शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:05 IST

सण, कार्यक्रम व सामाजिक उत्सवात ध्वनी प्रदूषण होऊ नये, याबाबत पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र अनेक ठिकाणी याचे उल्लंघन केले जाते. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. वर्षभरात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सण, कार्यक्रम व सामाजिक उत्सवात ध्वनी प्रदूषण होऊ नये, याबाबत पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र अनेक ठिकाणी याचे उल्लंघन केले जाते. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. वर्षभरात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.जिल्ह्यात वर्षभरामध्ये ध्वनी प्रदूषण करणाºया एकूण आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त ६ जणांवर कारवाई कळमनुरी ठाणे अंतर्गत करण्यात आली. तर वसमत शहर ठाणे १ व कुरूंदा ठाणे १ एकूण आठ कारवायांची नोंद पोलीस दरबारी आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रणाकरीता जनजागृती अभियान राबविले जाते. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जात असली तरी, याला आळा बसत नसल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनाने एकूण १३ ठाण्यांना ४४ ध्वनी मोजमापक यंत्रे वाटप केली आहेत.डॉक्टर म्हणतात...- ध्वनी प्रदूषणाचे लहान बालकांवर लवकर परिणाम होतात. कमी वजनांच्या बालकांना शक्यतोवर मोठ्या आवाजांपासून दूर ठेवायला हवे. मोठ्या आवाजाने बाळ दचकते, किंवा कानाचे त्यांना विविध आजार जडतात. त्यामुळे बालकांना मोठ्या आवाजापासून दूर ठेवण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. तसेच कानात मोठा आवाज झाल्यास कानातील पडद्यास इजा होऊन लहान मुलांना बहिरेपणा येऊ शकतो. असे डॉ. एन. डी. करवा यांनी ‘लोकमत ’शी बोलताना सांगितले.ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षांची तरतूद आहे. या नियमाखालील गुन्हे दखलपात्र, अजामीनपत्र व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे चालतात. शिवाय यासंदर्भात कठोर कार्यवाहीचे आदेशही शासनाने पोलीस यंत्रणेस दिलेले आहेत. याबाबत नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी आणि पोलिसांनीही तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आहेत.शासनाने ठरवून दिलेली ध्वनिमर्यादा४ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल तर रात्री ७० डेसिबल एवढी ध्वनिमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा ६५ डेसिबल तर रात्री ५५ डेसिबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल ते रात्री ४० डेसिबलपर्यंत ध्वनिमर्यादा ठरवून दिलेली आहे.