शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

गावशिवेच्या वादात अडविले शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:38 IST

पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भुरक्याची वाडीचे गायरान असल्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतरही काम रोखल्याने १५० ग्रामस्थांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दाद मागितली. घटनास्थळी जावून ठाणेदारांनी समजूतही काढली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भुरक्याची वाडीचे गायरान असल्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतरही काम रोखल्याने १५० ग्रामस्थांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दाद मागितली.घटनास्थळी जावून ठाणेदारांनी समजूतही काढली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.कळमनुरी तालुक्यातील भुरक्याची वाडी हे गाव पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावात अग्रणी आहे. गावात भरपूर कामे झाली. अखेरच्या टप्प्यात गावातील गायरानात शेततळे खोदण्याचे काम मशिनद्वारे सुरू आहे; परंतु तळ्याचे काम सुरू असलेली जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा करीत बऊरच्या काही मंडळींनी हे काम रोखले. काम अडविल्याने भुरक्याच्या वाडीच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार अर्ज देत प्रश्न सोडविण्याची विनंती केली. तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, एमआरईजीएसच्या वर्षा स्वामी यांनी १७ मे रोजी स्थळ पाहणी केली. त्यानंतर भुरक्याच्या वाडीचा गट क्र. ७५ गायरान असून सध्या सुरू असलेले काम गायरानातच असल्याचे स्पष्टपणे सांगितले. बऊरच्या गट क्र. ३६ धारकास काही अडचण असल्यास त्यांनी त्यांचे शेत मोजून घ्यावे, असे लेखी कळविले. त्यानंतरही सदर काम अडविण्यात आले. त्यामुळे २० मे रोजी दुपारी १ वाजता भुरक्याच्या वाडीतील १५० ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठले व दाद मागितली.बऊरच्या संबंधितांविरूद्ध ठाण्यात लेखी तक्रारही दिली. पोनि व्ही.एम. केंद्रे यांनी घटनास्थळी जावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मोजणी करून ‘शिव’ निश्चिती करा, असा आग्रह धरल्याने अखेरच्या टप्प्यात पाणी फाऊंडेशनच्या कामाला खीळ बसली. तालुक्यात सुरू असलेल्या कामात ‘शिवे’च्या वादावरून काम बंद करण्याची ही पहिलीच घटना आहे.भुरक्याच्या वाडीचेच ते गायरान असल्याने लेखी तहसीलदारांनी स्पष्ट केल्यानंतरही तुम्ही जमीन मोजून घ्या व हद्द निश्चित झाल्यानंतरच काम करा, असा हट्ट धरल्याने आम्ही २०० ते २५० ग्रामस्थ तहसीलदारांकडे जावून तातडीने मोजणी करून हद्द निश्चित करून द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे सरपंच संतोष भुरके यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा