शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
4
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
5
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
6
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
7
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
8
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
9
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
10
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
11
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
12
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
13
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
14
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
15
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
16
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
17
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
18
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
19
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
20
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी

हिंगोली जिल्ह्यातील शाळांना कोरोनाची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षीही कोरोनाचा कहर तेवढा नसतानाही शाळा सुरू करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा विलंब झाला होता. यंदा तर ...

हिंगोली जिल्ह्यात गेल्यावर्षीही कोरोनाचा कहर तेवढा नसतानाही शाळा सुरू करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा विलंब झाला होता. यंदा तर दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासन ताकही फुंकून पित आहे. शिवाय शासनानेही सरपंच व ग्रामसेवकांच्या समितीवर निर्णय सोपविला आहे. सरपंचांना अशा बाबींमध्ये फारसा रस नसतो तर ग्रामसेवकांना शोधत बसण्याची वेळ येते. त्यातच अनेक ठिकाणी शिक्षकांना ऑनलाइनची घरबसल्या शाळा करण्याची मजा काही औरच असल्याची प्रचिती येत असल्याने त्यांनाही काही रस नाही. त्यामुळे राज्याच्या अहवालात ५,९४७ शाळा सुरू झाल्याचे व त्यात ४.१६ लाख विद्यार्थी हजर असल्याचे दिसत असताना हिंगोलीत मात्र एकही शाळा सुरू नाही.

जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या एकूण ३७५ शाळा आहेत. यात १.३० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अजून शाळांचे प्रस्तावच आले नाहीत, तर पुढील प्रक्रिया कधी होणार? हा प्रश्न आहे.

शिक्षकांच्या चाचण्याही नाहीत

शाळा जणू सुरूच होणार नाहीत, या बेतात शिक्षण विभागही असल्याचे दिसून येत आहे. जरी शाळा सुरू झाल्या नाही तरीही शिक्षकांनी या काळात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास आदेशित करणे गरजेचे होते. शासन आदेशाला साधारणपणे शिक्षक जुमानत नाहीत. स्थानिक अधिकाऱ्यांनी आदेश काढले तरच त्यांना त्याचे गांभीर्य असते. आता शाळा सुरू करायच्या म्हटले तर चार हजारांच्या आसपास शिक्षकांच्या चाचण्या कधी करणार? हा प्रश्न आहे.

मागच्या वेळी होता गोंधळ

मागच्या वेळी अनेक शिक्षकांनी विलंबाने स्वॅब दिल्याने त्यांची चाचणी करायलाही मोठा विलंब झाला आहे. त्यामुळे शाळा विलंबाने सुरू होत गेल्या. जवळपास १०० पेक्षा जास्त शिक्षकही बाधित आढळले होते. त्याचा परिणाम म्हणून यंदा तर चाचण्यांची मानसिकताच दिसत नाही.