शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

गावशिवेच्या वादात अडविले शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:38 IST

पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भुरक्याची वाडीचे गायरान असल्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतरही काम रोखल्याने १५० ग्रामस्थांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दाद मागितली. घटनास्थळी जावून ठाणेदारांनी समजूतही काढली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भुरक्याची वाडीचे गायरान असल्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतरही काम रोखल्याने १५० ग्रामस्थांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दाद मागितली.घटनास्थळी जावून ठाणेदारांनी समजूतही काढली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.कळमनुरी तालुक्यातील भुरक्याची वाडी हे गाव पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावात अग्रणी आहे. गावात भरपूर कामे झाली. अखेरच्या टप्प्यात गावातील गायरानात शेततळे खोदण्याचे काम मशिनद्वारे सुरू आहे; परंतु तळ्याचे काम सुरू असलेली जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा करीत बऊरच्या काही मंडळींनी हे काम रोखले. काम अडविल्याने भुरक्याच्या वाडीच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार अर्ज देत प्रश्न सोडविण्याची विनंती केली. तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, एमआरईजीएसच्या वर्षा स्वामी यांनी १७ मे रोजी स्थळ पाहणी केली. त्यानंतर भुरक्याच्या वाडीचा गट क्र. ७५ गायरान असून सध्या सुरू असलेले काम गायरानातच असल्याचे स्पष्टपणे सांगितले. बऊरच्या गट क्र. ३६ धारकास काही अडचण असल्यास त्यांनी त्यांचे शेत मोजून घ्यावे, असे लेखी कळविले. त्यानंतरही सदर काम अडविण्यात आले. त्यामुळे २० मे रोजी दुपारी १ वाजता भुरक्याच्या वाडीतील १५० ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठले व दाद मागितली.बऊरच्या संबंधितांविरूद्ध ठाण्यात लेखी तक्रारही दिली. पोनि व्ही.एम. केंद्रे यांनी घटनास्थळी जावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मोजणी करून ‘शिव’ निश्चिती करा, असा आग्रह धरल्याने अखेरच्या टप्प्यात पाणी फाऊंडेशनच्या कामाला खीळ बसली. तालुक्यात सुरू असलेल्या कामात ‘शिवे’च्या वादावरून काम बंद करण्याची ही पहिलीच घटना आहे.भुरक्याच्या वाडीचेच ते गायरान असल्याने लेखी तहसीलदारांनी स्पष्ट केल्यानंतरही तुम्ही जमीन मोजून घ्या व हद्द निश्चित झाल्यानंतरच काम करा, असा हट्ट धरल्याने आम्ही २०० ते २५० ग्रामस्थ तहसीलदारांकडे जावून तातडीने मोजणी करून हद्द निश्चित करून द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे सरपंच संतोष भुरके यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा