शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Bharat Jodo Yatra: ‘अग्निवीर’मुळे समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीती, हिंगोलीत कॉर्नर सभेत राहुल गांधींची टीका

By शिवराज बिचेवार | Updated: November 15, 2022 12:53 IST

Bharat Jodo Yatra: केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे.

- शिवराज बिचेवार हिंगोली : केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेले हे तरुण बेरोजगार झाल्यानंतर समाजात गुन्हेगारी वाढण्याची दाट शक्यता आहे, असे वक्तव्य खा. राहुल गांधी यांनी केले.

भारत जोडो यात्रेच्या आठव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा येथे आयोजित कॉर्नर सभेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले की, सैन्यात जाणारा तरुण हा देशासाठी जीव देण्याच्या तयारीनेच उतरत असतो. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तो गावी परततो. त्यावेळी गावामध्ये त्यांचे एक वेगळेच वजन असते. त्यामुळे गावाला दिशा देण्याचे काम तो करीत असतो. परंतु, आता सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन थेट युद्धात ढकलणारी अग्निवीर योजना आणली आहे. त्यामुळे या युद्धाचा निकाल काय लागेल, हे सर्वांना माहिती आहे.

मेड इन हिंगोली, नांदेड का नाही? आपल्या खिशातील मोबाइल काढून बघितल्यास त्याच्या पाठीमागे मेड इन चायना असे दिसते. कारण, चायनातील हा माल आपल्या देशात विक्री केला जातो. आपल्याच देशातील अरबपती तो माल येथे विक्री करून नफा कमवतात. देशातील तरुणांना संधी दिल्यास प्रत्येक गोष्ट आपल्या येथेच तयार करण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यानंतर मेड इन हिंगोली, मेड इन नांदेड असे तुम्हाला दिसून येईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी