शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाकोडीत उभारली जाणार ४० कुटुंबीयांसाठी वसाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

हिंगोली : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, ...

हिंगोली : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येता यावे, यासाठी शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे वसाहत उभारण्यास मंजुरी मिळाली असून, जागेचा प्रश्नही मिटला आहे. मराठवाड्यातील ही वसाहत दुसरी ठरणार ४० कुटुंबीयांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील वडार समाजातील ४० कुटुंबे पालावर राहतात. त्यांना पक्के घरे नाहीत. शेती व रोजगार नसल्याने भटकंती करून उदरनिर्वाह करावा लागतो. शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण कायम असून, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसोदूर आहेत. शासनाने विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील समाजासाठी सुरू केलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गंत वाकोडी येथील ४० कुटुंबीयांना न्याय मिळू शकतो, हे पालावरील नागरिकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे जवळपास ४० कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विविध कागदपत्रे गोळा करून, तसा प्रस्ताव २०१४ मध्ये सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाकडे पाठविला होता. हिंगोली येथील सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाने हा प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. तत्कालीन जिल्हा प्रशासनाने प्रस्तावास मान्यता दिली. मात्र, त्यानंतर खरी अडचण होती जागेची. वसाहत उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला. अनेक त्रुटींमुळे जागेचा प्रश्न रेंगाळत होता. अखेर पालकमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, कळमनुरीचे तहसीलदार यांच्या प्रयत्नातून जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. वाकोडी परिसरात गट क्र. १३० मधील ४ हे.आर जमीन वसाहत उभारणीसाठी मंजूर झाली असून, जागेची योजनेच्या नावे सातबाराही तयार झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच समाजकल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी जागेची पाहणी केली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक आत्माराम वागतकर, गोविंदा मानकरी यांच्यासह विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांची उपस्थिती होती. त्यामुळे येथील ४० कुटुंबीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर सुविधा उपलब्ध करून देण्याचा होणार प्रयत्न

पहिल्या टप्प्यात लाभार्थींना घरकूल, रस्ते, नाली, मलनिस्सारण, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर, लाभार्थींच्या पाल्यांना आश्रमशाळा, निवासी शाळेत प्रवेश देऊन त्यांना शैक्षणिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. बचतगट स्थापन करून विविध रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

वाकोडी येथील वसाहत उभारणीचा प्रश्न जागेमुळे रखडला होता. मात्र, पालकमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या प्रयत्नामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. पालावर राहणाऱ्या ४० कुटुंबीयांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

- शिवानंद-मिनगीरे, सहायक आयुक्त, समाजकल्याण हिंगोली

फोटो :