शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सातव यांनी संसदेत मांडले १००३ प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:09 IST

संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे. त्यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या आता १००३ वर पोहोचली आहे.मागील साडेचार वर्षांत १ जून २०१४ ते १३ डिसेंबर २०१८ पर्यंत संसदेत अव्वल खासदारांमध्ये स्थान मिळविण्याचा बहुमान हिंगोलीकरांसह महाराष्ट्राला मिळाला आहे. खा.राजीव सातव यांनी लोकसभेतील कामगिरीच्या जोरावर यापूर्वीच सलग तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. यानंतर लोकसभेतील २३ उच्चपदस्थांचा समावेश असलेली पी.आर.एस. लेजिस्लेटिव्ह रिसर्च ही संस्था राज्यसभा, लोकसभेतील खासदारांच्या कार्याचे मूल्यमापन करते. या संस्थेला सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेचे सहकार्य असते. पी.आर.एस.ने सर्व खासदारांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेतला. त्यात संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात खा. राजीव सातव यांचा लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या सहा खासदारांत त्यांचा समावेश आहे.आतापर्यंत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ११ खासदार निवडून दिले.सर्वाधिक प्रश्न विचारून लोकसभेत हिंगोली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत मतदारसंघासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील १००० पेक्षा अधिक प्रश्नांवर आक्रमकपणे आपली बाजू मांडून विरोधी पक्षांतील सरस खासदार असा ठसा खा. राजीव सातव यांनी कार्यकर्तुत्वाचा उमटविला आहे. लोकसभेत मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासह राज्यस्तरीय, राष्ट्रीय प्रश्नांवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया खासदारांत महाराष्ट्राचाच बोलबाला असून ५४५ खासदारांपैकी पीआरएसने १ जुन २०१४ ते १३ डिसेंबर २०१८ पर्यंत कामगिरीच्या लेखाजोख्यात लोकसभेतील अव्वल खासदारांत शिवाजी आढळराव पाटील १०८२, खा. सुप्रिया सुळे १०६३, खा.धनंजय महाडीक १०५५, खा.विजयसिंह मोहिते पाटील १०२४, खा.श्रीरंगअप्पा बारणे १०११, खा.राजीव सातव १००३ यांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभा