व अटी पाळून दुकाने, आस्थापना उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे, तर प्रत्येक आठवड्यात शुक्रवारी सायंकाळी ७ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ४ एप्रिल रोजी काढले आहेत.

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत संचारबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. संचारबंदीची मुदत संपली असून, ५ एप्रिलपासून संचारबंदीमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, यासाठी आस्थापना चालक, दुकानदार, व्यापारी, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे, तसेच दर १५ दिवसाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. या कालावधीत रात्रीची संचारबंदी मात्र कायम राहणार असून, शुक्रवारी सायंकाळी ७ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत कडक संचारबंदी असणार आहे.

संचारबंदी काळात केवळ औषधी दुकाने, अत्यावश्यक सेवा, तसेच परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजार, गावामध्ये, तसेच घराबाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

आजपासून सुरू राहणार

- कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी सेवा दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळात सुरू राहतील.

- भाजीपाला दुकाने, फळविक्री दुकाने, मांस, मच्छी, मटन विक्री दुकाने, दारू व बीअर विक्री दुकाने सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत उघडण्यास परवानगी. यात नगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच भाजीपाला दुकाने लावावी लागणार आहेत.

- मेडिकल दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ तर इतर दुकाने १० ते दुपारी ३ या कालावधीत उघडता येणार.

- बँका नागरिकांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहतील.

- एसटी बसला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. मात्र, शासकीय बसस्थानकाव्यतिरिक्त इतर कोठेही बस थांबविता येणार नाही.

-ऑटोरिक्षात चालकासह तिघे, जीप व त्या प्रकारातील वाहतुकीस चालकासह सहा जण, खाजगी कार वाहनात केवळ चालकासह चौघा प्रवाशांनाच वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे.

- दोनचाकी वाहनावर केवळ एका व्यक्तीस परवानगी असणार आहे.

- शासकीय कार्यालये पूर्णवेळ तर खाजगी कार्यालये सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल.

-लग्न व लग्नासंबंधित कार्यक्रमांना केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. मात्र, यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

- अंत्ययात्रेस केवळ २० व्यक्तींना परवानगी असेल. यासाठी कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही.

-रेस्टॉरंट, हॉटेल्स, बीअर, वाइन बार इत्यादींना केवळ ग्राहकांना पार्सल सुविधा देण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत उघडण्यास परवानगी असणार आहे.

यांना असणार प्रतिबंध

-शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, लॉन्स, मंगल कार्यालये, जलतरण तलाव

-धार्मिक, प्रार्थनास्थळे बंद राहणार

-धरणे, आंदोलने, प्रदर्शने आदींना बंदी