शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील शाळांना कोरोनाची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षीही कोरोनाचा कहर तेवढा नसतानाही शाळा सुरू करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा विलंब झाला होता. यंदा तर ...

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षीही कोरोनाचा कहर तेवढा नसतानाही शाळा सुरू करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा विलंब झाला होता. यंदा तर दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासन ताकही फुंकून पित आहे. शिवाय शासनानेही सरपंच व ग्रामसेवकांच्या समितीवर निर्णय सोपविला आहे. सरपंचांना अशा बाबींमध्ये फारसा रस नसतो तर ग्रामसेवकांना शोधत बसण्याची वेळ येते. त्यातच अनेक ठिकाणी शिक्षकांना ऑनलाइनची घरबसल्या शाळा करण्याची मजा काही औरच असल्याची प्रचिती येत असल्याने त्यांनाही काही रस नाही. त्यामुळे राज्याच्या अहवालात ५,९४७ शाळा सुरू झाल्याचे व त्यात ४.१६ लाख विद्यार्थी हजर असल्याचे दिसत असताना हिंगोलीत मात्र एकही शाळा सुरू नाही.

जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या एकूण ३७५ शाळा आहेत. यात १.३० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अजून शाळांचे प्रस्तावच आले नाहीत, तर पुढील प्रक्रिया कधी होणार? हा प्रश्न आहे.

शिक्षकांच्या चाचण्याही नाहीत

शाळा जणू सुरूच होणार नाहीत, या बेतात शिक्षण विभागही असल्याचे दिसून येत आहे. जरी शाळा सुरू झाल्या नाही तरीही शिक्षकांनी या काळात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास आदेशित करणे गरजेचे होते. शासन आदेशाला साधारणपणे शिक्षक जुमानत नाहीत. स्थानिक अधिकाऱ्यांनी आदेश काढले तरच त्यांना त्याचे गांभीर्य असते. आता शाळा सुरू करायच्या म्हटले तर चार हजारांच्या आसपास शिक्षकांच्या चाचण्या कधी करणार? हा प्रश्न आहे.

मागच्या वेळी होता गोंधळ

मागच्या वेळी अनेक शिक्षकांनी विलंबाने स्वॅब दिल्याने त्यांची चाचणी करायलाही मोठा विलंब झाला आहे. त्यामुळे शाळा विलंबाने सुरू होत गेल्या. जवळपास १०० पेक्षा जास्त शिक्षकही बाधित आढळले होते. त्याचा परिणाम म्हणून यंदा तर चाचण्यांची मानसिकताच दिसत नाही.