शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

दहावीच्या निकालास विलंब झाल्यास शाळाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

हिंगोली : जिल्ह्यात दहावीच्या निकालासाठी शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. गतवर्षीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नसल्याने आता निकालासाठी माहिती कुठून ...

हिंगोली : जिल्ह्यात दहावीच्या निकालासाठी शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. गतवर्षीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नसल्याने आता निकालासाठी माहिती कुठून आणायची? हा सर्वांत मोठा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहे. या संभ्रमातच अनेक शाळांनी माहिती ऑनलाईन भरली नाही.

हिंगोली जिल्ह्यात दहावीला जवळपास १९ हजार विद्यार्थी होते. मात्र यंदा परीक्षा न घेताच मुलांना उत्तीर्ण करण्यासाठी मंडळाने फाॅर्म्युला दिला. मागील वर्षीचे गुण, अंतर्गत चाचण्यांचे गुण, तोंडी परीक्षा व विषयनिहाय वेगवेगळी गुणांकन पद्धत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीही परीक्षा झाल्या नसल्याने काही शाळा संभ्रमात पडल्या आहेत. त्यामुळे त्यांना माहिती कशी भरावी, यावर तोडगा सापडत नसल्याने काम थंडावल्याचे दिसत आहे.

गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी

गतवर्षीही परीक्षा झाल्या नव्हत्या. काही विद्यार्थ्यांनी दहावीचे ऑनलाईन वर्ग केले नव्हते. त्यामुळे कुठे मागच्या, तर कुठे चालू वर्षाच्या गुणांकनाचा प्रश्न आहे. तरीही विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेता गुणांकन करून माहिती भरण्याचा प्रयत्न आहे.

-वसंत कावरखे, शिक्षक

दहावीचा निकाल देताना थोड्याबहुत अडचणी आल्या. मात्र आम्ही सर्व विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी फेरतपासणी करून दोन दिवसांत कन्फर्म करणार आहोत.

-यादव नकलेकर, शिक्षक

२० टक्के शाळांनीच टप्पा पूर्ण केला

जिल्ह्यातील दहावीतील विद्यार्थी १९४०७

मुले १०२१४

मुली ९१९३

गेल्या वर्षी ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाची टाळेबंदी लागली. त्यामुळे त्यापूर्वीच्या सत्रातील गुणांकनावर अवलंबून राहावे लागणार आहे. काही शाळांना हा निकालच भेटत नाही.

काही शाळांना गुणांकन करताना दिलेल्या फॉर्म्युल्यावरूनच संभ्रम आहे. दहावीचेही ऑनलाईन वर्ग न झाल्याने मूल्यमापन अंदाजे केले तर अडचणी येतील काय? ही भीती आहे.

यंदाच्या चाचण्या घेण्यास सांगितल्या. तोंडी परीक्षा व इतर बाबींसाठीही मुले भेटत नाहीत. फोनवरूनही मुलांशी संपर्क होत नाही. शाळेत येण्यासही मज्जाव आहे.

शाळांकडे पाठपुरावा करीत आहोत

दहावीच्या निकालासाठी शाळांनी ऑनलाईन माहिती भरायची आहे. यासाठी मुख्याध्यापकांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. पाठपुरावा सुरूच असून माहिती न भरल्याने निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार राहतील.

- पी. बी. पावसे, शिक्षणाधिकारी