शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

७० गावांतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात ...

स्वच्छ भारत मिशन २०२०-२१ मध्ये ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकडे शासनाने लक्ष वेधले आहे. यात ७० ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात निवड झाली आहे. यामध्ये अंदाजपत्रकीय रकमेतील मंजुरीची रक्कम महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून मस्टरद्वारे प्रदान होणार आहे. ही रक्कम वगळता ७० टक्के स्वच्छ भारतकडून, तर ३० टक्के ग्रा.पं.ने १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. ७० ग्रामपंचायतींच्या कामांना ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत निविदा काढून प्रारंभ केला जाणार आहे. यात ५ हजार लोकसंख्येच्या गावास ३४५ रुपये प्रतिव्यक्ती तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावास ७०५ रुपये प्रतिव्यक्ती याप्रमाणे निधी उपलब्ध होणार आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे हा निधी मिळत असल्याने आधीच तो अपुरा आहे. त्यात रोहयो, वित्त आयोगाची सांगड घातल्याने अजून बिकट प्रश्न बनला आहे. त्यातच काही ठिकाणी ग्रा. पं. च्या कामात जि. प. कडून हस्तक्षेप वाढल्याने पेच निर्माण होत आहे.

या योजनेत सध्या २.६३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, तर ४.१८ कोटींची मागणी आहे. केंद्र व राज्याचा मिळून स्वच्छ भारत मिशनचा ६.८१ कोटींचा हिस्सा राहणार आहे. तर १५ व्या वित्त आयोगातून २.९२ कोटी द्यावे लागतील. मनरेगातून मजुरीवर २.४३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. तर ही कामे पूर्ण होऊ शकतात.

या ७० गावांची झाली निवड

हिंगोली तालुक्यात फाळेगाव, सावरगाव बं, खानापूर चित्ता, नर्सी ना., बळसोंड, पेडगाव, पहेनी, बासंबा, आडगाव, कोथळज, पांगरी, इसापूर, साटंबा, खेड, सरकळी, कनका, कळमनुरी तालुक्यात बाभळी, पाळोदी, आखाडा बाळापूर, उमदरवाडी, वारंगा फाटा, वाकोडी, येहळेगाव तु., पोतरा, दांडेगाव, मसोड, बोथी, वारंगा त. नांदापूर, येहळेगाव गवळी, दाती, सेलसुरा, सेनगाव तालुक्यात गोरेगाव, पानकन्हेरगाव, केलसुला, केंद्रा बु., पुसेगाव, कडोळी, जवळा बु., साखरा, ताकतोडा, भानखेडा, कवठा बु., बन, औंढा तालुक्यात पिंपळदरी त. नांदापूर, अनखळी, अंजनवाडी, अजरसोंडा, शिरडशहापूर, भोसी, जलालदाभा, येहळेगाव सोळंके, माथा, उखळी, जडगाव, पूर, सोनवाडी, जवळा बाजार, वसमत तालुक्यातील आरळ, किन्होळा, कुरुंदा, गिरगाव, हट्टा, आंबा, हयातनगर, पांगरा शिंदे, बाभूळगाव, अकोली, आसेगाव, परळी या गावांचा समावेश आहे.

नवीन ३३५ गावांचा आराखडा

जुनीच कामे झाली नसताना नवीन ३३५ गावांचा आराखडा सादर केला आहे. यात औंढा ६२, वसमत ७१, हिंगोली ७०, कळमनुरी ६६, सेनगाव ६६ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यासाठी ३२.७७ कोटी लागणार आहेत. यात स्वच्छ भारत मिशनला १९ कोटी, १५ व्या आयोग ७.५० कोटी तर एमआरईजीएसमध्ये ६.२५ कोटींचा भार उचलावा लागेल.