शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

'पुनर्वसन करा, अन्यथा आत्मदहनाशिवाय पर्याय नाही!'; अतिक्रमणधारकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 14:16 IST

जलेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करून देण्यात येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हिंगोली नगरपालिकेकडून अतिक्रमणधारकांना आश्वासन दिले होते.

ठळक मुद्दे महसूल प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावेत अशा सूचना जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटणार हे निश्चित झाले आहे.

हिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाकाठावील अतिक्रमण धारकांना महसूल प्रशासनाच्या वतीने नोटिस बजावल्या आहेत. जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी अडसर ठरत असलेले अतिक्रमणे प्रशासनाकडून पाडली जाणार आहेत. सदर कार्यवाहीसाठी प्रशासनाकडून नियोजनही सुरू आहे. तलावाच्या काठावरील १९५ जणांना नोटिस दिल्या आहेत. परंतु आमचे पुनर्वसन करा नंतरच अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसाठी १३ फेबु्रवारी रोजी येथील नागरिकांनी प्रथम भाजपा कार्यालय व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.  

‘जलेश्वर’ तलावाच्या काठची अतिक्रमणे हटविणार !

हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे १३ फेबु्रवारी रोजी नागरिकांनी प्रथम भाजप कार्यालयात जाऊन आ. तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिक्रमणधारक एकत्रित जमले होते. आमचे पुनर्वसन करून द्यावे, त्यानंतरच अतिक्रमण हटवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

जलेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करून देण्यात येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हिंगोली नगरपालिकेकडून अतिक्रमणधारकांना आश्वासन दिले होते. शिवाय पर्यायी जागेचा प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. परंतु अद्याप त्यावर ठोस कुठलाच निर्णय लागला नाही. त्यात महसूल प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावेत अशा सूचना देऊन नोटिसाही देण्यात आल्या. परंतु कोणीही अतिक्रमण काढून घेतले नसल्यामुळे आता अतिक्रमणे हटविण्याच्या जलदगतीने कार्यवाही सुरू असून याबाबत प्रशासनातर्फे याबाबत वेळोवेळी बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटणार हे निश्चित झाले आहे. असे असले तरी येथील नागरिक पुनर्वसनाची मागणी करीत आहेत. बेघर झाल्यास आम्ही जावे कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु सदर अतिक्रमण हटविण्याची तयारी मात्र प्रशासनाकडून सुरू आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणHingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली