शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एक तासाच्या माहितीपटातून नदीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:22 IST

पावसाळ्यात कयाधूचे आक्राळ विक्राळ रुप पाहण्यास मिळत असले तरीही दुसऱ्याच दिवशी नदीचे पात्र पूर्णत: कोरडे होते. त्यामुळे पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा केल्याशिवाय पर्यायच नाही. हिच दाहिदिशा थांबविण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांतून नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी जागृती दिंडी काढली जात आहे. सोबातच नदीच्या पात्राचे व्हिडीओ चित्रीकरण करुन त्यावर एका तासाची डाक्युमेंट्री केली जाणार असल्याचे संस्था अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पावसाळ्यात कयाधूचे आक्राळ विक्राळ रुप पाहण्यास मिळत असले तरीही दुसऱ्याच दिवशी नदीचे पात्र पूर्णत: कोरडे होते. त्यामुळे पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा केल्याशिवाय पर्यायच नाही. हिच दाहिदिशा थांबविण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांतून नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी जागृती दिंडी काढली जात आहे. सोबातच नदीच्या पात्राचे व्हिडीओ चित्रीकरण करुन त्यावर एका तासाची डाक्युमेंट्री केली जाणार असल्याचे संस्था अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले.जिल्ह्यातील प्रत्येक माणसापर्यंत ही जलचळवळ पोहोचावी हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शुक्रवार पासून सुरु करण्यात आलेल्या जलंदिडीत नदी काठावरील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले. एवढेच काय तर एका गावातून दुसºया गावात पोहोचताना दिंडीला निरोप देऊन पुढील गावातील ग्रामस्थ दिंडीचे स्वागत करत होते. जवळपास सेनगाव, हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यांतील २० गावांमध्ये दिंडीद्वारे करण्यात आली. याच प्रवासा दरम्यान नदीचे विविध प्रकारचे फोटो, व्हिडीओही घेण्यात आला असून, त्यावर बनविलेली एक तासाची डॉक्युमेंट्री ती जलदूत राजेंद्रसिंह राणा यांना दाखविण्यात येणार आहे. नंतर त्यांच्या सूचनेनुसार नदीच्या पुनरज्जीवनासाठी पाऊल उचलले जाणार असल्याचे पाईकराव यांनी सांगितले. दिंडीतील सहभागींना नदी पुनरुज्जीवित का करावी, कशी कारता येईल, त्यात आपला सहभाग काय असणार आहे. अशा अनेक प्रकारच्या बाबी समजावून सांगितल्या. एवढेच काय तर नदी बारमाही झाल्यानंतर त्यापासून होणारे फायदेही ग्रामस्थांना सांगण्यात आले. खरोखर या जलचल चळवळीत ग्रामस्थांनी स्वत:ला झोकून देऊन काम केल्यास खरोखरच याच वर्षी पुराच्या दोन दिवसात कोरडी दिसणारी नदी बारमाही वाहती दिसण्यास मदत होऊ शकते.जलदिंडीद्वारे नदी काठावरील जवळपास १५४ गावातील ग्रामस्थांना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पथनाट्य, कलापथक, कीर्तन, गाणे इ.तून केलेल्या प्रबोधनाचा खरोखरच उपयोग होईल का? झाल्यास येत्या काही दिवसातच हे काम सुरु होणे गरजेचे आहे. निदान यंदा पडणाºया पावसाच्या एका- एका थेंबाला थांबविणे शक्य होऊन कयाधू बारमाही वाहण्यास मदत होईल. आज घडिला दिंडी कयाधूच्या काठावरील गावात नदी कशी पुनरुज्जीवित करावी इ. संदर्भात माहिती देत आहे. ४ जून रोजी दिंडीचा समारोप होणार आहे. दिंडीतील सहभागिनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग झाल्यास या चळवळीला खरे यश मिळेल.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी