शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

नैसर्गिक प्राणवायूसाठी किमान एकतरी झाड लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

वनविभागासह पर्यावरणप्रेमींनी केले नागरिकांना आवाहन हिंगोली : वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावणे ...

वनविभागासह पर्यावरणप्रेमींनी केले नागरिकांना आवाहन

हिंगोली : वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावणे आवश्यक आहे. नुसते झाड लावून कार्य पूर्ण होत नसते तर लावलेल्या झाडांचे संगोपन करणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

१९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. १९७२ मधील जून महिन्यात स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृती सत्रात ठरविण्यात आली. पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक,नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार होणे गरजेचे आहे. पर्यावरण शिक्षण जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. परंतु, दरवर्षी ५ जून (पर्यावरण दिन) जवळ आला की, तो साजरा कसा करता येईल, याचेच कोडे सर्वांना पडते. गत दीड वर्षापासून तर कोरोनाने सळो की पळो करुन सोडले आहे. बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडून पर्यावरणाला कोणाची दृष्ट न लागता पर्यावरण कसे राखता येईल, याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक व्यक्तीने एक तरी लावून पर्यावरण दिन साजरा करावा, असे आवाहनही पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

प्रतिक्रिया

आपले जगणे आणि निसर्गाच्या प्रति कर्तव्य, जबाबदारी यापासून कोसो दूर मानव आहे. म्हणूनच की काय कोरोनाच्या काळात निसर्गाचे शिक्षण घेणे हा महत्त्वाचा विषय होत चालला आहे.

पहिली वर्गापासून कृषी विषय अभ्यासक्रमात ठेवून त्यात शेती, माती, झाड, पाणी, अन्नधान्याच्या विषयी पाठ असावेत. ते पाठ नुसते अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात कृतीत उतरले पाहिजेत आणि या कृतीवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले पाहिजे. असे झाले तरच पर्यावरण संतुलनाच्या आसपास आपण जाऊ शकतो.

-अण्णा जगताप, पर्यावरणप्रेमी

पर्यावरण दिनानिमित्त झाड लावून चालत नाही. लावलेल्या रोपट्यास खतपाणी देेऊन त्याचे संगोपन केल्यास झाड आपल्याला सावली देते. शाळा, महाविद्यालयांतून पर्यावरण बाबत जनजागृती करणेही महत्त्वाचे आहे.

-रतन आडे, पर्यावरणप्रेमी

झाडे मोफत ऑक्सिजन पुरवत असतात. झाडे लावणे आणि लावलेली झाडे जगविणे हेही तितकेच गरजेचे आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात प्रत्येकाने झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वजण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो म्हणून यावर्षी साजऱ्या होत असलेल्या पर्यावरण दिनी सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाची शपथ घेऊन किमान एका रोपाची लागवड करावी.

- विश्वनाथ टाक, वनपरिक्षेत्र अधिकारी

पर्यावरण दिनी सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाची शपथ घेऊन किमान एकतरी रोप लावणे आवश्यक आहे. आंबा, जांभूळ, लिंब, पळस, आवळा, चिंच, वड, उंबर, पिंपळ, बदाम, बोर, करांज, साग, खैर, कवुट, बेल आदी झाडांपैकी एक तरी रोप लावून पर्यावरण दिन साजरा करावा.

- विश्वंभर पटवेकर महाराज, पर्यावरणप्रेमी

शहरातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध मोकळ्या जागेत,शेतामध्ये, बांधावर,पडीक जमिनीवर, रस्ता, दुतर्फा कॉर्नर, नदी,नाल्यांच्या काठावर वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. मानवाच्या अस्तित्वासाठी हे काम महत्त्वाचे आहे.

-जी.पी. मिसाळ,वन परिमंडळ अधिकारी