शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
2
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
3
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
4
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
7
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
8
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
9
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
10
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
11
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
12
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
13
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
14
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
15
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
16
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
17
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
18
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
19
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
20
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
Daily Top 2Weekly Top 5

न.प.त सभापती निवडीवरून संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:14 IST

गेल्या अनेक वर्षांनंतर येथील नगरपालिकेत नगरसेवकांनी विषय समित्यांच्या निवडीचा आग्रह धरला अन् तो पूर्णत्वासही नेला. मात्र या निवडीत प्रशासनाकडून नगरसेवकांना दोन वेगवेगळ्या बाबी सांगण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राजकीय दबावातून हे कृत्य केले जात असल्याचा आरोप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या अनेक वर्षांनंतर येथील नगरपालिकेत नगरसेवकांनी विषय समित्यांच्या निवडीचा आग्रह धरला अन् तो पूर्णत्वासही नेला. मात्र या निवडीत प्रशासनाकडून नगरसेवकांना दोन वेगवेगळ्या बाबी सांगण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राजकीय दबावातून हे कृत्य केले जात असल्याचा आरोप आहे.हिंगोली नगरपालिकेत यापूर्वी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असल्याने विषय समित्या व इतर बाबींसाठी विरोधकांनीही कधी जोर मारला नव्हता. आता नगराध्यक्ष भाजपचा अन् विरोधकांचे प्रबळ संख्याबळ असे चित्र आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून सत्तासंघर्षाची ठिणगी पडल्याने वातावरणात गरमाहट आहे. परंतु तरीही विरोधकांना सत्ताधाºयांकडून विविध आघाड्यांवर यशस्वीपणे मात देण्याचे काम सुरू आहे. सत्ता विकेंद्रीकरणासाठी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्याचे ठरले. जिल्हाधिकाºयांनी ३१ जानेवारी रोजी काढलेल्या पत्रानुसार ६ फेब्रुवारीला स्थायी व विषय समित्यांची नेमणूक करण्यास सांगितले होते. त्यासाठी पीठासीन अधिकारीही नेमले होते. हिंगोलीत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर हे पीठासीन अधिकारी होते. त्यांनी विषय समित्यांवरील सर्व सदस्यांची निवड केली. मात्र स्थायीवर नगरसेवकांतून नेमायचे तीन सदस्य निवडले असले तरीही सभापतींची निवड नंतर करावी लागणार असल्याचे सांगितल्याचे नगरसेवकांचे म्हणने आहे. तर न.प.चे जिल्हा प्रशासन अधिकारी सोनवणे यांनी मात्र स्थायी समितीवर सर्व सभापती असतात. त्यामुळे त्यांची निवडही याचवेळी होणे अपेक्षित होते, असे सांगितले. मात्र निवडीच्या दिवशी मी नसल्याने असे का घडले, हे माहिती नसल्याचे सांगितले.समित्यांवरील सदस्य निवड करताना काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मीबाई लांडगे यांना कोणत्याही समितीवर प्रतिनिधीत्व मिळाले नाही. आता सभापती झालेल्यांच्या रिक्त होणाºया जागेवर त्यांना संधी देता येणे शक्य आहे. इतरही काहींना एक तर काहींना तीन-तीन समित्या मिळाल्या आहेत.नगरपालिकेच्या विषय समित्यांवरील सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे त्याच दिवशी या समित्यांच्या सभापतींचीही निवड करण्याची मागणी केली होती. मात्र पीठासीन अधिकारी खेडेकर यांनी कायद्यात तसे नसल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर निवड होईल, असे सांगितले होते. तर न.प. प्रशासन अधिकारी वेगळेच सांगतात. त्यामुळे प्रशासनातच संभ्रम आहे की, राजकीय दबावातून अधिकाºयांनी खेळलेली खेळी, हे कळायला मार्ग नाही, असा आरोपही काँग्रेसचे गटनेते नेहालभैय्या यांनी केला.