शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

मोफतच्या धान्यासाठीही चालान भरण्यासाठी दुकानदारांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

ज्या दुकानदारांनी यापूर्वी चालान भरून धान्य उचलले त्यांना पुढील चालानमध्ये तरी सूट द्यावी. तसेच सध्या ज्यांनी चालान भरले नाही, ...

ज्या दुकानदारांनी यापूर्वी चालान भरून धान्य उचलले त्यांना पुढील चालानमध्ये तरी सूट द्यावी. तसेच सध्या ज्यांनी चालान भरले नाही, त्यांना मोफत धान्याच्या लाभार्थींचे धान्य मोफतच पुरवावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत स्वस्त धान्य दुकानदार संघटेनेचे जिल्हाध्यक्ष भिकुलाल बाहेती म्हणाले, सगळीकडेच चालान भरून धान्य मिळाले असते तर कदाचित भविष्यात रक्कम परत मिळेल, या आशेने दुकानदार चालान भरायला तयार झाले असते. मात्र शेजारच्या जिल्ह्यातच चालान भरून घेतले जात नाही. त्यामुळे अनेक दुकानदार यावरून नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबत प्रशासनाकडे आम्ही मागणी करणार आहोत.

४३६० मे.टनाचे मासिक नियतन मंजूर

प्रधानमंत्री गरीब कल्याणचा अंत्याेदयचे १ लाख ३७ हजार ६८४, तर प्राधान्य कुटुंबातील ७ लाख ३४ हजार ९२ सदस्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी गहू २,५७६ तर तांदूळ १,७८४ मे.टन एवढे मासिक नियतन मंजूर झालेले आहे.

नियमित व मोफत दोन्हींचाही लाभ

मे व जून या दोन महिन्यांसाठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार वाटप त्या त्या महिन्यात करावे, तसेच गरीब कल्याणमधील मंजूर नियतनानुसार मोफत अन्नधान्याचे वाटप करावे, असे आदेशात म्हटले आहे. प्रत्येक क्षेत्रातील स्थलांतरितांनाही पोर्टेबिलिटी अंतर्गत अन्नधान्याचे वाटप करावे. जसे अंत्योदयमध्ये अन्नसुरक्षा योजनेत अनुज्ञेय असलेल्या ३५ किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर या शिधापत्रिकाधारकास सदस्यसंख्येनुसार प्रतिसदस्य ५ किलाे याप्रमाणे अन्नधान्य वितरित करायचे आहे. प्राधान्य कुटुंबांनाही असेच नियमितसह मोफतचा लाभ द्यावयाचा आहे.