शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Bharat Jodo Yatra: ‘अग्निवीर’मुळे समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीती, हिंगोलीत कॉर्नर सभेत राहुल गांधींची टीका

By शिवराज बिचेवार | Updated: November 15, 2022 12:53 IST

Bharat Jodo Yatra: केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे.

- शिवराज बिचेवार हिंगोली : केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेले हे तरुण बेरोजगार झाल्यानंतर समाजात गुन्हेगारी वाढण्याची दाट शक्यता आहे, असे वक्तव्य खा. राहुल गांधी यांनी केले.

भारत जोडो यात्रेच्या आठव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा येथे आयोजित कॉर्नर सभेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले की, सैन्यात जाणारा तरुण हा देशासाठी जीव देण्याच्या तयारीनेच उतरत असतो. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तो गावी परततो. त्यावेळी गावामध्ये त्यांचे एक वेगळेच वजन असते. त्यामुळे गावाला दिशा देण्याचे काम तो करीत असतो. परंतु, आता सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन थेट युद्धात ढकलणारी अग्निवीर योजना आणली आहे. त्यामुळे या युद्धाचा निकाल काय लागेल, हे सर्वांना माहिती आहे.

मेड इन हिंगोली, नांदेड का नाही? आपल्या खिशातील मोबाइल काढून बघितल्यास त्याच्या पाठीमागे मेड इन चायना असे दिसते. कारण, चायनातील हा माल आपल्या देशात विक्री केला जातो. आपल्याच देशातील अरबपती तो माल येथे विक्री करून नफा कमवतात. देशातील तरुणांना संधी दिल्यास प्रत्येक गोष्ट आपल्या येथेच तयार करण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यानंतर मेड इन हिंगोली, मेड इन नांदेड असे तुम्हाला दिसून येईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी