शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
3
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
4
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
5
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
6
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
7
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
8
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
9
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
10
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
11
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
12
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
13
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
14
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब 
15
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
16
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न
17
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
18
मूळ पाकिस्तानी असलेला 'हा' वादग्रस्त क्रिकेटर निवृत्त; ऑस्ट्रेलिया टीममध्ये केले होते मोठे कांड
19
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
20
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पाण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 18:47 IST

सातेफळ येथील शेतात असलेल्या सामायिक विहिरीवरून पाणी घेण्यावरून वाद होता.

ठळक मुद्देया घटनेनंतर हे प्रकरण आपसात तडजोडीने मिटविण्याचाही प्रयत्न झाला.

वसमत : तालुक्यातील सातेफळ येथे सामायिक विहिरीवरून भिजवणीसाठी पाणी घेण्याच्या वादातून २२ नोव्हेंबर रोजी खून झाला. याप्रकरणी २५ नोव्हेंबरला हट्टा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन आरोपींना अटक झाली असून न्यायालयाने आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातेफळ येथील शेतात असलेल्या सामायिक विहिरीवरून पाणी घेण्यावरून वाद होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर २२ नोव्हेंबर रोजी मोटर लावून भिजवण करत असलेल्या शेतकरी पंजाब व्यंकटराव अंभोरे (वय ३२) यांच्या डोक्यात लाकडाने मारून ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर हे प्रकरण आपसात तडजोडीने मिटविण्याचाही प्रयत्न झाला.

अडीच एकर शेतजमिनीची रजिस्ट्री करून देण्यावर तडजोडीची चर्चाही होती. त्यातून खून प्रकरणाची तक्रार हट्टा ठाण्यात दोन दिवस देण्यात आली नाही. तडजोडीच्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर २५ रोजी हट्टा ठाण्यात खून प्रकरणाची तक्रार देण्यात आली. मयताची पत्नी विद्या पंजाब अंभोरेच्या तक्रारीवरून आदिनाथ अंभोरे, श्रीधर अंभोरे या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. त्यांना न्यायालयासमाेर उभे केले असता, २९ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सामायिक विहिरीवर मोटार लावण्याच्या कारणावरून रागाच्या भरात एकाचा खून करण्याचा प्रकार घडला. मात्र तो दडपून टाकण्याचाही प्रकार झाला होता. तडजोड न झाल्याने ही बाब उजेडात आली आहे.

...अन् विहिरीसह जमीन देण्याची तयारीभावकीतील भांडणे व वाद किती विकोपाला जातात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. दोन कुटुंबांतील सामायिक विहिरीला पाणी एवढे आहे की, दोन्ही मोटारी लावल्या तरी उपसा हाेत नाही. असे असले तरी भावकीत वादावाद व एकमेकांचा द्वेष यावरून वाद हाेत असे. या घटनेच्या एक दिवस अगोदरच दोन्ही कुटुंबांत वाद झाला होता. ग्रामस्थांनी प्रकरण मिटविले होते. दुसऱ्या दिवशी मोटार लावल्याने राग अनावर झाल्याने डोक्यात लाकडाने मारून खुनाची घटना घडली. याप्रकरणी तडजाेडीसाठी विहिरीसह दोन एकर दोन गुंठे जमीन मयताच्या नातेवाईकाला रजिस्ट्री करून देण्याची तयारी झाली असल्याचे वृत्त आहे. मात्र रजिस्ट्री करून दिल्यानंतरही प्रकरण मिटेल का नाही, यावरून पुन्हा मतभेद झाल्याने प्रकरण पोलिसांत गेले. ‘शेत गेले तरी हरकत नाही, पण धुरा गेला नाही पाहिजे’ या प्रमाणेच पाण्यासाठी खून झाल्यानंतर विहिरीवर पाणी सोडण्याची वेळ आल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. भाऊबंदकीतील वाद विकोपाला जाऊ नये, याचाच धडा ही घटना देत आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी