शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘ती’ दुरुस्ती कोणत्या निधीतून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:31 IST

भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्ते फोडणे अनिवार्य होते. मात्र त्यातील काहींची दुरुस्ती होत आहे आणि काही रस्ते मात्र तसेच सोडून दिल्याने चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. होणाऱ्या या दुजाभावाबद्दल आता नागरिकांतूनच बोंब उठत असून नेमके कोणत्या निधीतून हे काम होतेय, हे कळायला मार्ग नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्ते फोडणे अनिवार्य होते. मात्र त्यातील काहींची दुरुस्ती होत आहे आणि काही रस्ते मात्र तसेच सोडून दिल्याने चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. होणाऱ्या या दुजाभावाबद्दल आता नागरिकांतूनच बोंब उठत असून नेमके कोणत्या निधीतून हे काम होतेय, हे कळायला मार्ग नाही.हिंगोली शहरात भूमिगत गटार योजनेचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. काही भागात लेव्हल जुळविण्यासाठी प्रचंड खोदकाम करावे लागल्याने कामास विलंब होत गेला. त्यातच खाली काळा पाषाण लागल्याने नागरि वस्तीत ब्लास्टिंगही करणे शक्य नव्हते. त्यामुळे या हतबलतेत आदर्श महाविद्यालय परिसर व रिसाला बाजार भागातील नागरिकांनी मोठा त्रास सहन केला. तरीही अजून रिसाला बाजार भागातील काम बाकी आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर पूर्वीचे काम पूर्ण केल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.आता शिवाजीनगर भागातील नागरिकांनी नवीनच प्रश्न समोर आणला आहे. शहरातील शास्त्रीनगर भागात भूमिगत गटार योजनेसाठी खोदकाम केले अन् चिखल होऊ नये, याची काळजी घेताना त्यावर सिमेंट रस्ता टाकून दुरुस्ती केली. मग आमच्या भागात का नाही, असा त्यांचा सवाल आहे. शिवाजीनगरच नव्हे, तर इतरही भागांत रस्ते चिखलमयच आहेत. मग याच भागातील दुरुस्ती नेमकी कोणत्या निधीतून झाली, हे न.प. प्रशासन व पदाधिकाºयांनी जाहीर करण्याची नागरिकांची मागणी आहे. याबाबत तोंडी तक्रारी होत असल्या तरीही लेखी कुणीच करीत नसल्याची बोंब आहे.सगळीकडेच होणार कामे- मुख्याधिकारी४दरम्यान, भूमिगत गटार योजनेचे काम झालेल्या सर्वच भागांतील रस्त्यांची दुरुस्ती होणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. सध्या मात्र ज्या भागात अत्यंत गरज आहे, अशाच भागातील काही कामे केली आहेत.उन्हाळाभर कोणतीच हालचाल न करता पालिकेचा पावसाळ्याच्या तोंडावर आलेला रस्तेदुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी फेटाळला. कामाचा दर्जा राहावा, यासाठी हा योग्य काळ नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcity chowkसिटी चौक