शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

सेना-भाजपमध्ये बंडखोरी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:33 IST

शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.मागील काही दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये इनकमींग जोरात होते. त्यातही शिवसेनेत जुनेच कमी नव्हते म्हणून त्यांनी नव्यांना विधानसभेच्या दृष्टीने पक्षात घेण्याचे हिंगोली वगळता इतरत्र टाळलेच. मात्र भाजपला हिंगोली वगळता इतरत्र कोणताच चेहरा नसल्याने मागच्या विधानसभेपासून सुरू असलेले इनकमींग अजूनही सुरूच आहे. शिवसेना व भाजपमध्ये सर्वाधिक वादाची ठिणगी पडलेली आहे ती कळमनुरी व वसमत या सेनेच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये. हे दोन्ही मतदारसंघ सेनेकडून हिसकावण्यासाठी भाजपची साम, दाम, दंड, भेदची नीती दिसत आहे. मात्र कळमनुरीत त्यातही अडचण आहे. हा मतदारसंघ आम्हाला सोडा म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अडून बसले आहेत. युती झाली अन् रासपला मतदारसंघ सुटला तर विनायक भिसे यांना उमेदवारी मिळते की ऐनवेळी उमेदवार आयात केला जातो, हा वेगळाच प्रश्न आहे. मात्र त्यानंतर सेनेचे संतोष बांगर, भाजपचे अ‍ॅड.शिवाजी माने, गजानन घुगे, डॉ.जयदीप देशमुख यांना लढल्याशिवाय चैन पडेल, असे दिसत नाही. युती नाही झाली तरीही भाजपऐवजी रासप आली तर हा प्रश्न पुन्हा भाजपीयांसमोर कायमच राहणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ किमान एक ते दोन बंडखोरांना जन्म घालण्याची चिन्हे आहेत.वसमतमलाही वेगळे चित्र नाही. युती झाली तर ही जागा अ‍ॅड. शिवाजी जाधव यांच्यासाठी भाजप सोडवून घेणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. मग सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा गप्प बसणे शक्यच नाही. तर काहीजण जाधव यांचे सेनेचे खा.हेमंत पाटील यांच्याशी लोकसभेला सख्य वाढल्याने जाधवच सेनेचे उमेदवार असतील, असेही सांगू लागले आहेत. दुसरे म्हणजे पंचायत समितीच्या बांधकामाच्या निविदा उघडण्यास विरोधासाठी भाजपच्या मंडळींना मदत म्हणून खा.पाटील यांचेही पत्र होतेच. यामुळे आ.मुंदडा व खा.पाटील एका मंचावर बसून हसतमुखाने टाळी देत असले तरीही ओठात एक अन् पोटात एक अशी गत आहे. जाधव यांच्या नावाचा मात्र अनेकदा खेळण्याप्रमाणे सोयीस्कर वापर होत आला आहे. शेवटी सगळ्याच आघाड्यांवर फासे उलटे पडले तरीही जाधव अपक्ष लढतील. ते स्वत:च हे सांगत आहेत.यावरून वसमत व कळमनुरीत भाजप शिवसेनेशी वेगळाच गेम खेळत असल्याचेही नाकारता येत नाही. हिंगोलीत सेनेकडून रुपाली पाटील गोरेगावकर या इच्छुक असल्या तरीही त्यांची तिकिटावरच भिस्त दिसत आहे. अपक्ष म्हणून त्या लढतील व भाजप इतर ठिकाणी वापरत असलेल्या रणनीतीप्रमाणेच डाव देतील, अशी चिन्हे नाहीत. सेना दबावतंत्र म्हणूनही कुठे हे शस्त्र वापरताना दिसत नाही.... तर पक्षश्रेष्ठी दखल घेणारशिवसेनेच्या जागांवर दावा करून आम्हीच येथे विजयी होण्यासारखी स्थिती असल्याचे भाजप सांगत आहे. मात्र सेनेने जागा सोडणेच शक्य नसल्याने जर अशा ठिकाणी भाजपच्या कुणी बंडखोरी केली तर युतीधर्माला कलंक लागणार आहे. अशावेळी पक्षश्रेष्ठी दखल घेणार का? हा प्रश्न आहे.युती झाली तर युतीचा धर्म पाळू असे शिवसेनेकडून तरी ऐकायला मिळते. भाजपची मंडळी तसे काहीच बोलत नाही. मात्र जेथे अन्यायच झाल्याचे स्पष्ट चित्र दिसेल, तेथे शिवसेनेच्या कुणी बंडखोरी तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही.पक्षीय तिकिटांसाठी सेना-भाजपमध्ये मारामार चालली असली तरीही मतदारांच्या मनात काय चालले, याचा अजून थांग लागत नाही. युतीला जेवढे सोपे वाटते तेवढे तरी ग्रामीण भागातील प्रतिक्रियांवरून दिसत नाही. शहरी भागातील झगमगाटावरून काढलेल्या अनुमानातूनच काहीजण लावत असलेले अंदाजही चुकण्याची भीती आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक