शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

चुकारे मिळाले नसले तरी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:52 IST

येथील कृउबामध्ये खरेदी -विक्री संघाच्या माध्यमातून टक्केवारीवर नाफेडने शेतीमालाची खरेदी सुरु केली होती. परंतु येथे खरेदी केंद्रावर गोंधळ झाल्याने विकलेल्या मालाचे शेतक-यांना अद्याप चुकारेच मिळालेले नसले तरीही नवीन तूर नोंदणी नियमाने सुरु झाली आहे. त्यामुळे माल विक्री करणारे शेतकरी अजूनही चिंताग्रस्तच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृउबामध्ये खरेदी -विक्री संघाच्या माध्यमातून टक्केवारीवर नाफेडने शेतीमालाची खरेदी सुरु केली होती. परंतु येथे खरेदी केंद्रावर गोंधळ झाल्याने विकलेल्या मालाचे शेतक-यांना अद्याप चुकारेच मिळालेले नसले तरीही नवीन तूर नोंदणी नियमाने सुरु झाली आहे. त्यामुळे माल विक्री करणारे शेतकरी अजूनही चिंताग्रस्तच आहेत.खरेदी-विक्री संघाकडे माल विक्री करण्यासाठी ४ हजारांवर शेतक-यांची नोंदणी झाली होती. मात्र खरेदी केंद्रावर झालेल्या गोंधळामुळे नोंदणी केलेल्यांंपैकी अनेक शेतकºयांनी खाजगी बाजारात शेतीमालाची विक्री केली. येथे मूग १ हजार ५९२ , उडीद ३ हजार ८२०.५० आणि सोयाबीन ४३२. ५० क्विंटल खरेदी केली आहे. अजूनही शेतकºयांच्या हाती चुकारे पडलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या ठिकाणी झालेल्या अंतर्गत वादामुळे शेतकºयांची मोठी हेळसांड झाली आहे.या ठिकाणी मुक्काम करुन व उपाशीपोटी राहून तुरीची विक्री केली होती. त्यांना अद्याप चुकारेच मिळाले नाहीत. गोंधळ झाल्यानंतर खरेदी कृउबाकडे सोपविण्यात आली होती. परंतु चुकारे मिळालेले नसले तरीही या ठिकाणी तुरीची नवीन नोंदणी सुरु केली आहे. येथे आतापर्यंत १२०० शेतकºयांची तूर विक्रीसाठी नोंदणी झाली आहे. येथे चकरा मारुन शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वातावरणातील बदलामुळे तुरीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षीच तूर खरेदी करताना मोठे राजकारण झाले होते. ते अजूनही मिटलेले नसल्याने, तूर विक्री केलेल्या शेतकºयांच्या हाती तूर विक्रीचे धनादेश पडलेला नाही. त्यामुळे यावर्षीतूर विक्री करण्यासाठी शेतकरी पेचात सापडले आहेत. यंदाही वातावरणातील बदलामुळे क्विंटलाच्या ठिकाणी किलोने मोजण्याइतकीच तूर शेतकºयांच्या पदरात पडत आहेत. ती विकण्यासाठी शेतकºयांसमोर मोठा प्रश्न पडला आहे.मागील वर्षी मोठा त्रास सहन करून विक्री केलेल्या तुरीचे चुकारे वेळीच देण्याची मागणी शेतकºयांच्या वतीने केली जात असली तरीही त्याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.