शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

दहावीच्या निकालास विलंब झाल्यास शाळाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

हिंगोली : जिल्ह्यात दहावीच्या निकालासाठी शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. गतवर्षीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नसल्याने आता निकालासाठी माहिती कुठून ...

हिंगोली : जिल्ह्यात दहावीच्या निकालासाठी शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. गतवर्षीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नसल्याने आता निकालासाठी माहिती कुठून आणायची? हा सर्वांत मोठा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहे. या संभ्रमातच अनेक शाळांनी माहिती ऑनलाईन भरली नाही.

हिंगोली जिल्ह्यात दहावीला जवळपास १९ हजार विद्यार्थी होते. मात्र यंदा परीक्षा न घेताच मुलांना उत्तीर्ण करण्यासाठी मंडळाने फाॅर्म्युला दिला. मागील वर्षीचे गुण, अंतर्गत चाचण्यांचे गुण, तोंडी परीक्षा व विषयनिहाय वेगवेगळी गुणांकन पद्धत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीही परीक्षा झाल्या नसल्याने काही शाळा संभ्रमात पडल्या आहेत. त्यामुळे त्यांना माहिती कशी भरावी, यावर तोडगा सापडत नसल्याने काम थंडावल्याचे दिसत आहे.

गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी

गतवर्षीही परीक्षा झाल्या नव्हत्या. काही विद्यार्थ्यांनी दहावीचे ऑनलाईन वर्ग केले नव्हते. त्यामुळे कुठे मागच्या, तर कुठे चालू वर्षाच्या गुणांकनाचा प्रश्न आहे. तरीही विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेता गुणांकन करून माहिती भरण्याचा प्रयत्न आहे.

-वसंत कावरखे, शिक्षक

दहावीचा निकाल देताना थोड्याबहुत अडचणी आल्या. मात्र आम्ही सर्व विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी फेरतपासणी करून दोन दिवसांत कन्फर्म करणार आहोत.

-यादव नकलेकर, शिक्षक

२० टक्के शाळांनीच टप्पा पूर्ण केला

जिल्ह्यातील दहावीतील विद्यार्थी १९४०७

मुले १०२१४

मुली ९१९३

गेल्या वर्षी ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाची टाळेबंदी लागली. त्यामुळे त्यापूर्वीच्या सत्रातील गुणांकनावर अवलंबून राहावे लागणार आहे. काही शाळांना हा निकालच भेटत नाही.

काही शाळांना गुणांकन करताना दिलेल्या फॉर्म्युल्यावरूनच संभ्रम आहे. दहावीचेही ऑनलाईन वर्ग न झाल्याने मूल्यमापन अंदाजे केले तर अडचणी येतील काय? ही भीती आहे.

यंदाच्या चाचण्या घेण्यास सांगितल्या. तोंडी परीक्षा व इतर बाबींसाठीही मुले भेटत नाहीत. फोनवरूनही मुलांशी संपर्क होत नाही. शाळेत येण्यासही मज्जाव आहे.

शाळांकडे पाठपुरावा करीत आहोत

दहावीच्या निकालासाठी शाळांनी ऑनलाईन माहिती भरायची आहे. यासाठी मुख्याध्यापकांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. पाठपुरावा सुरूच असून माहिती न भरल्याने निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार राहतील.

- पी. बी. पावसे, शिक्षणाधिकारी