शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

रेल्वे पुलावर दुभाजक बसविण्याची मागणी हिंगोली: शहरातील वाशिमरोडवर असलेल्या रेल्वे पुलावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणावरुन ...

रेल्वे पुलावर दुभाजक बसविण्याची मागणी

हिंगोली: शहरातील वाशिमरोडवर असलेल्या रेल्वे पुलावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणावरुन वाहने वेगाने चालविली जात आहेत. वाहनांची संख्या लक्षात घेता संबंधित विभागाने या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसवून अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कायमस्वरुपी पोलीस नेमावा

हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक हा भाग अत्यंत वर्दळीचा आहे. वाहनांची संख्याही या ठिकाणी वाढली आहे. परंतु, काही वाहनचालक वाहने अस्ताव्यस्तपणे लावत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजार करण्यासाठी येतात. तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे

हिंगोली: रब्बी हंगामातील भाजीपाला पीक वाढीच्या अवस्थेत आहे. रब्बी हंगामात लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे. कांदा पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायफेन्कोनॅझोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरातील अनेक गावांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे

बसस्थानकात धुळीचे प्रमाण वाढले

हिंगोली: मागील काही दिवसांपासून बसस्थानकात धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. महामंडळाच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन सकाळ-सायंकाळ बसस्थानकात पाणी टाकून धूळ कमी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

शहरात वानरांची संख्या वाढली

हिंगोली: गत काही दिवसांपासून अन्न व पाण्याच्या शोधात वानरे शहरात दाखल झाले आहेत. घरावरील कौलावरुन उड्या मारत अंगणात ठेवलेल्या वस्तुंची नासाडी करीत आहेत. नागरिकांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येत आहेत. वन विभागाने सापळा रचून वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.