शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

दहावीच्या निकालास विलंब झाल्यास शाळाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

हिंगोली : जिल्ह्यात दहावीच्या निकालासाठी शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. गतवर्षीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नसल्याने आता निकालासाठी माहिती कुठून ...

हिंगोली : जिल्ह्यात दहावीच्या निकालासाठी शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. गतवर्षीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नसल्याने आता निकालासाठी माहिती कुठून आणायची? हा सर्वांत मोठा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहे. या संभ्रमातच अनेक शाळांनी माहिती ऑनलाईन भरली नाही.

हिंगोली जिल्ह्यात दहावीला जवळपास १९ हजार विद्यार्थी होते. मात्र यंदा परीक्षा न घेताच मुलांना उत्तीर्ण करण्यासाठी मंडळाने फाॅर्म्युला दिला. मागील वर्षीचे गुण, अंतर्गत चाचण्यांचे गुण, तोंडी परीक्षा व विषयनिहाय वेगवेगळी गुणांकन पद्धत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीही परीक्षा झाल्या नसल्याने काही शाळा संभ्रमात पडल्या आहेत. त्यामुळे त्यांना माहिती कशी भरावी, यावर तोडगा सापडत नसल्याने काम थंडावल्याचे दिसत आहे.

गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी

गतवर्षीही परीक्षा झाल्या नव्हत्या. काही विद्यार्थ्यांनी दहावीचे ऑनलाईन वर्ग केले नव्हते. त्यामुळे कुठे मागच्या, तर कुठे चालू वर्षाच्या गुणांकनाचा प्रश्न आहे. तरीही विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेता गुणांकन करून माहिती भरण्याचा प्रयत्न आहे.

-वसंत कावरखे, शिक्षक

दहावीचा निकाल देताना थोड्याबहुत अडचणी आल्या. मात्र आम्ही सर्व विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी फेरतपासणी करून दोन दिवसांत कन्फर्म करणार आहोत.

-यादव नकलेकर, शिक्षक

२० टक्के शाळांनीच टप्पा पूर्ण केला

जिल्ह्यातील दहावीतील विद्यार्थी १९४०७

मुले १०२१४

मुली ९१९३

गेल्या वर्षी ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाची टाळेबंदी लागली. त्यामुळे त्यापूर्वीच्या सत्रातील गुणांकनावर अवलंबून राहावे लागणार आहे. काही शाळांना हा निकालच भेटत नाही.

काही शाळांना गुणांकन करताना दिलेल्या फॉर्म्युल्यावरूनच संभ्रम आहे. दहावीचेही ऑनलाईन वर्ग न झाल्याने मूल्यमापन अंदाजे केले तर अडचणी येतील काय? ही भीती आहे.

यंदाच्या चाचण्या घेण्यास सांगितल्या. तोंडी परीक्षा व इतर बाबींसाठीही मुले भेटत नाहीत. फोनवरूनही मुलांशी संपर्क होत नाही. शाळेत येण्यासही मज्जाव आहे.

शाळांकडे पाठपुरावा करीत आहोत

दहावीच्या निकालासाठी शाळांनी ऑनलाईन माहिती भरायची आहे. यासाठी मुख्याध्यापकांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. पाठपुरावा सुरूच असून माहिती न भरल्याने निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार राहतील.

- पी. बी. पावसे, शिक्षणाधिकारी