शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Bharat Jodo Yatra: ‘अग्निवीर’मुळे समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीती, हिंगोलीत कॉर्नर सभेत राहुल गांधींची टीका

By शिवराज बिचेवार | Updated: November 15, 2022 12:53 IST

Bharat Jodo Yatra: केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे.

- शिवराज बिचेवार हिंगोली : केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेले हे तरुण बेरोजगार झाल्यानंतर समाजात गुन्हेगारी वाढण्याची दाट शक्यता आहे, असे वक्तव्य खा. राहुल गांधी यांनी केले.

भारत जोडो यात्रेच्या आठव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा येथे आयोजित कॉर्नर सभेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले की, सैन्यात जाणारा तरुण हा देशासाठी जीव देण्याच्या तयारीनेच उतरत असतो. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तो गावी परततो. त्यावेळी गावामध्ये त्यांचे एक वेगळेच वजन असते. त्यामुळे गावाला दिशा देण्याचे काम तो करीत असतो. परंतु, आता सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन थेट युद्धात ढकलणारी अग्निवीर योजना आणली आहे. त्यामुळे या युद्धाचा निकाल काय लागेल, हे सर्वांना माहिती आहे.

मेड इन हिंगोली, नांदेड का नाही? आपल्या खिशातील मोबाइल काढून बघितल्यास त्याच्या पाठीमागे मेड इन चायना असे दिसते. कारण, चायनातील हा माल आपल्या देशात विक्री केला जातो. आपल्याच देशातील अरबपती तो माल येथे विक्री करून नफा कमवतात. देशातील तरुणांना संधी दिल्यास प्रत्येक गोष्ट आपल्या येथेच तयार करण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यानंतर मेड इन हिंगोली, मेड इन नांदेड असे तुम्हाला दिसून येईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी