शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधकाची मागणी हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे ...

रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधकाची मागणी

हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या पुलावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक तसेच दुभाजक बसवावे, अशी मागणी या भागातील नागिरकांनी केली आहे.

हरभरा काढणीला आला वेग

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, दाटेगाव, लोहगाव, सावळी आदी गावांत रबी हंगामातील हरभरा पीक काढणी दोन-तीन दिवसांपासून सुरू केली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी हरभरा पिकाचे चांगले उत्पन्न होईल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना आहे.

वानरउड्यांना डिग्रसकर वैतागले

डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे मागील पाच-सहा दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. घरावरील पत्रांवर व छतावर उड्या मारून वस्तुंची नासधूस करीत आहेत. एवढेच काय अंगणात ठेवलेल्या पदार्थावरही वानरे ताव मारत आहेत. वानरांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत आहेत. वन विभागाने या वानरटोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

हिंगोली : नरसी फाटा ते लिंबाळा (मक्ता) या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सद्य:स्थित रस्त्याची एक बाजू पूर्ण झाली आहे. दुसरी बाजू अपूर्णच आहे. यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्यांना वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था

हिंगोली : बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाली असल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून नवीन बसस्थानकाचे काम रखडले असल्यामुळे प्रवाशांना तात्पुरत्या जागेत बसावे लागत आहे. आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन शौचालयाची दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कळमनुरी : तालुक्यातील कांडली, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, बऊर, रामेश्वरतांडा, कानोबा टाकळी, वाकोडी, मसोड आदी गावांत विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. वेळोवेळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. परंतु, कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. महावितरणच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.