शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

‘शाळाबाह्य’ची शोधमोहीम संथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असली तरी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेची प्रभावीपणे अंमलबजावणी मात्र होईना.जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बालरक्षकांच्या नोंदणी झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविताना दिसून येत नाही. शिवाय तसा अहवालही शिक्षण खात्याकडे उपलब्ध नाही. हिंगोली जिल्ह्यातील बालरक्षकांची कामे अतिशय संथगतिने सुरू असल्याबाबत संबधित केंद्रप्रमुखांना जून महिन्यात चळवळ गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. प्रत्येक केंद्रातील चार शिक्षकांकडून लिंकवर माहिती भरून बालरक्षक म्हणून नोंदणीची प्रक्रिया पार पडली.बालरक्षक : शेकडो मुले शाळेपासून दूरजिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्त्वाची भूमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे. बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या.केंद्र अंतर्गत येणाºया शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होता कामा नये, याबाबतही संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले होते. परंतु शोध मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होईना.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असली तरी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेची प्रभावीपणे अंमलबजावणी मात्र होईना.जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बालरक्षकांच्या नोंदणी झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविताना दिसून येत नाही. शिवाय तसा अहवालही शिक्षण खात्याकडे उपलब्ध नाही. हिंगोली जिल्ह्यातील बालरक्षकांची कामे अतिशय संथगतिने सुरू असल्याबाबत संबधित केंद्रप्रमुखांना जून महिन्यात चळवळ गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. प्रत्येक केंद्रातील चार शिक्षकांकडून लिंकवर माहिती भरून बालरक्षक म्हणून नोंदणीची प्रक्रिया पार पडली.बालरक्षक : शेकडो मुले शाळेपासून दूरजिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्त्वाची भूमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे. बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या.केंद्र अंतर्गत येणाºया शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होता कामा नये, याबाबतही संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले होते. परंतु शोध मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होईना.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा