शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

भारत जोडो यात्रेत दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण; आठवणीत राहुल गांधी झाले भावूक

By सुमेध उघडे | Updated: November 11, 2022 20:20 IST

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात आज पाचवा दिवस असून आज हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश केला आहे.

कळमनुरी ( हिंगोली): खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रा आज दुपारी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. नांदेड-हिंगोली सीमेवर भव्य प्रवेशद्वार उभा करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, काही अंतरांवर गेल्यानंतर खा. राहुल गांधी यांनी कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले. यावेळी हिंगोलीचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण करत खा. राहुल भावूक झाले. जुने सहकारी राजीव सातव यांचे खा. राहुल आणि गांधी कुटुंबासोबत जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचा उल्लेख निघताच पदयात्रेतील अनेकांनी सातव यांची उणीव जाणून येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

सातव आणि गांधी कुटुंबात अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माजीमंत्री रजनी सातव यांनी १९८० ते ९० दरम्यान या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र राजीव २००९ मध्ये येथून आमदार झाले. दरम्यान, राजीव सातव हे युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदापासून राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात आले. अल्पवधीतच त्यांनी राज्यभर कामाचा ठसा उमटवला. राज्य युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदानंतर त्यांनी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील सांभाळले. त्यांनी हिंगोली लोकसभेची २०१४ ची निवडणूक लढवली. मोदी लाटेत देखील ते निवडणून आले होते. यावेळी पूर्व नियोजित नसताना देखील राहुल गांधी यांनी हिंगोलीत सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी गुजरात विधानसभा प्रभारी म्हणून पक्षाला मोठे यश प्राप्त करून दिले. राजकीय क्षितिजावर  प्रभावी कार्य सुरु असताना कोरोना काळात १६ मे २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. सातव यांचे अकाली निधन गांधी परिवार, कॉंग्रेस यांच्यासह अनेकांना धक्का होता. 

राजीव सातव यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवतेतरुण, तडफदार राजीव सातव राष्ट्रीय राजकारणात राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे होते. यामुळेच आज भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात आली असता खा. राहुल यांना आपल्या जुन्या सहकाऱ्याची आठवण दाटून आली. राजीव सातव आपल्यात नाहीत. त्यांची आज आठवण येत आहे, असे बोलून खा. राहुल भावूक झाले. देशभरात भारत जोडो यात्रेने खा. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाला वेगळी ओळख करून दिली आहे. पक्ष संकटात असताना अनेक जुने नेते सोडून गेले. विरोधक अत्यंत आक्रमक व्यूहरचना आखत असताना खा. राहुल गांधी यांना अत्यंत विश्वासू अशा राजीव सातव यांची कमतरता जाणवत असेल यात शंका नाही. यात्रेत त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते अशा भावना पदयात्रेत सहभागींनी व्यक्त केल्या. दरम्यान, दिवंगत राजीव सातव यांच्या कळमनुरी येथील समाधीचे खा. राहुल गांधी दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. 

सातव यांच्या निधानावेळी राहुल गांधी म्हणाले होते...काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, "राजीव सातव यांच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. ते खूप ताकदीचे नेते होते. हा आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे." काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं, "आम्ही आमचा हुशार सहकारी गमावला आहे. ते मनानं अगदी निर्मळ होते. काँग्रेस पक्षाच्या मूल्यांशी ते घनिष्ठ होते. तसंच भारताच्या जनतेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतलं होतं. माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांची पत्नी आणि मुलांसाठी मी प्रार्थना करते." दरम्यान, राजीव सताव यांच्या निधनानंतर गांधी कुटुंब सातव कुटुंबाच्या कायम संपर्कात आहे. राजीव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव सध्या विधानपरिषद आमदार आहेत. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीRajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसHingoliहिंगोली