शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

..तर पाणीपुरवठा समितीवर फौजदारी

By admin | Updated: December 5, 2014 15:21 IST

रखडलेल्या नळ योजनांची कामे पाणीपुरवठा समित्या पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे अशी कामे पूर्ण करा,अन्यथा फौजदारी दाखल करा अशी सूचना अधिका-यांनी केली आहे.

 

हिंगोली : /वर्षानुवर्षे/ रखडलेल्या नळ योजनांची कामे पाणीपुरवठा समित्या पूर्ण करीत नाहीत. प्रशासन वारंवार एकच रडगार्‍हाणे गात आहे. त्यामुळे अशी कामे पूर्ण करा, समित्यांकडून रक्कम वसूल करा अन्यथा फौजदारी दाखल करा, अशा सूचना जि. प. पदाधिकार्‍यांनी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत दिल्या.
जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, उपाध्यक्ष राजेश्‍वर पतंगे, सभापती अशोक हरण, सिंधूताई कर्‍हाळे, शोभा झुंजुर्डे, सहल्या कोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांची उपस्थिती होती.
रखडलेल्या नळयोजना बर्‍याच गाजल्या. २४८ योजना विविध कारणांनी अपूर्ण आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता यंबडवार यांनी दिली. त्यानंतर उपाध्यक्ष राजेश्‍वर पतंगे यांनी गावनिहाय स्थितीची विचारणा केली असता अधिकार्‍यांकडे उत्तर नव्हते.
परिणामी, या गावांना अंतिम इशारा द्या अन् दुष्काळी स्थितीत गावकर्‍यांना पाणी मिळेल, याची व्यवस्था करा, असे सांगितले. जर पाणीपुरवठा समित्या दाद देत नसतील तर कठोर पावले उचला, असे सांगितले. नाहीतर अधिकारी, कर्मचार्‍यांवर वसुली काढली जाईल, असा इशारा दिला. सभापती अशोक हरण यांनीही काही गावांतील योजनांचा पंचनामा मांडून अधिकारी कठोर होणार नसतील, तर शासनाचा लाखोंचा वाया जात असलेला खर्च कोणाकडून वसूल करायचा? असा सवाल केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिरसे यांनीही यात कार्यवाहीच्या सूचना दिल्या. हिंगोली उपविभागात ३३ योजनांपैकी २४ प्रगतीपथावर आहेत. त्यात अनेक २00३ च्या होत्या. त्यावरूनही संताप व्यक्त करण्यात आला. 
पळसोना, माळधावंडी, कारवाडी पाणीपुरवठा योजनेवर चर्चा झाली. जीएसडीएच्या सौरपंप योजनेचाही मुद्दा गाजला. २0११ पासून आतापर्यंत ४२ कामे पूर्ण झाली नाहीत. आयएसआय मार्क नसलेल्या टाक्या वापरल्याने काही योजना बंद आहेत. तर काही ठिकाणी कामच केले नाही. मात्र पाणीपुरवठा समितीने रक्कम उचलली आहे. या योजनेत बोअर, टाकी व चार स्टॅंड पोस्ट अपेक्षित आहे. मात्र त्याचे तीनतेरा वाजले. या ४२ कामांबाबतही आढावा घेत कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. उद्धवराव गायकवाड व द्वारकादास सारडा यांनी यात मुद्दे मांडले. तर लघुसिंचनच्या ओटीएसपी योजनेत यापूर्वी सहा सिमेंट बंधारे घेतले. मात्र त्यांचे अंदाजपत्रक अंतिम झाले आहे. त्यानंतर उरलेल्या ३५ लाखांच्या निधीत आणखी कामे घेता येतील. ती सूचवा, असे सांगण्यात आले.
 
>  निधीतून ५0 टक्के वीज बिल व ५0 टक्के दुरुस्तीवर खर्च होईल. 
> एकेक काम न सुचविता जिल्ह्यातील सर्वच योजनांचा एकत्रित दुरुस्तीचा आराखडा प्रथम तयार करावा लागेल.
> या आराखड्यास जि. प. ने मंजुरी दिल्यानंतर ही कामे पाणीपुरवठा विभागामार्फत करता येणार आहेत. हा नवा शासन निर्णय जारी झाला आहे. 
> पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर या योजना काही वर्षांनी दुरुस्त कराव्या लागतात. त्यासाठी जि. प. च्या निधीतील २0 टक्के रक्कम यापुढे राखीव ठेवली जाणार आहे. त्यातूनच दुरुस्तीची कामे होतील.