शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एक तासाच्या माहितीपटातून नदीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:22 IST

पावसाळ्यात कयाधूचे आक्राळ विक्राळ रुप पाहण्यास मिळत असले तरीही दुसऱ्याच दिवशी नदीचे पात्र पूर्णत: कोरडे होते. त्यामुळे पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा केल्याशिवाय पर्यायच नाही. हिच दाहिदिशा थांबविण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांतून नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी जागृती दिंडी काढली जात आहे. सोबातच नदीच्या पात्राचे व्हिडीओ चित्रीकरण करुन त्यावर एका तासाची डाक्युमेंट्री केली जाणार असल्याचे संस्था अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पावसाळ्यात कयाधूचे आक्राळ विक्राळ रुप पाहण्यास मिळत असले तरीही दुसऱ्याच दिवशी नदीचे पात्र पूर्णत: कोरडे होते. त्यामुळे पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा केल्याशिवाय पर्यायच नाही. हिच दाहिदिशा थांबविण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांतून नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी जागृती दिंडी काढली जात आहे. सोबातच नदीच्या पात्राचे व्हिडीओ चित्रीकरण करुन त्यावर एका तासाची डाक्युमेंट्री केली जाणार असल्याचे संस्था अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले.जिल्ह्यातील प्रत्येक माणसापर्यंत ही जलचळवळ पोहोचावी हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शुक्रवार पासून सुरु करण्यात आलेल्या जलंदिडीत नदी काठावरील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले. एवढेच काय तर एका गावातून दुसºया गावात पोहोचताना दिंडीला निरोप देऊन पुढील गावातील ग्रामस्थ दिंडीचे स्वागत करत होते. जवळपास सेनगाव, हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यांतील २० गावांमध्ये दिंडीद्वारे करण्यात आली. याच प्रवासा दरम्यान नदीचे विविध प्रकारचे फोटो, व्हिडीओही घेण्यात आला असून, त्यावर बनविलेली एक तासाची डॉक्युमेंट्री ती जलदूत राजेंद्रसिंह राणा यांना दाखविण्यात येणार आहे. नंतर त्यांच्या सूचनेनुसार नदीच्या पुनरज्जीवनासाठी पाऊल उचलले जाणार असल्याचे पाईकराव यांनी सांगितले. दिंडीतील सहभागींना नदी पुनरुज्जीवित का करावी, कशी कारता येईल, त्यात आपला सहभाग काय असणार आहे. अशा अनेक प्रकारच्या बाबी समजावून सांगितल्या. एवढेच काय तर नदी बारमाही झाल्यानंतर त्यापासून होणारे फायदेही ग्रामस्थांना सांगण्यात आले. खरोखर या जलचल चळवळीत ग्रामस्थांनी स्वत:ला झोकून देऊन काम केल्यास खरोखरच याच वर्षी पुराच्या दोन दिवसात कोरडी दिसणारी नदी बारमाही वाहती दिसण्यास मदत होऊ शकते.जलदिंडीद्वारे नदी काठावरील जवळपास १५४ गावातील ग्रामस्थांना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पथनाट्य, कलापथक, कीर्तन, गाणे इ.तून केलेल्या प्रबोधनाचा खरोखरच उपयोग होईल का? झाल्यास येत्या काही दिवसातच हे काम सुरु होणे गरजेचे आहे. निदान यंदा पडणाºया पावसाच्या एका- एका थेंबाला थांबविणे शक्य होऊन कयाधू बारमाही वाहण्यास मदत होईल. आज घडिला दिंडी कयाधूच्या काठावरील गावात नदी कशी पुनरुज्जीवित करावी इ. संदर्भात माहिती देत आहे. ४ जून रोजी दिंडीचा समारोप होणार आहे. दिंडीतील सहभागिनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग झाल्यास या चळवळीला खरे यश मिळेल.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी