शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

वाकोडीत उभारली जाणार ४० कुटुंबीयांसाठी वसाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

हिंगोली : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, ...

हिंगोली : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येता यावे, यासाठी शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे वसाहत उभारण्यास मंजुरी मिळाली असून, जागेचा प्रश्नही मिटला आहे. मराठवाड्यातील ही वसाहत दुसरी ठरणार ४० कुटुंबीयांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील वडार समाजातील ४० कुटुंबे पालावर राहतात. त्यांना पक्के घरे नाहीत. शेती व रोजगार नसल्याने भटकंती करून उदरनिर्वाह करावा लागतो. शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण कायम असून, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसोदूर आहेत. शासनाने विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील समाजासाठी सुरू केलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गंत वाकोडी येथील ४० कुटुंबीयांना न्याय मिळू शकतो, हे पालावरील नागरिकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे जवळपास ४० कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विविध कागदपत्रे गोळा करून, तसा प्रस्ताव २०१४ मध्ये सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाकडे पाठविला होता. हिंगोली येथील सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाने हा प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. तत्कालीन जिल्हा प्रशासनाने प्रस्तावास मान्यता दिली. मात्र, त्यानंतर खरी अडचण होती जागेची. वसाहत उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला. अनेक त्रुटींमुळे जागेचा प्रश्न रेंगाळत होता. अखेर पालकमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, कळमनुरीचे तहसीलदार यांच्या प्रयत्नातून जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. वाकोडी परिसरात गट क्र. १३० मधील ४ हे.आर जमीन वसाहत उभारणीसाठी मंजूर झाली असून, जागेची योजनेच्या नावे सातबाराही तयार झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच समाजकल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी जागेची पाहणी केली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक आत्माराम वागतकर, गोविंदा मानकरी यांच्यासह विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांची उपस्थिती होती. त्यामुळे येथील ४० कुटुंबीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर सुविधा उपलब्ध करून देण्याचा होणार प्रयत्न

पहिल्या टप्प्यात लाभार्थींना घरकूल, रस्ते, नाली, मलनिस्सारण, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर, लाभार्थींच्या पाल्यांना आश्रमशाळा, निवासी शाळेत प्रवेश देऊन त्यांना शैक्षणिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. बचतगट स्थापन करून विविध रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

वाकोडी येथील वसाहत उभारणीचा प्रश्न जागेमुळे रखडला होता. मात्र, पालकमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या प्रयत्नामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. पालावर राहणाऱ्या ४० कुटुंबीयांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

- शिवानंद-मिनगीरे, सहायक आयुक्त, समाजकल्याण हिंगोली

फोटो :