शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधकाची मागणी हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे ...

रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधकाची मागणी

हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या पुलावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक तसेच दुभाजक बसवावे, अशी मागणी या भागातील नागिरकांनी केली आहे.

हरभरा काढणीला आला वेग

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, दाटेगाव, लोहगाव, सावळी आदी गावांत रबी हंगामातील हरभरा पीक काढणी दोन-तीन दिवसांपासून सुरू केली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी हरभरा पिकाचे चांगले उत्पन्न होईल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना आहे.

वानरउड्यांना डिग्रसकर वैतागले

डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे मागील पाच-सहा दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. घरावरील पत्रांवर व छतावर उड्या मारून वस्तुंची नासधूस करीत आहेत. एवढेच काय अंगणात ठेवलेल्या पदार्थावरही वानरे ताव मारत आहेत. वानरांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत आहेत. वन विभागाने या वानरटोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

हिंगोली : नरसी फाटा ते लिंबाळा (मक्ता) या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सद्य:स्थित रस्त्याची एक बाजू पूर्ण झाली आहे. दुसरी बाजू अपूर्णच आहे. यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्यांना वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था

हिंगोली : बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाली असल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून नवीन बसस्थानकाचे काम रखडले असल्यामुळे प्रवाशांना तात्पुरत्या जागेत बसावे लागत आहे. आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन शौचालयाची दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कळमनुरी : तालुक्यातील कांडली, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, बऊर, रामेश्वरतांडा, कानोबा टाकळी, वाकोडी, मसोड आदी गावांत विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. वेळोवेळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. परंतु, कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. महावितरणच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.