शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शिष्यवृत्तीची परीक्षा होतेे; मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन ...

एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे हे योग्य नसल्याचे उपक्रमशील शिक्षक देवीदास गुंजकर यांनी सांगितले

एरवीही मुलांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शाळांकडून वर्षभर केले जाते. अंतिम परीक्षांतही त्याच प्रमाणात गुण असतात. मात्र, ऑनलाईन परीक्षा घेणेही सर्व शाळांना शक्य होईल, असे वाटत नाही. त्यासाठीचे साहित्य सर्वांकडे राहील, हे सांगता येत नाही. परीक्षा घेतल्या पाहिजे मात्र तांत्रिक उपलब्धतेचे काय? अशी प्रतिक्रिया माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली.

मुलांसाठी परीक्षा आवश्यक आहेत. त्याचआधारे त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा, हे आमचे म्हणणे आहे. यासाठी उत्तरपत्रिका घरी पाठवून ऑनलाईन पेपर देऊन ठराविक वेळेत शाळेत आणून पालकांनी जमा केल्यास व कोरोनाचे सर्व नियम पाळून गर्दी न करता या उत्तरपत्रिका सादर केल्यास शक्य आहे, असे शिक्षण संस्थाचालक दिलीप बांगर म्हणाले.

सध्याच्या कोरोनाच्या काळात परीक्षेला मुलांना पाठविणे अवघड आहे तर ऑनलाईन परीक्षा सर्वच शाळा घेतील, असे नाही. ज्यांना शक्य आहे, त्यांनी घेतली तर चांगलेच आहे. त्यामुळे पालकांना मुलाची गुणवत्ता कळेल.

-दिनकर पिसे, पालक

विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचा बोनस न देता ऑनलाईन पद्धतीने काही ना काही परीक्षा घेतली पाहिजे. त्यामुळे निदान मुले अभ्यास तरी करतील. सध्या ऑनलाईन अभ्यासात मुले काय करताहेत हे आधीच कळायला मार्ग नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन शक्य नसल्या तरीही ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात.

-अजय बियाणी, पालक

पहिली २२८५२

दुसरी २३१८७

तिसरी २२१९२

चौथी २१८७४

पाचवी २१३४२

सहावी २०७४०

आठवी २०५३५

नववी १९५१९

अकरावी१२६५७

सर्वाधिक मुले दुसरीत २३१८७

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी२०५८५२