शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

पॉलिटेक्निकचे ‘तंत्र’ बिघडणार; १५ दिवसांत १०० विद्यार्थ्यांचेच अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

हिंगोली : पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. परंतु, दहावीचा अद्याप निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम ...

हिंगोली : पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. परंतु, दहावीचा अद्याप निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत १०० विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील पाॅलिटेक्निकच्या प्रथम व थेट द्वितीय पदविका प्रवेश प्रक्रियेस ३० जूनपासून ई-स्क्रुटीनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. दहावीनंतर प्रथम वर्षाला प्रवेश दिला जातो. पाॅलिटेक्निकच्या प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, दहावीचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. दहावीचा निकाल लागला नसला, तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होती. जिल्ह्यातील जवळपास १०० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यासक्रमासाठी अर्ज भरला आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून, आणखी १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग येणार असल्याचे तंत्र शिक्षण विद्यालयातून सांगण्यात आले.

दहावी निकालानंतर येणार गती

कोरोनामुळे मागील वर्षीपासून पाॅलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत आहे.

याहीवर्षी आतापर्यंत केवळ दोन काॅलेजमधून १०० विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर केले आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती येईल.

विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांकच नाही

पाॅलिटेक्निकच्या प्रथम वर्षाला दहावीनंतर तर थेट द्वितीय वर्षाला बारावीनंतर प्रवेश मिळतो. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी पाॅलिटेक्निकला पसंती देतात. मात्र अद्याप दहावीचा निकाल लागला नाही. त्यामुळे प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. असे असले तरी ॲप्लिकेशन क्रमांकावरून अर्ज स्वीकारले जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे.

गेल्यावर्षी ५० टक्के जागा रिक्त

गतवर्षी पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाचे अर्ज सादर करण्यास दोनवेळा मुदतवाढ दिली होती. मात्र कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे जवळपास ५० टक्के जागा रिक्त राहिल्या. यावर्षी सर्व जागा भरल्या जातील, अशी शक्यता दिसत आहे.

उपविभागीय अधिकारी, शाळांना केली विनंती

शासकीय कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची विनंती एका पत्राद्वारे केली आहे. तसेच निकाल लागल्यानंतर टीसी, गुणपत्रके लवकर देण्यात यावीत, अशी विनंती केली जाणार आहे.

पाॅलिटेक्निकला प्रवेश घ्यायचे निश्चित केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत माहितीही घेतली आहे. परंतु, दहावीचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेच प्रवेश अर्ज भरणार आहे.

-प्रगती गुठ्ठे, विद्यार्थिनी

पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विविध कागदपत्रे लागत आहेत. ही कागदपत्रे काढण्यासाठी वेळ लागत आहे. कागदपत्रे लवकर देण्याची व्यवस्था झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. तसेच अर्ज कसा भरावा, यासंदर्भात मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

- संकेत खराटे, विद्यार्थी