शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपमध्ये बंडखोरी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:33 IST

शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.मागील काही दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये इनकमींग जोरात होते. त्यातही शिवसेनेत जुनेच कमी नव्हते म्हणून त्यांनी नव्यांना विधानसभेच्या दृष्टीने पक्षात घेण्याचे हिंगोली वगळता इतरत्र टाळलेच. मात्र भाजपला हिंगोली वगळता इतरत्र कोणताच चेहरा नसल्याने मागच्या विधानसभेपासून सुरू असलेले इनकमींग अजूनही सुरूच आहे. शिवसेना व भाजपमध्ये सर्वाधिक वादाची ठिणगी पडलेली आहे ती कळमनुरी व वसमत या सेनेच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये. हे दोन्ही मतदारसंघ सेनेकडून हिसकावण्यासाठी भाजपची साम, दाम, दंड, भेदची नीती दिसत आहे. मात्र कळमनुरीत त्यातही अडचण आहे. हा मतदारसंघ आम्हाला सोडा म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अडून बसले आहेत. युती झाली अन् रासपला मतदारसंघ सुटला तर विनायक भिसे यांना उमेदवारी मिळते की ऐनवेळी उमेदवार आयात केला जातो, हा वेगळाच प्रश्न आहे. मात्र त्यानंतर सेनेचे संतोष बांगर, भाजपचे अ‍ॅड.शिवाजी माने, गजानन घुगे, डॉ.जयदीप देशमुख यांना लढल्याशिवाय चैन पडेल, असे दिसत नाही. युती नाही झाली तरीही भाजपऐवजी रासप आली तर हा प्रश्न पुन्हा भाजपीयांसमोर कायमच राहणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ किमान एक ते दोन बंडखोरांना जन्म घालण्याची चिन्हे आहेत.वसमतमलाही वेगळे चित्र नाही. युती झाली तर ही जागा अ‍ॅड. शिवाजी जाधव यांच्यासाठी भाजप सोडवून घेणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. मग सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा गप्प बसणे शक्यच नाही. तर काहीजण जाधव यांचे सेनेचे खा.हेमंत पाटील यांच्याशी लोकसभेला सख्य वाढल्याने जाधवच सेनेचे उमेदवार असतील, असेही सांगू लागले आहेत. दुसरे म्हणजे पंचायत समितीच्या बांधकामाच्या निविदा उघडण्यास विरोधासाठी भाजपच्या मंडळींना मदत म्हणून खा.पाटील यांचेही पत्र होतेच. यामुळे आ.मुंदडा व खा.पाटील एका मंचावर बसून हसतमुखाने टाळी देत असले तरीही ओठात एक अन् पोटात एक अशी गत आहे. जाधव यांच्या नावाचा मात्र अनेकदा खेळण्याप्रमाणे सोयीस्कर वापर होत आला आहे. शेवटी सगळ्याच आघाड्यांवर फासे उलटे पडले तरीही जाधव अपक्ष लढतील. ते स्वत:च हे सांगत आहेत.यावरून वसमत व कळमनुरीत भाजप शिवसेनेशी वेगळाच गेम खेळत असल्याचेही नाकारता येत नाही. हिंगोलीत सेनेकडून रुपाली पाटील गोरेगावकर या इच्छुक असल्या तरीही त्यांची तिकिटावरच भिस्त दिसत आहे. अपक्ष म्हणून त्या लढतील व भाजप इतर ठिकाणी वापरत असलेल्या रणनीतीप्रमाणेच डाव देतील, अशी चिन्हे नाहीत. सेना दबावतंत्र म्हणूनही कुठे हे शस्त्र वापरताना दिसत नाही.... तर पक्षश्रेष्ठी दखल घेणारशिवसेनेच्या जागांवर दावा करून आम्हीच येथे विजयी होण्यासारखी स्थिती असल्याचे भाजप सांगत आहे. मात्र सेनेने जागा सोडणेच शक्य नसल्याने जर अशा ठिकाणी भाजपच्या कुणी बंडखोरी केली तर युतीधर्माला कलंक लागणार आहे. अशावेळी पक्षश्रेष्ठी दखल घेणार का? हा प्रश्न आहे.युती झाली तर युतीचा धर्म पाळू असे शिवसेनेकडून तरी ऐकायला मिळते. भाजपची मंडळी तसे काहीच बोलत नाही. मात्र जेथे अन्यायच झाल्याचे स्पष्ट चित्र दिसेल, तेथे शिवसेनेच्या कुणी बंडखोरी तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही.पक्षीय तिकिटांसाठी सेना-भाजपमध्ये मारामार चालली असली तरीही मतदारांच्या मनात काय चालले, याचा अजून थांग लागत नाही. युतीला जेवढे सोपे वाटते तेवढे तरी ग्रामीण भागातील प्रतिक्रियांवरून दिसत नाही. शहरी भागातील झगमगाटावरून काढलेल्या अनुमानातूनच काहीजण लावत असलेले अंदाजही चुकण्याची भीती आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक