शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

शेतीमाल खरेदीचा गुंता कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:05 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडतर्फे शेतीमालाची खरेदी करताना नेहमीच ‘खरेदी कमी अन् गोंधळच जास्त’ झाल्याने वारंवार तिढा निर्माण होत होता

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडतर्फे शेतीमालाची खरेदी करताना नेहमीच ‘खरेदी कमी अन् गोंधळच जास्त’ झाल्याने वारंवार तिढा निर्माण होत होता. सहकारमंत्र्यांनी आदेश देवूनही केंद्र सुरू झाले नाही. दुसरीकडे मोंढ्यातच दर तीन हजारांपर्यंतही मिळू लागले आहेत.नाफेडने खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतीमालाची खरेदी करणे सुरु केले होते. मात्र केंद्रावर व्यापा-यांचा माल खरेदी होत असल्याच्या आरोपानंतर त्यांच्याकडून खरेदी काढून घेत खरेदीचे आदेश नाफेडने कृउबालाच दिले. सहकारमंत्र्याच्या हस्ते ८ क्विंटल खरेदी केल्यानंतर हा आकडा काही पुढे गेला नाही. सोमवारी खरेदी बंद असल्याची वेगळीच कारणे समोर आली. येथे नाफेडचा ग्रेडरच आला नसल्याने खरेदी बंद झाली होती. वास्तविक पाहता सभापती हरिश्चंद्र शिंदे यांनी जिल्हाउपनिबंधक यांना वारंवार फोन करुनही ग्रेडर न आल्याचे सांगितले. मात्र उशिरापर्यंत ग्रेडर केंद्रावर पोहोचलाच नसल्याने खरेदी थांबली होती. मात्र बाजार समितीत नोंदणी असलेल्या शेतक-यांना २६, २७ नोव्हेंबर रोजी माल खरेदीस आणण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यांनी आणलेल्या मालाचे अजूनही मोजमाप झालेले नाही. त्यातच आता खरेदी विक्री संघाचे अधिकार काढून कृउबाकडे खरेदीचे आधिकार आल्यानंतर तरी खरेदीला वेग येतो की नाही? असे शेतक-यांतून बोलले जात आहे.सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेल्या सूचनांचे कितपत पालन होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व प्रकारामध्ये शेतक-यांची मुक्कामापासून सुटका काही होत नसल्याचे चित्र आहे. येथे रात्री-अपरात्री मालाची चोरी होत असल्याच्या तक्रारीही शेतक-यांतून होत आहेत.