शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात रबीच्या पेरण्यांची उशिराने लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:34 IST

पाऊस लांबल्याने खरिपाचे मोठे नुकसान

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्यांची तयारी आता सुरू केली आहे

- विजय पाटील 

हिंगोली : जिल्ह्यात दिवाळीनंतरही बेमोसमी पावसाचा हाहाकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्यांची तयारी आता सुरू केली आहे. सध्या हरभऱ्याची पेरणी सुरू झाली असून अवघ्या पाच टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यापर्यंत काही भागात पावसाने हजेरी लावली होती. शिवाय तोपर्यंतही खरिपाची पिके काढायला पावसाने संधीच दिली नाही. त्यात मोठे नुकसानही झाले. शिवाय पंचनाम्यांसाठीही शेतकऱ्यांनी शेतातील पीक काढणी व मळणी थांबविली होती. त्यामुळे लांबलेल्या या पावसामुळे रबीच्या पेरण्याची तयारी करण्यासाठी शेतीची मशागत करायलाही शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही. ज्या शेतकऱ्यांचे पीक दिवाळीपूर्वी व अतिवृष्टी होण्यापूर्वी निघाले, अशांचीच पाच टक्क्यांच्या आसपास पेरणी झाली आहे. इतर शेतकरी आता शेतातील पाण्याचा निचरा झाल्याने मशागतीच्या कामाला लागल्याचे दिसत आहे.गतवर्षी केवळ ८९000 हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. यंदा अडीच लाख हेक्टरवर रबीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने गहू ४५ हजार ६२९ हेक्टर, हरभरा १.४८ लाख हेक्टर, रबी ज्वारी १२ हजार ६२३ हेक्टर, रबी मका ३ हजार ८१ हेक्टर, करडई ३६३ हेक्टर, सूर्यफूल १00 हेक्टर क्षेत्रात घेतले जाईल, असा २.१0 लाख हेक्टरवर रबी पेरणी होण्याचा अंदाज आहे.हरभरा, उसाचे क्षेत्र वाढणारतुडुंब भरलेले जलसाठे लक्षात घेता यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर थंडीची चाहूल लागल्याने आता गव्हाचे क्षेत्रही वाढणार आहे. त्यामुळे आणखी चाळीस हजार हेक्टरवर एकतर रबीची पेरणी होईल अन्यथा उसासह इतर पिकांकडे शेतकरी वळतील, असे दिसत आहे. ........... 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र