शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चुकारे मिळाले नसले तरी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:52 IST

येथील कृउबामध्ये खरेदी -विक्री संघाच्या माध्यमातून टक्केवारीवर नाफेडने शेतीमालाची खरेदी सुरु केली होती. परंतु येथे खरेदी केंद्रावर गोंधळ झाल्याने विकलेल्या मालाचे शेतक-यांना अद्याप चुकारेच मिळालेले नसले तरीही नवीन तूर नोंदणी नियमाने सुरु झाली आहे. त्यामुळे माल विक्री करणारे शेतकरी अजूनही चिंताग्रस्तच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृउबामध्ये खरेदी -विक्री संघाच्या माध्यमातून टक्केवारीवर नाफेडने शेतीमालाची खरेदी सुरु केली होती. परंतु येथे खरेदी केंद्रावर गोंधळ झाल्याने विकलेल्या मालाचे शेतक-यांना अद्याप चुकारेच मिळालेले नसले तरीही नवीन तूर नोंदणी नियमाने सुरु झाली आहे. त्यामुळे माल विक्री करणारे शेतकरी अजूनही चिंताग्रस्तच आहेत.खरेदी-विक्री संघाकडे माल विक्री करण्यासाठी ४ हजारांवर शेतक-यांची नोंदणी झाली होती. मात्र खरेदी केंद्रावर झालेल्या गोंधळामुळे नोंदणी केलेल्यांंपैकी अनेक शेतकºयांनी खाजगी बाजारात शेतीमालाची विक्री केली. येथे मूग १ हजार ५९२ , उडीद ३ हजार ८२०.५० आणि सोयाबीन ४३२. ५० क्विंटल खरेदी केली आहे. अजूनही शेतकºयांच्या हाती चुकारे पडलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या ठिकाणी झालेल्या अंतर्गत वादामुळे शेतकºयांची मोठी हेळसांड झाली आहे.या ठिकाणी मुक्काम करुन व उपाशीपोटी राहून तुरीची विक्री केली होती. त्यांना अद्याप चुकारेच मिळाले नाहीत. गोंधळ झाल्यानंतर खरेदी कृउबाकडे सोपविण्यात आली होती. परंतु चुकारे मिळालेले नसले तरीही या ठिकाणी तुरीची नवीन नोंदणी सुरु केली आहे. येथे आतापर्यंत १२०० शेतकºयांची तूर विक्रीसाठी नोंदणी झाली आहे. येथे चकरा मारुन शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वातावरणातील बदलामुळे तुरीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षीच तूर खरेदी करताना मोठे राजकारण झाले होते. ते अजूनही मिटलेले नसल्याने, तूर विक्री केलेल्या शेतकºयांच्या हाती तूर विक्रीचे धनादेश पडलेला नाही. त्यामुळे यावर्षीतूर विक्री करण्यासाठी शेतकरी पेचात सापडले आहेत. यंदाही वातावरणातील बदलामुळे क्विंटलाच्या ठिकाणी किलोने मोजण्याइतकीच तूर शेतकºयांच्या पदरात पडत आहेत. ती विकण्यासाठी शेतकºयांसमोर मोठा प्रश्न पडला आहे.मागील वर्षी मोठा त्रास सहन करून विक्री केलेल्या तुरीचे चुकारे वेळीच देण्याची मागणी शेतकºयांच्या वतीने केली जात असली तरीही त्याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.