शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

रोहयोच्या कामांचाही दुष्काळ; वीस हजारांवर मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:13 IST

खरीप आणि रबी दोन्ही हंगाम हाती लागले नसल्याने सेनगाव गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात रोजगाराच्या शोधात तालुक्यातील वीस हजारांहून अधिक मजुरांचे स्थलांतर झाले आहे. मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनाही दुष्काळात सापडली असून तालुक्यात या योजनेंतर्गत नाममात्र वीस कामगार काम करीत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : खरीप आणि रबी दोन्ही हंगाम हाती लागले नसल्याने सेनगाव गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात रोजगाराच्या शोधात तालुक्यातील वीस हजारांहून अधिक मजुरांचे स्थलांतर झाले आहे. मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनाही दुष्काळात सापडली असून तालुक्यात या योजनेंतर्गत नाममात्र वीस कामगार काम करीत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अवेळी ६४ मिमी पाऊस पडला. त्याचा मोठा परिणाम खरीप पिकावर झाला. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने सोयाबीनसह तूरही हातची गेली. तालुक्यात केवळ २० टक्के क्षेत्रावर रबीची पेरणी झाली आहे. अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने सेनगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला, परंतु त्या अंनुषगाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, रोजगाराच्या शोधात हजारो मजूर दररोज स्थलांतर करीत आहेत. गत महिनाभरात तालुक्यातून तब्बल वीस हजाराहून अधिक मजुरांनी रोजगाराच्या शोधात शहराकडे, ऊसतोडणीसाठी स्थलांतर केले आहे. दुष्काळी स्थितीची दाहकता दररोज तीव्र होत आहे. दिवाळी सणावर मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट जाणवले. खरीप पिकांच्या उत्पादनातून खर्चही निघाला नसल्याने शेतकरी, शेतमजूर आर्थिक टंचाईने ग्रस्त झाले आहेत. या विवंचनेने रोजगाराच्या शोधात अनेकांनी घरे सोडली असताना प्रशासन मात्र कमालीचे बेफिकीर आहे. दुष्काळ परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीवरही दुष्काळाचे सावट पसरल्याने रोहयोची कोणतीही कामे तालुक्यात अद्याप सुरुच झाली नाहीत. यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्याला शासनाने एकप्रकारे वाऱ्यावरच सोडले आहे. तालुक्यात नोंदणीकृत १८ हजार ६२२ मजूर आहेत. त्यापैकी पाच घरकुल योजनेचा कामावर केवळ वीस मजूर कार्यरत आहेत. त्यामुळे कधी नव्हे, एवढा गंभीर दुष्काळाचा सामना तालुक्यातील सर्वसामान्य जनता करत असताना प्रशासन मात्र प्रत्यक्षात दिलासा देणारा कोणत्याच उपाययोजना करीत नसल्याने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून दररोज शेकडो लोंढे रोजगाराच्या शोधात स्थलांतर करीत असल्याचे भीषण चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorजिल्हाधिकारी