शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘शाळाबाह्य’ची शोधमोहीम संथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असली तरी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेची प्रभावीपणे अंमलबजावणी मात्र होईना.जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बालरक्षकांच्या नोंदणी झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविताना दिसून येत नाही. शिवाय तसा अहवालही शिक्षण खात्याकडे उपलब्ध नाही. हिंगोली जिल्ह्यातील बालरक्षकांची कामे अतिशय संथगतिने सुरू असल्याबाबत संबधित केंद्रप्रमुखांना जून महिन्यात चळवळ गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. प्रत्येक केंद्रातील चार शिक्षकांकडून लिंकवर माहिती भरून बालरक्षक म्हणून नोंदणीची प्रक्रिया पार पडली.बालरक्षक : शेकडो मुले शाळेपासून दूरजिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्त्वाची भूमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे. बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या.केंद्र अंतर्गत येणाºया शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होता कामा नये, याबाबतही संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले होते. परंतु शोध मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होईना.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असली तरी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेची प्रभावीपणे अंमलबजावणी मात्र होईना.जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बालरक्षकांच्या नोंदणी झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविताना दिसून येत नाही. शिवाय तसा अहवालही शिक्षण खात्याकडे उपलब्ध नाही. हिंगोली जिल्ह्यातील बालरक्षकांची कामे अतिशय संथगतिने सुरू असल्याबाबत संबधित केंद्रप्रमुखांना जून महिन्यात चळवळ गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. प्रत्येक केंद्रातील चार शिक्षकांकडून लिंकवर माहिती भरून बालरक्षक म्हणून नोंदणीची प्रक्रिया पार पडली.बालरक्षक : शेकडो मुले शाळेपासून दूरजिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्त्वाची भूमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे. बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या.केंद्र अंतर्गत येणाºया शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होता कामा नये, याबाबतही संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले होते. परंतु शोध मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होईना.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा