शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस लाईफ; ना ड्यूटीची वेळ, ना पगाराचा मेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

हिंगोली: कुटुंबाची पर्वा न करता चोवीस तास समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलणाऱ्या पोलिसांच्या घरांची मात्र दैन्यावस्था झाल्याचे सद्य:स्थितीत पाहायला ...

हिंगोली: कुटुंबाची पर्वा न करता चोवीस तास समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलणाऱ्या पोलिसांच्या घरांची मात्र दैन्यावस्था झाल्याचे सद्य:स्थितीत पाहायला मिळत आहे. गृहमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी पेलणाऱ्या पोलिसांना पक्की घरे बांधून देणे गरजेचे झाले आहे.

समाजाच्या सुरक्षेची जाबाबदारी असलेल्या पोलिसांचे वैयक्तिक आयुष्य किती खडतर आहे, हे सांगणे नकोच. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ मध्ये झाली. त्या अगोदरपासूनच पोलीस वसाहतीची दयनीय अशी अवस्था झालेली आहे. पोलीस वसाहतीत लेकरांना खेळायला बगीचा तर सोडाच, साध्या नाल्याही नाहीत. टीनपत्रे लावून घरात जिल्ह्याचे संरक्षण करणारे पोलीस राहत आहेत. शहरातील जुन्या पोलीस वसाहतीत आजमितीस ११८ घरे असून नवीन वसाहतीत १६८ घरे आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत ११०० पोलीस कार्यरत आहेत; पण ड्यूटी चोवीस तास होत असल्यामुळे कुटुंबाला वेळ देणे त्यांच्यासाठी फार अवघड होऊन बसले आहे. दिवसांतून कसाबसा एखादा तास आई, वडील, पत्नी, मुलाला भेटण्यासाठी देता येतो. उरलेल्या २३ तासांमध्ये समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी लागते. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ ही शपथ घेऊन पोलीस समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत; परंतु त्यांच्या निवासाची मात्र कोणीही काळजी करताना दिसून येत नाही.

शहरातील पलटन भागात असलेल्या पोलीस वसाहतीची दैन्यावस्था झाली असून, घरांच्या बाजूला गवत साचले आहे. वसाहतीत नाल्याच नाहीत, रस्ते नाहीत. पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे चालताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शौचालयाची तर फारच वाईट अवस्था झाली आहे. अनेकांनी घरांसमोर पत्रे लावून आडोसा करून घेतला आहे. पावसाळ्यात तर ही घरे मोठ्या प्रमाणात गळतात. घराबरोबर लेकरांना खेळण्यासाठी मोकळी जागा आहे. मोकळ्या जागेत पोलिसांच्या लेकरांसाठी बगीचा करायला पाहिजे; परंतु साधी खेळणीही या ठिकाणी नाहीत. २४ तास ड्यूटी करून रात्री-बेरात्री विंचूकाड्यात पोलिसांना घर गाठावे लागते. अशावेळी अपघाताची शक्यता असते. समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांना पक्के घर बांधून देणे हे आज गरजेचे आहे. सद्य:स्थितीत मात्र पोलीस पडक्या आणि गळक्या घरात राहतात.

प्रतिक्रिया

माझे पती पोलीस आहेत; पण ते प्रामाणिकपणे नोकरी करतात याचाच मला सार्थ अभिमान आहे. पोलीस ड्यूटी सर्वांनाच माहीत आहे. एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर घरी लवकर येण्याची शाश्वती नसते. सकाळी मुलाला शाळेत सोडणे, शाळेतून घरी आणणे, घरात तिखट, मीठ, साखर, पीठ संपले असेल ते घेऊन येते; कारण पतीच्या पोटाबरोबर माझे व लेकराचे पोट आहे. पगार थोडा असला तरी मानाचा आहे. भविष्यात काय लिहिले आहे हे आज तरी सांगता येत नाही. आज मात्र पडक्या घरात राहत आहोत. स्वत:चे घर हवे आहे; पण पगार तसा नाही. तरीही आनंदी आहे. - वंदना आम्ले, गृहिणी