शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

७० गावांतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात ...

स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात निवड झाली आहे. यामध्ये अंदाजपत्रकीय रकमेतील मंजुरीची रक्कम महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून मस्टरद्वारे प्रदान होणार आहे. ही रक्कम वगळता ७० टक्के स्वच्छ भारतकडून, तर ३० टक्के ग्रा.पं.ने १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. ७० ग्रामपंचायतींच्या कामांना ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत निविदा काढून प्रारंभ केला जाणार आहे. यात ५ हजार लोकसंख्येच्या गावास ३४५ रुपये प्रतिव्यक्ती तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावास ७०५ रुपये प्रतिव्यक्ती याप्रमाणे निधी उपलब्ध होणार आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे हा निधी मिळत असल्याने आधीच तो अपुरा आहे. त्यात रोहयो, वित्त आयोगाची सांगड घातल्याने अजून बिकट प्रश्न बनला आहे. त्यातच काही ठिकाणी ग्रा. पं. च्या कामात जि. प. कडून हस्तक्षेप वाढल्याने पेच निर्माण होत आहे.

या योजनेत सध्या २.६३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, तर ४.१८ कोटींची मागणी आहे. केंद्र व राज्याचा मिळून स्वच्छ भारत मिशनचा ६.८१ कोटींचा हिस्सा राहणार आहे. तर १५ व्या वित्त आयोगातून २.९२ कोटी द्यावे लागतील. मनरेगातून मजुरीवर २.४३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. तर ही कामे पूर्ण होऊ शकतात.

या ७० गावांची झाली निवड

हिंगोली तालुक्यात फाळेगाव, सावरगाव बं, खानापूर चित्ता, नर्सी ना., बळसोंड, पेडगाव, पहेनी, बासंबा, आडगाव, कोथळज, पांगरी, इसापूर, साटंबा, खेड, सरकळी, कनका, कळमनुरी तालुक्यात बाभळी, पाळोदी, आखाडा बाळापूर, उमदरवाडी, वारंगा फाटा, वाकोडी, येहळेगाव तु., पोतरा, दांडेगाव, मसोड, बोथी, वारंगा त. नांदापूर, येहळेगाव गवळी, दाती, सेलसुरा, सेनगाव तालुक्यात गोरेगाव, पानकन्हेरगाव, केलसुला, केंद्रा बु., पुसेगाव, कडोळी, जवळा बु., साखरा, ताकतोडा, भानखेडा, कवठा बु., बन, औंढा तालुक्यात पिंपळदरी त. नांदापूर, अनखळी, अंजनवाडी, अजरसोंडा, शिरडशहापूर, भोसी, जलालदाभा, येहळेगाव सोळंके, माथा, उखळी, जडगाव, पूर, सोनवाडी, जवळा बाजार, वसमत तालुक्यातील आरळ, किन्होळा, कुरुंदा, गिरगाव, हट्टा, आंबा, हयातनगर, पांगरा शिंदे, बाभूळगाव, अकोली, आसेगाव, परळी या गावांचा समावेश आहे.

नवीन ३३५ गावांचा आराखडा

जुनीच कामे झाली नसताना नवीन ३३५ गावांचा आराखडा सादर केला आहे. यात औंढा ६२, वसमत ७१, हिंगोली ७०, कळमनुरी ६६, सेनगाव ६६ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यासाठी ३२.७७ कोटी लागणार आहेत. यात स्वच्छ भारत मिशनला १९ कोटी, १५ व्या आयोग ७.५० कोटी तर एमआरईजीएसमध्ये ६.२५ कोटींचा भार उचलावा लागेल.