शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

मराठवाड्यात गोदावरी-मांजरा खोऱ्यात १ कोटी बांबूलागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:15 IST

बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना एक ते अडीच लाखांचे उत्पादन मिळू शकते.

ठळक मुद्देइथेनॉलची मागणी हळूहळू वाढणारक्रेडाने सांगितलेला धोका ओळखा

- विजय पाटील

हिंगोली : सध्या पर्यावरण समतोलासाठीच नव्हे, तर शेतकऱ्यांना आपले आर्थिक उत्पादन वाढविण्यासाठी बांबू लागवड ही काळाची गरज आहे. मराठवाड्यात गोदावरी व मांजरा खोऱ्यातील सर्व नद्यांच्या दोन्ही तटांवर मिळून ५ हजार किमीत १ कोटी बांबू लागवडीचा संकल्प असल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयाेगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

याबाबत जनजागृतीसाठी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पटेल यांनी झाडच ऑक्सिजन, पाणी, इंधन देते. जमिनीची धूप थांबविते. मात्र मराठवाड्यात जंगलाचे प्रमाण अवघे २.५ टक्के आहे. ते ३३ टक्के अपेक्षित आहे. यामुळे मराठवाड्याला वाळवंट म्हटले जात आहे. आता ढगफुटीचा प्रदेश बनत आहे. वृक्षलागवड वाढण्यासाठी केंद्र शासनाच्या बांबू लागवड मिशनमध्ये मागील दोन वर्षांपासून जागृती करीत आहे. मराठवाड्याने यात आदर्श निर्माण करून देशात यासारखे प्रयत्न व्हावेत, असा प्रयत्न आहे. मराठवाड्यात गोदावरी व मांजरा नदीच्या एका तटाकडील लांबी २२५० किमी आहे. दोन्ही तटांवर १ कोटी झाडे लावता येतील. याचे मोठे फायदे होतील.

बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना एक ते अडीच लाखांचे उत्पादन मिळू शकते. १९२७ च्या वनकायद्यानुसार बांबू तोडता येत नव्हता. २०१७ ला मोदी सरकारने त्याला गवतवर्गीय पीक म्हटले. त्यामुळे तोडणी व वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. बांबूपासून फर्निचर, कागद, कापड, इंधन, चहासुद्धा तयार होतो. इतरही अनेक बाबी तयार होतात. त्यामुळे बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र त्याची माहिती लोकांना नसल्याने आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनी भरविली होती. मराठवाड्यात विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाला सहकार्य केल्याने बांबू मिशन चळवळ बनत आहे. यात शेतकऱ्यांनी रोपट्यांसाठी सर्वाधिक नोंदणी केली आहे.

इथेनॉलची मागणी हळूहळू वाढणारसध्या पेट्राेल व डिझेलमध्ये २० टक्के इथेनॉल वापरण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली. त्यासाठी बांबू फायदेशीर आहे. दरवर्षी ७ लाख कोटी रुपयांचे हे इंधन भारताला लागते. ते आयात करावे लागते. बांबू उत्पादनात निम्मा देशही उतरला तरीही ही गरज भागणार नाही. त्यामुळे बांबू लागवड कधीही फायद्याचीच ठरणार आहे.

क्रेडाने सांगितलेला धोका ओळखाजर वृक्षलागवड वाढली नाही तर ग्लोबल वाॅर्मिंगचा फटका जगाला बसणार आहे. क्रेडा या पर्यावरणविषयक अभ्यासक संस्थेने २०३० पर्यंत परिस्थिती अशीच राहिली तर सर्व प्रकारची उत्पादने ४० टक्क्यांनी घटणार असे सांगितले. दूध, धान्य मग आणायचे कुठून? नद्या आटतील, हिमनग संपुष्टात येतील. त्यासाठी वृक्षलागवड अतिशय महत्त्वाची आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPasha Patelपाशा पटेलHingoliहिंगोली