शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'पाऊस लांबला, उत्पादन कमी होणार'; आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने संपविल जीवन

By रमेश वाबळे | Updated: July 18, 2023 16:30 IST

हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील घटना

हिंगोली : नापीकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून ३५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना तालुक्यातील इडोळी येथे १८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. माधव रामजी जाधव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

इडोळी येथील शेतकरी माधव रामजी जाधव कर्जबाजारीपणामुळे मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते. त्यातच यंदा पाऊस लांबल्याने सुमारे वीस दिवस उशिराने पेरण्या झाल्या. त्यामुळे यंदाही उत्पादनावर परिणाम झाल्यास डोईवरील कर्जाचा डोंगर कसा उतरवायचा? असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यातच शेतकरी माधव जाधव यांनी इडोळी येथील आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. ही घटना १८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे इडोळी येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfarmer suicideशेतकरी आत्महत्या