शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली आहे. या काळात ...

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली आहे. या काळात गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी २८ फेब्रुवारी रोजी बाजारपेठेत खरेदीसाठी दिवसभर अलाेट गर्दी केली होती.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चार दिवस सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करूनही रुग्ण संख्येला अटकाव बसत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सलग सात दिवस दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात झालेली गैरसोय लक्षात घेता, नागरिकांनी रविवारी हिंगोली शहरात जीवनावश्यक विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. एरव्ही दर रविवारी बाजारपेठेत शुकशुकाट असतो. मात्र, संचारबंदीमुळे रविवारी नागरिकांची दिवसभर खरेदीसाठी धावपळ झाली. किमान आठ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा खरेदी करण्यावर अनेकांचा भर होता. भाजीपाला, किराणा दुकानावर मोठी गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे एरवी भाजीपाल्याचे भाव गडगडलेले असतात. यावेळी व्यापाऱ्यांनी संचारबंदीचा फायदा उठवत भाजीपाल्याच्या दरात २० टक्के वाढ केल्याचे ग्राहकांनी सांगितले. किराणा सामानासाठीही ग्राहक सकाळपासून धावपळ करत होते. यावेळी किराणा दुकानदारांची किराणा साहित्य देताना मोठी दमछाक होत होती. गांधी चौक, महावीर स्तंभ, जवाहर राेड याठिकाणी गर्दी हाेत असल्याने वाहन उभे करण्यासाठी जागा शोधावी लागत होती. अशीच स्थिती पेट्रोल पंपावरही दिसून आली. पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिवाय केशकर्तनालयातही अनेकांनी नंबर लावले होते. अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी आठवण करत साहित्य खरेदी करत हाेते.

गावाकडे परतण्यासाठी कसरत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थही खरेदीसाठी हिंगोली शहरात दाखल झाले होते. अनेकांनी दुचाकी आणणेच पसंत केले. मात्र, ज्यांच्याकडे दुचाकी नाही, अशा ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यात सायंकाळी ७ वाजता बाजारपेठ बंद होणार असल्याच्या भीतीने ग्रामस्थ खरेदीसाठी घाई करीत गावाकडे जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहने शोधत होते.

घराबाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई

संचारबंदी कालावधीत संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तिंना सामाजिक अंतर, तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारपेठेत, गल्लीमध्ये, गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास अशा व्यक्तींवर नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पाेलीस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.