शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दुकाने तेवढी बंद, शहरभर फिरताहेत दुचाकीस्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीसह संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता प्रशासनाने हा उपाय केला ...

हिंगोली जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीसह संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता प्रशासनाने हा उपाय केला असला तरीही नागरिकांना मात्र त्याचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर दुचाकीस्वारांची तेवढीच गर्दी पहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाने इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक असा मुख्य बाजारपेठेचा भाग तेवढा कडक संचारबंदीत आणला आहे. इतरत्र मात्र संचारबंदी नसल्यासारखेच वातावरण आहे. काही ठिकाणी पोलिसांनी सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी वाद घालणारेही अनेकजण दिसून येत होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निदान दोन दिवस तरी नागरिकच कडक संचारबंदी पाळतील, असे वाटत होते. मात्र, त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे दुकाने बंद असल्याचे वरकरणी दिसत असले तरीही घरपोच सर्वच सुविधा मिळत आहेत. एकप्रकारे त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविता येत असल्याने त्यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारणही नाही. तरीही बाजारपेठेच्या रस्त्यांसह इतर रस्त्यांवर दुचाकीस्वारांची होणारी गर्दी नेमकी कशासाठी? हा प्रश्न आहे.

काहीजण तर पोलिसांनी विचारपूस करायला अडविले तरीही थांबायला तयार नाहीत. विचारपूस न करताच प्रसाद दिला तर तोही वादाचा विषय बनतो. आजही असे काही किरकोळ प्रकार घडले. मात्र, विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यावर जाताना त्रास सोसण्याची वेळ आली आहे.