शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.त एकाच्या बडतर्फीचा, तर एकाच्या निलंबनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST

जि.प. अध्यक्ष बेले यांच्या अध्यक्षतेखालील या सभेस सीईओ आर. बी. शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, बाजीराव जुंबडे, ...

जि.प. अध्यक्ष बेले यांच्या अध्यक्षतेखालील या सभेस सीईओ आर. बी. शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, बाजीराव जुंबडे, रत्नमाला चव्हाण, रूपाली पाटील गोरेगावकर यांची उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीलाच विठ्ठल चौतमल यांनी अपंग कल्याण योजनेत ग्रामपंचायतींकडून ५ टक्के निधी खर्च करणे अपेक्षित असताना तो होत नसल्याने यात काय कारवाई करणार, असा सवाल केला. त्यात उपमुकाअ मिलिंद पोहरे यांनी ७१.४६ लक्ष रुपये खर्च करणे अपेक्षित होते. किती ग्रा.पं.नी यात दिरंगाई केली, हे तपासून ग्रा.पं.ला सक्त सूचना देऊ, तरीही न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोडी अंतर्गत इमारत व कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम चुकीचे होत असून, यावर देखरेख ठेवण्यात संबंधित कंत्राटी अभियंता अपयशी ठरला आहे. जळगाव येथील त्रयस्थ तपासणी यंत्रणेनेही तसा अहवाल दिला आहे, या अभियंत्यास बडतर्फ करण्याची मागणी जि.प. सदस्य अजित मगर यांनी केली. त्यात आधी सीईओ शर्मा यांनी औरंगाबाद गुणनियंत्रणकडून तपासणी करू, असे सांगितले. मात्र, एका एजन्सीचा अहवाल असताना दुसरा का, असा सवाल करण्यात आला. त्यानंतर संबंधिताचा खुलासा मागविल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही समाधान न झाल्याने अनेक सदस्यांनी संबंधितास बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यावर ३१ मार्चपर्यंत या अभियंत्यास ठेवून पुढे कारवाईचे आश्वासन अध्यक्ष बेले यांनी दिले.

समग्र शिक्षा अभियानात २.३.५ व १० टक्के निधी खर्चाबाबत कोणताच ताळमेळ नाही. मागील तीन वर्षांपासून यावर काही निर्णय होत नाही. यात १.६३ कोटींचा अपहार झाल्याची भीती असून, यात कारवाईची मागणी चौतमल यांनी केली. त्यावर ज्यांनी अहवाल दिला नाही, अशा गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कळमनुरी पंचायत समितीच्या सभापती पंचफुलाबाई बेले यांनी ११ फेब्रुवारीची पं.स.ची सभा गोंधळामुळे तहकूब केली असताना प्रभारी गटविकास अधिकारी आंधळे यांनी ती पूर्ण केल्याचा आरोप केला. यावरून वातावरण चांगलेच तापले होते. हा महिला पदाधिकाऱ्याचा अपमान असल्याचा आरोप करून सतीश पाचपुते, अजित मगर, भैय्या देशमुख, प्रल्हाद राखोंडे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. आंधळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवा व त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला पाठवा, असा ठराव घेण्याची मागणी केली. यावर अध्यक्षांनी चौकशी करून निलंबनाचा प्रस्ताव पाठवू, असे सांगितले, तर शिक्षकाने आचारसंहितेचा भंग केल्यानंतरही त्याचा अहवाल बीडीओ आंधळे हे पाठवत नसून, अध्यक्षांसमक्ष वारंवार खोटे बोलत असल्याचा आरोप केला. यातही सात दिवसांत अहवाल देण्यास आदेशित केले. त्यानंतर मगर यांनीही घोळवा येथील एका प्रकरणातही बीडीओंची दिरंगाई असल्याचे समोर आणले. त्यानंतर मात्र अध्यक्ष बेले संतापले. तुमचं काय... काय... निस्तरायचं, असा थेट सवाल करून उत्तर द्यायला भाग पाडले. यात सेनेकडून बीडीओंना सांभाळले जात होते, तर काँग्रेसची मंडळी तेवढ्याच पोटतिडकीने बीडीओंंवर आक्रमण करीत होती. रस्ते विकास आराखड्यावरून अंकुश आहेर व अनिल पतंगे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तर यातील कामांचे काय, असा सवाल केला.

रामेश्वर तांडा व दांडेगाव येथील बंधाऱ्यांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ११ महिन्यांची मुदत असताना ९ महिन्यांतच कामे रद्द केल्याने यावरून जि.प. सदस्य साळुंके व राखोंडे यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, समितीला हा अधिकार असल्याचे सांगून पदाधिकारी रेटून नेत होते. त्यावर सदस्य आक्रमक झाल्याने एक बंधारा यंदा घेऊ, असे अध्यक्षांनी सांगितले.