शहरं
Join us  
Trending Stories
1
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
2
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
3
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
4
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
5
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
6
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
7
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
8
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
9
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
10
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
11
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
12
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
13
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
15
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
16
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
17
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
18
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
19
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
20
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
Daily Top 2Weekly Top 5

७० गावांतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात ...

स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात निवड झाली आहे. यामध्ये अंदाजपत्रकीय रकमेतील मंजुरीची रक्कम महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून मस्टरद्वारे प्रदान होणार आहे. ही रक्कम वगळता ७० टक्के स्वच्छ भारतकडून, तर ३० टक्के ग्रा.पं.ने १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. ७० ग्रामपंचायतींच्या कामांना ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत निविदा काढून प्रारंभ केला जाणार आहे. यात ५ हजार लोकसंख्येच्या गावास ३४५ रुपये प्रतिव्यक्ती तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावास ७०५ रुपये प्रतिव्यक्ती याप्रमाणे निधी उपलब्ध होणार आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे हा निधी मिळत असल्याने आधीच तो अपुरा आहे. त्यात रोहयो, वित्त आयोगाची सांगड घातल्याने अजून बिकट प्रश्न बनला आहे. त्यातच काही ठिकाणी ग्रा. पं. च्या कामात जि. प. कडून हस्तक्षेप वाढल्याने पेच निर्माण होत आहे.

या योजनेत सध्या २.६३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, तर ४.१८ कोटींची मागणी आहे. केंद्र व राज्याचा मिळून स्वच्छ भारत मिशनचा ६.८१ कोटींचा हिस्सा राहणार आहे. तर १५ व्या वित्त आयोगातून २.९२ कोटी द्यावे लागतील. मनरेगातून मजुरीवर २.४३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. तर ही कामे पूर्ण होऊ शकतात.

या ७० गावांची झाली निवड

हिंगोली तालुक्यात फाळेगाव, सावरगाव बं, खानापूर चित्ता, नर्सी ना., बळसोंड, पेडगाव, पहेनी, बासंबा, आडगाव, कोथळज, पांगरी, इसापूर, साटंबा, खेड, सरकळी, कनका, कळमनुरी तालुक्यात बाभळी, पाळोदी, आखाडा बाळापूर, उमदरवाडी, वारंगा फाटा, वाकोडी, येहळेगाव तु., पोतरा, दांडेगाव, मसोड, बोथी, वारंगा त. नांदापूर, येहळेगाव गवळी, दाती, सेलसुरा, सेनगाव तालुक्यात गोरेगाव, पानकन्हेरगाव, केलसुला, केंद्रा बु., पुसेगाव, कडोळी, जवळा बु., साखरा, ताकतोडा, भानखेडा, कवठा बु., बन, औंढा तालुक्यात पिंपळदरी त. नांदापूर, अनखळी, अंजनवाडी, अजरसोंडा, शिरडशहापूर, भोसी, जलालदाभा, येहळेगाव सोळंके, माथा, उखळी, जडगाव, पूर, सोनवाडी, जवळा बाजार, वसमत तालुक्यातील आरळ, किन्होळा, कुरुंदा, गिरगाव, हट्टा, आंबा, हयातनगर, पांगरा शिंदे, बाभूळगाव, अकोली, आसेगाव, परळी या गावांचा समावेश आहे.

नवीन ३३५ गावांचा आराखडा

जुनीच कामे झाली नसताना नवीन ३३५ गावांचा आराखडा सादर केला आहे. यात औंढा ६२, वसमत ७१, हिंगोली ७०, कळमनुरी ६६, सेनगाव ६६ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यासाठी ३२.७७ कोटी लागणार आहेत. यात स्वच्छ भारत मिशनला १९ कोटी, १५ व्या आयोग ७.५० कोटी तर एमआरईजीएसमध्ये ६.२५ कोटींचा भार उचलावा लागेल.