शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हिंगोली जिल्ह्यातील शाळांना कोरोनाची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षीही कोरोनाचा कहर तेवढा नसतानाही शाळा सुरू करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा विलंब झाला होता. यंदा तर ...

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षीही कोरोनाचा कहर तेवढा नसतानाही शाळा सुरू करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा विलंब झाला होता. यंदा तर दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासन ताकही फुंकून पित आहे. शिवाय शासनानेही सरपंच व ग्रामसेवकांच्या समितीवर निर्णय सोपविला आहे. सरपंचांना अशा बाबींमध्ये फारसा रस नसतो तर ग्रामसेवकांना शोधत बसण्याची वेळ येते. त्यातच अनेक ठिकाणी शिक्षकांना ऑनलाइनची घरबसल्या शाळा करण्याची मजा काही औरच असल्याची प्रचिती येत असल्याने त्यांनाही काही रस नाही. त्यामुळे राज्याच्या अहवालात ५,९४७ शाळा सुरू झाल्याचे व त्यात ४.१६ लाख विद्यार्थी हजर असल्याचे दिसत असताना हिंगोलीत मात्र एकही शाळा सुरू नाही.

जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या एकूण ३७५ शाळा आहेत. यात १.३० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अजून शाळांचे प्रस्तावच आले नाहीत, तर पुढील प्रक्रिया कधी होणार? हा प्रश्न आहे.

शिक्षकांच्या चाचण्याही नाहीत

शाळा जणू सुरूच होणार नाहीत, या बेतात शिक्षण विभागही असल्याचे दिसून येत आहे. जरी शाळा सुरू झाल्या नाही तरीही शिक्षकांनी या काळात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास आदेशित करणे गरजेचे होते. शासन आदेशाला साधारणपणे शिक्षक जुमानत नाहीत. स्थानिक अधिकाऱ्यांनी आदेश काढले तरच त्यांना त्याचे गांभीर्य असते. आता शाळा सुरू करायच्या म्हटले तर चार हजारांच्या आसपास शिक्षकांच्या चाचण्या कधी करणार? हा प्रश्न आहे.

मागच्या वेळी होता गोंधळ

मागच्या वेळी अनेक शिक्षकांनी विलंबाने स्वॅब दिल्याने त्यांची चाचणी करायलाही मोठा विलंब झाला आहे. त्यामुळे शाळा विलंबाने सुरू होत गेल्या. जवळपास १०० पेक्षा जास्त शिक्षकही बाधित आढळले होते. त्याचा परिणाम म्हणून यंदा तर चाचण्यांची मानसिकताच दिसत नाही.