शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमधील आदिवासींना सुरक्षा द्या; हिंगोलीत आदिवासी युवक कल्याण संघाचे आंदोलन

By विजय पाटील | Updated: July 24, 2023 15:36 IST

मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आंदोलकाकडून करण्यात आली. 

हिंगोली : मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांवर कारवाई करून या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आदिवासी युवक कल्याण संघाच्यावतीने राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले की, ईशान्य भारतातील बहुतांश राज्ये ही आदिवासीबहुल आहेत. जे लोक आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवून आपल्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यांच्यावर सातत्याने अत्याचार केला जात आहे. त्यांच्यावरच नव्हे, तर आज धर्मांध राज्यकर्त्यांच्या काळात संपूर्ण आदिवासी समाज भयभीत झाला आहे. गैरआदिवासींना आदिवासीच्या यादीत टाकण्याचे आश्वासन देत मतदानासाठी असा अट्टाहास केला जात आहे. याच कारणातून मैती व कुकी नाका यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. अनेकांचा बळी गेला. महिलांवर अत्याचार होत आहेत. आदिवासींच्या या वेदना केंद्र सरकारला दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे. मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली. 

या धरणे आंदोलनात माजी आ.संतोष टारफे, माजी जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, डॉ.सतीश पाचपुते, नंदू तोष्णीवाल यांच्यासह आदिवासी समाजातील बहुतांश नेतेमंडळी उपस्थित होती.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारHingoliहिंगोली