शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

हिंगोली जिल्ह्यातील शाळांना कोरोनाची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षीही कोरोनाचा कहर तेवढा नसतानाही शाळा सुरू करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा विलंब झाला होता. यंदा तर ...

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षीही कोरोनाचा कहर तेवढा नसतानाही शाळा सुरू करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा विलंब झाला होता. यंदा तर दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासन ताकही फुंकून पित आहे. शिवाय शासनानेही सरपंच व ग्रामसेवकांच्या समितीवर निर्णय सोपविला आहे. सरपंचांना अशा बाबींमध्ये फारसा रस नसतो तर ग्रामसेवकांना शोधत बसण्याची वेळ येते. त्यातच अनेक ठिकाणी शिक्षकांना ऑनलाइनची घरबसल्या शाळा करण्याची मजा काही औरच असल्याची प्रचिती येत असल्याने त्यांनाही काही रस नाही. त्यामुळे राज्याच्या अहवालात ५,९४७ शाळा सुरू झाल्याचे व त्यात ४.१६ लाख विद्यार्थी हजर असल्याचे दिसत असताना हिंगोलीत मात्र एकही शाळा सुरू नाही.

जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या एकूण ३७५ शाळा आहेत. यात १.३० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अजून शाळांचे प्रस्तावच आले नाहीत, तर पुढील प्रक्रिया कधी होणार? हा प्रश्न आहे.

शिक्षकांच्या चाचण्याही नाहीत

शाळा जणू सुरूच होणार नाहीत, या बेतात शिक्षण विभागही असल्याचे दिसून येत आहे. जरी शाळा सुरू झाल्या नाही तरीही शिक्षकांनी या काळात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास आदेशित करणे गरजेचे होते. शासन आदेशाला साधारणपणे शिक्षक जुमानत नाहीत. स्थानिक अधिकाऱ्यांनी आदेश काढले तरच त्यांना त्याचे गांभीर्य असते. आता शाळा सुरू करायच्या म्हटले तर चार हजारांच्या आसपास शिक्षकांच्या चाचण्या कधी करणार? हा प्रश्न आहे.

मागच्या वेळी होता गोंधळ

मागच्या वेळी अनेक शिक्षकांनी विलंबाने स्वॅब दिल्याने त्यांची चाचणी करायलाही मोठा विलंब झाला आहे. त्यामुळे शाळा विलंबाने सुरू होत गेल्या. जवळपास १०० पेक्षा जास्त शिक्षकही बाधित आढळले होते. त्याचा परिणाम म्हणून यंदा तर चाचण्यांची मानसिकताच दिसत नाही.