शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

रोहयोच्या कामांचाही दुष्काळ; वीस हजारांवर मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:13 IST

खरीप आणि रबी दोन्ही हंगाम हाती लागले नसल्याने सेनगाव गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात रोजगाराच्या शोधात तालुक्यातील वीस हजारांहून अधिक मजुरांचे स्थलांतर झाले आहे. मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनाही दुष्काळात सापडली असून तालुक्यात या योजनेंतर्गत नाममात्र वीस कामगार काम करीत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : खरीप आणि रबी दोन्ही हंगाम हाती लागले नसल्याने सेनगाव गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात रोजगाराच्या शोधात तालुक्यातील वीस हजारांहून अधिक मजुरांचे स्थलांतर झाले आहे. मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनाही दुष्काळात सापडली असून तालुक्यात या योजनेंतर्गत नाममात्र वीस कामगार काम करीत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अवेळी ६४ मिमी पाऊस पडला. त्याचा मोठा परिणाम खरीप पिकावर झाला. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने सोयाबीनसह तूरही हातची गेली. तालुक्यात केवळ २० टक्के क्षेत्रावर रबीची पेरणी झाली आहे. अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने सेनगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला, परंतु त्या अंनुषगाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, रोजगाराच्या शोधात हजारो मजूर दररोज स्थलांतर करीत आहेत. गत महिनाभरात तालुक्यातून तब्बल वीस हजाराहून अधिक मजुरांनी रोजगाराच्या शोधात शहराकडे, ऊसतोडणीसाठी स्थलांतर केले आहे. दुष्काळी स्थितीची दाहकता दररोज तीव्र होत आहे. दिवाळी सणावर मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट जाणवले. खरीप पिकांच्या उत्पादनातून खर्चही निघाला नसल्याने शेतकरी, शेतमजूर आर्थिक टंचाईने ग्रस्त झाले आहेत. या विवंचनेने रोजगाराच्या शोधात अनेकांनी घरे सोडली असताना प्रशासन मात्र कमालीचे बेफिकीर आहे. दुष्काळ परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीवरही दुष्काळाचे सावट पसरल्याने रोहयोची कोणतीही कामे तालुक्यात अद्याप सुरुच झाली नाहीत. यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्याला शासनाने एकप्रकारे वाऱ्यावरच सोडले आहे. तालुक्यात नोंदणीकृत १८ हजार ६२२ मजूर आहेत. त्यापैकी पाच घरकुल योजनेचा कामावर केवळ वीस मजूर कार्यरत आहेत. त्यामुळे कधी नव्हे, एवढा गंभीर दुष्काळाचा सामना तालुक्यातील सर्वसामान्य जनता करत असताना प्रशासन मात्र प्रत्यक्षात दिलासा देणारा कोणत्याच उपाययोजना करीत नसल्याने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून दररोज शेकडो लोंढे रोजगाराच्या शोधात स्थलांतर करीत असल्याचे भीषण चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorजिल्हाधिकारी