शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपमध्ये बंडखोरी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:33 IST

शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.मागील काही दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये इनकमींग जोरात होते. त्यातही शिवसेनेत जुनेच कमी नव्हते म्हणून त्यांनी नव्यांना विधानसभेच्या दृष्टीने पक्षात घेण्याचे हिंगोली वगळता इतरत्र टाळलेच. मात्र भाजपला हिंगोली वगळता इतरत्र कोणताच चेहरा नसल्याने मागच्या विधानसभेपासून सुरू असलेले इनकमींग अजूनही सुरूच आहे. शिवसेना व भाजपमध्ये सर्वाधिक वादाची ठिणगी पडलेली आहे ती कळमनुरी व वसमत या सेनेच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये. हे दोन्ही मतदारसंघ सेनेकडून हिसकावण्यासाठी भाजपची साम, दाम, दंड, भेदची नीती दिसत आहे. मात्र कळमनुरीत त्यातही अडचण आहे. हा मतदारसंघ आम्हाला सोडा म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अडून बसले आहेत. युती झाली अन् रासपला मतदारसंघ सुटला तर विनायक भिसे यांना उमेदवारी मिळते की ऐनवेळी उमेदवार आयात केला जातो, हा वेगळाच प्रश्न आहे. मात्र त्यानंतर सेनेचे संतोष बांगर, भाजपचे अ‍ॅड.शिवाजी माने, गजानन घुगे, डॉ.जयदीप देशमुख यांना लढल्याशिवाय चैन पडेल, असे दिसत नाही. युती नाही झाली तरीही भाजपऐवजी रासप आली तर हा प्रश्न पुन्हा भाजपीयांसमोर कायमच राहणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ किमान एक ते दोन बंडखोरांना जन्म घालण्याची चिन्हे आहेत.वसमतमलाही वेगळे चित्र नाही. युती झाली तर ही जागा अ‍ॅड. शिवाजी जाधव यांच्यासाठी भाजप सोडवून घेणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. मग सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा गप्प बसणे शक्यच नाही. तर काहीजण जाधव यांचे सेनेचे खा.हेमंत पाटील यांच्याशी लोकसभेला सख्य वाढल्याने जाधवच सेनेचे उमेदवार असतील, असेही सांगू लागले आहेत. दुसरे म्हणजे पंचायत समितीच्या बांधकामाच्या निविदा उघडण्यास विरोधासाठी भाजपच्या मंडळींना मदत म्हणून खा.पाटील यांचेही पत्र होतेच. यामुळे आ.मुंदडा व खा.पाटील एका मंचावर बसून हसतमुखाने टाळी देत असले तरीही ओठात एक अन् पोटात एक अशी गत आहे. जाधव यांच्या नावाचा मात्र अनेकदा खेळण्याप्रमाणे सोयीस्कर वापर होत आला आहे. शेवटी सगळ्याच आघाड्यांवर फासे उलटे पडले तरीही जाधव अपक्ष लढतील. ते स्वत:च हे सांगत आहेत.यावरून वसमत व कळमनुरीत भाजप शिवसेनेशी वेगळाच गेम खेळत असल्याचेही नाकारता येत नाही. हिंगोलीत सेनेकडून रुपाली पाटील गोरेगावकर या इच्छुक असल्या तरीही त्यांची तिकिटावरच भिस्त दिसत आहे. अपक्ष म्हणून त्या लढतील व भाजप इतर ठिकाणी वापरत असलेल्या रणनीतीप्रमाणेच डाव देतील, अशी चिन्हे नाहीत. सेना दबावतंत्र म्हणूनही कुठे हे शस्त्र वापरताना दिसत नाही.... तर पक्षश्रेष्ठी दखल घेणारशिवसेनेच्या जागांवर दावा करून आम्हीच येथे विजयी होण्यासारखी स्थिती असल्याचे भाजप सांगत आहे. मात्र सेनेने जागा सोडणेच शक्य नसल्याने जर अशा ठिकाणी भाजपच्या कुणी बंडखोरी केली तर युतीधर्माला कलंक लागणार आहे. अशावेळी पक्षश्रेष्ठी दखल घेणार का? हा प्रश्न आहे.युती झाली तर युतीचा धर्म पाळू असे शिवसेनेकडून तरी ऐकायला मिळते. भाजपची मंडळी तसे काहीच बोलत नाही. मात्र जेथे अन्यायच झाल्याचे स्पष्ट चित्र दिसेल, तेथे शिवसेनेच्या कुणी बंडखोरी तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही.पक्षीय तिकिटांसाठी सेना-भाजपमध्ये मारामार चालली असली तरीही मतदारांच्या मनात काय चालले, याचा अजून थांग लागत नाही. युतीला जेवढे सोपे वाटते तेवढे तरी ग्रामीण भागातील प्रतिक्रियांवरून दिसत नाही. शहरी भागातील झगमगाटावरून काढलेल्या अनुमानातूनच काहीजण लावत असलेले अंदाजही चुकण्याची भीती आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक