शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

उर्वरित शौचालय बांधकामाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:41 IST

२0१२ मध्ये झालेल्या बेसलाईन सर्व्हेतून सुटलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांची संख्या जवळपास २८ हजार ९00 असून त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यास मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : २0१२ मध्ये झालेल्या बेसलाईन सर्व्हेतून सुटलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांची संख्या जवळपास २८ हजार ९00 असून त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यास मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.हिंगोली जिल्हा यावर्षी हागणदारीमुक्त झाला आहे. त्यामुळे आता पुढील टप्प्यात शाश्वत स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये ग्रामीण भागात स्वच्छता हिच सेवा हा उपक्रमही राबविण्यात आला. मात्र बेसलाईन सर्व्हेमध्ये सुटलेल्या लाभार्थ्यांकडे शौचालय नसल्याचा प्रश्न यापूर्वी अनेक बैठकांमध्ये गाजला होता. नंतर तो प्रकर्षाने समोर आला. त्यानंतर पुन्हा सर्व्हे करून यातील संपूर्ण स्वच्छतेत प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र लाभार्थी शोध घेतला जावा, यासाठी जिल्हा परिषदेनेही शासनाला पत्र दिले होते. याबाबत शासनाकडून अखेर पुन्हा सर्व्हे करून याबाबतचा अद्ययावत आराखडा मागविण्यात आला होता. त्यानुसार शासनाला माहिती पाठविण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात तब्बल २८ हजार लाभार्थी शिल्लक राहिल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सचिवास कळविण्यात आली आहे.यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात ४४८0, वसमत तालुक्यात ५५0८, हिंगोलीत-५३0५, कळमनुरीत ६९२६ तर सेनगावात ६७४३ पात्र कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे. २0१२-१३ च्या बेसलाईन सर्व्हेच्या आॅनलाईन माहितीनुसार एकूण कुटुंबांची संख्या १ लाख ८१ हजार एवढी होती. यापैकी शौचालय नसलेल्यांची संख्या १ लाख ३१ हजार ४५७ एवढी होती. तर ५0 हजार ४८ जणांकडे शौचालय होते. ज्यांच्याकडे शौचालय नव्हते. अशांना प्रोत्साहन अनुदान व सततच्या पाठपुराव्यामुळे शौचालय बांधकाम करण्याकडे वळविले. मात्र यातून सुटलेल्या २८ हजार कुटुंबांचा प्रश्न अजूनही कायम आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असला तरीही अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. मंजुरी मिळाल्यास एवढ्या लाभार्थ्यांना अनुदान मिळू शकणार आहे.जिल्ह्यात शौचालय बांधकामासाठीचे ३९ कोटी रुपये रखडले होते. मात्र त्यापैकी १७ कोटी यापूर्वी प्राप्त झाले आहेत. ते अद्याप पंचायत समित्यांना वितरित झाले नव्हते. आज त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांत पं.स.ला हा निधी वर्ग होणार आहे. तर आणखी ३.७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र तो बीडीएस प्रणालीवर प्राप्त झाला नाही. त्यामुळे तो आला की, जवळपास २0 ते २१ कोटी रुपयांचा प्रश्न मिटणार असला तरीही तेवढ्याच निधीची गरज पडणार आहे. या निधीची प्रतीक्षा अजून कायम आहे.बेसलाईनमधून सुटलेल्या पात्र लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न संपूर्ण स्वच्छता अभियान कक्षाकडून केला जात आहे. त्यात तुरळकच प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान