शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

दुकाने तेवढी बंद, शहरभर फिरताहेत दुचाकीस्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीसह संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता प्रशासनाने हा उपाय केला ...

हिंगोली जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीसह संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता प्रशासनाने हा उपाय केला असला तरीही नागरिकांना मात्र त्याचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर दुचाकीस्वारांची तेवढीच गर्दी पहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाने इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक असा मुख्य बाजारपेठेचा भाग तेवढा कडक संचारबंदीत आणला आहे. इतरत्र मात्र संचारबंदी नसल्यासारखेच वातावरण आहे. काही ठिकाणी पोलिसांनी सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी वाद घालणारेही अनेकजण दिसून येत होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निदान दोन दिवस तरी नागरिकच कडक संचारबंदी पाळतील, असे वाटत होते. मात्र, त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे दुकाने बंद असल्याचे वरकरणी दिसत असले तरीही घरपोच सर्वच सुविधा मिळत आहेत. एकप्रकारे त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविता येत असल्याने त्यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारणही नाही. तरीही बाजारपेठेच्या रस्त्यांसह इतर रस्त्यांवर दुचाकीस्वारांची होणारी गर्दी नेमकी कशासाठी? हा प्रश्न आहे.

काहीजण तर पोलिसांनी विचारपूस करायला अडविले तरीही थांबायला तयार नाहीत. विचारपूस न करताच प्रसाद दिला तर तोही वादाचा विषय बनतो. आजही असे काही किरकोळ प्रकार घडले. मात्र, विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यावर जाताना त्रास सोसण्याची वेळ आली आहे.