शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा होतेे; मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन ...

एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे हे योग्य नसल्याचे उपक्रमशील शिक्षक देवीदास गुंजकर यांनी सांगितले

एरवीही मुलांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शाळांकडून वर्षभर केले जाते. अंतिम परीक्षांतही त्याच प्रमाणात गुण असतात. मात्र, ऑनलाईन परीक्षा घेणेही सर्व शाळांना शक्य होईल, असे वाटत नाही. त्यासाठीचे साहित्य सर्वांकडे राहील, हे सांगता येत नाही. परीक्षा घेतल्या पाहिजे मात्र तांत्रिक उपलब्धतेचे काय? अशी प्रतिक्रिया माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली.

मुलांसाठी परीक्षा आवश्यक आहेत. त्याचआधारे त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा, हे आमचे म्हणणे आहे. यासाठी उत्तरपत्रिका घरी पाठवून ऑनलाईन पेपर देऊन ठराविक वेळेत शाळेत आणून पालकांनी जमा केल्यास व कोरोनाचे सर्व नियम पाळून गर्दी न करता या उत्तरपत्रिका सादर केल्यास शक्य आहे, असे शिक्षण संस्थाचालक दिलीप बांगर म्हणाले.

सध्याच्या कोरोनाच्या काळात परीक्षेला मुलांना पाठविणे अवघड आहे तर ऑनलाईन परीक्षा सर्वच शाळा घेतील, असे नाही. ज्यांना शक्य आहे, त्यांनी घेतली तर चांगलेच आहे. त्यामुळे पालकांना मुलाची गुणवत्ता कळेल.

-दिनकर पिसे, पालक

विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचा बोनस न देता ऑनलाईन पद्धतीने काही ना काही परीक्षा घेतली पाहिजे. त्यामुळे निदान मुले अभ्यास तरी करतील. सध्या ऑनलाईन अभ्यासात मुले काय करताहेत हे आधीच कळायला मार्ग नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन शक्य नसल्या तरीही ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात.

-अजय बियाणी, पालक

पहिली २२८५२

दुसरी २३१८७

तिसरी २२१९२

चौथी २१८७४

पाचवी २१३४२

सहावी २०७४०

आठवी २०५३५

नववी १९५१९

अकरावी१२६५७

सर्वाधिक मुले दुसरीत २३१८७

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी२०५८५२