शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘शाळाबाह्य’ची शोधमोहीम संथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असली तरी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेची प्रभावीपणे अंमलबजावणी मात्र होईना.जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बालरक्षकांच्या नोंदणी झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविताना दिसून येत नाही. शिवाय तसा अहवालही शिक्षण खात्याकडे उपलब्ध नाही. हिंगोली जिल्ह्यातील बालरक्षकांची कामे अतिशय संथगतिने सुरू असल्याबाबत संबधित केंद्रप्रमुखांना जून महिन्यात चळवळ गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. प्रत्येक केंद्रातील चार शिक्षकांकडून लिंकवर माहिती भरून बालरक्षक म्हणून नोंदणीची प्रक्रिया पार पडली.बालरक्षक : शेकडो मुले शाळेपासून दूरजिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्त्वाची भूमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे. बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या.केंद्र अंतर्गत येणाºया शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होता कामा नये, याबाबतही संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले होते. परंतु शोध मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होईना.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात असली तरी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश प्रक्रियेची प्रभावीपणे अंमलबजावणी मात्र होईना.जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बालरक्षकांच्या नोंदणी झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविताना दिसून येत नाही. शिवाय तसा अहवालही शिक्षण खात्याकडे उपलब्ध नाही. हिंगोली जिल्ह्यातील बालरक्षकांची कामे अतिशय संथगतिने सुरू असल्याबाबत संबधित केंद्रप्रमुखांना जून महिन्यात चळवळ गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. प्रत्येक केंद्रातील चार शिक्षकांकडून लिंकवर माहिती भरून बालरक्षक म्हणून नोंदणीची प्रक्रिया पार पडली.बालरक्षक : शेकडो मुले शाळेपासून दूरजिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्त्वाची भूमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळेत प्रवेशित करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे. बालकामगारांना त्यांच्या जवळच्या शाळेत नियमित शाळेत प्रवेशित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिल्या होत्या.केंद्र अंतर्गत येणाºया शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होता कामा नये, याबाबतही संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले होते. परंतु शोध मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होईना.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा