शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक प्राणवायूसाठी किमान एकतरी झाड लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

वनविभागासह पर्यावरणप्रेमींनी केले नागरिकांना आवाहन हिंगोली : वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावणे ...

वनविभागासह पर्यावरणप्रेमींनी केले नागरिकांना आवाहन

हिंगोली : वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावणे आवश्यक आहे. नुसते झाड लावून कार्य पूर्ण होत नसते तर लावलेल्या झाडांचे संगोपन करणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

१९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. १९७२ मधील जून महिन्यात स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृती सत्रात ठरविण्यात आली. पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक,नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार होणे गरजेचे आहे. पर्यावरण शिक्षण जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. परंतु, दरवर्षी ५ जून (पर्यावरण दिन) जवळ आला की, तो साजरा कसा करता येईल, याचेच कोडे सर्वांना पडते. गत दीड वर्षापासून तर कोरोनाने सळो की पळो करुन सोडले आहे. बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडून पर्यावरणाला कोणाची दृष्ट न लागता पर्यावरण कसे राखता येईल, याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक व्यक्तीने एक तरी लावून पर्यावरण दिन साजरा करावा, असे आवाहनही पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

प्रतिक्रिया

आपले जगणे आणि निसर्गाच्या प्रति कर्तव्य, जबाबदारी यापासून कोसो दूर मानव आहे. म्हणूनच की काय कोरोनाच्या काळात निसर्गाचे शिक्षण घेणे हा महत्त्वाचा विषय होत चालला आहे.

पहिली वर्गापासून कृषी विषय अभ्यासक्रमात ठेवून त्यात शेती, माती, झाड, पाणी, अन्नधान्याच्या विषयी पाठ असावेत. ते पाठ नुसते अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात कृतीत उतरले पाहिजेत आणि या कृतीवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले पाहिजे. असे झाले तरच पर्यावरण संतुलनाच्या आसपास आपण जाऊ शकतो.

-अण्णा जगताप, पर्यावरणप्रेमी

पर्यावरण दिनानिमित्त झाड लावून चालत नाही. लावलेल्या रोपट्यास खतपाणी देेऊन त्याचे संगोपन केल्यास झाड आपल्याला सावली देते. शाळा, महाविद्यालयांतून पर्यावरण बाबत जनजागृती करणेही महत्त्वाचे आहे.

-रतन आडे, पर्यावरणप्रेमी

झाडे मोफत ऑक्सिजन पुरवत असतात. झाडे लावणे आणि लावलेली झाडे जगविणे हेही तितकेच गरजेचे आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात प्रत्येकाने झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वजण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो म्हणून यावर्षी साजऱ्या होत असलेल्या पर्यावरण दिनी सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाची शपथ घेऊन किमान एका रोपाची लागवड करावी.

- विश्वनाथ टाक, वनपरिक्षेत्र अधिकारी

पर्यावरण दिनी सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाची शपथ घेऊन किमान एकतरी रोप लावणे आवश्यक आहे. आंबा, जांभूळ, लिंब, पळस, आवळा, चिंच, वड, उंबर, पिंपळ, बदाम, बोर, करांज, साग, खैर, कवुट, बेल आदी झाडांपैकी एक तरी रोप लावून पर्यावरण दिन साजरा करावा.

- विश्वंभर पटवेकर महाराज, पर्यावरणप्रेमी

शहरातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध मोकळ्या जागेत,शेतामध्ये, बांधावर,पडीक जमिनीवर, रस्ता, दुतर्फा कॉर्नर, नदी,नाल्यांच्या काठावर वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. मानवाच्या अस्तित्वासाठी हे काम महत्त्वाचे आहे.

-जी.पी. मिसाळ,वन परिमंडळ अधिकारी