शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

नैसर्गिक प्राणवायूसाठी किमान एकतरी झाड लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

वनविभागासह पर्यावरणप्रेमींनी केले नागरिकांना आवाहन हिंगोली : वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावणे ...

वनविभागासह पर्यावरणप्रेमींनी केले नागरिकांना आवाहन

हिंगोली : वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावणे आवश्यक आहे. नुसते झाड लावून कार्य पूर्ण होत नसते तर लावलेल्या झाडांचे संगोपन करणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

१९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. १९७२ मधील जून महिन्यात स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृती सत्रात ठरविण्यात आली. पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक,नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार होणे गरजेचे आहे. पर्यावरण शिक्षण जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. परंतु, दरवर्षी ५ जून (पर्यावरण दिन) जवळ आला की, तो साजरा कसा करता येईल, याचेच कोडे सर्वांना पडते. गत दीड वर्षापासून तर कोरोनाने सळो की पळो करुन सोडले आहे. बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडून पर्यावरणाला कोणाची दृष्ट न लागता पर्यावरण कसे राखता येईल, याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक व्यक्तीने एक तरी लावून पर्यावरण दिन साजरा करावा, असे आवाहनही पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

प्रतिक्रिया

आपले जगणे आणि निसर्गाच्या प्रति कर्तव्य, जबाबदारी यापासून कोसो दूर मानव आहे. म्हणूनच की काय कोरोनाच्या काळात निसर्गाचे शिक्षण घेणे हा महत्त्वाचा विषय होत चालला आहे.

पहिली वर्गापासून कृषी विषय अभ्यासक्रमात ठेवून त्यात शेती, माती, झाड, पाणी, अन्नधान्याच्या विषयी पाठ असावेत. ते पाठ नुसते अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात कृतीत उतरले पाहिजेत आणि या कृतीवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले पाहिजे. असे झाले तरच पर्यावरण संतुलनाच्या आसपास आपण जाऊ शकतो.

-अण्णा जगताप, पर्यावरणप्रेमी

पर्यावरण दिनानिमित्त झाड लावून चालत नाही. लावलेल्या रोपट्यास खतपाणी देेऊन त्याचे संगोपन केल्यास झाड आपल्याला सावली देते. शाळा, महाविद्यालयांतून पर्यावरण बाबत जनजागृती करणेही महत्त्वाचे आहे.

-रतन आडे, पर्यावरणप्रेमी

झाडे मोफत ऑक्सिजन पुरवत असतात. झाडे लावणे आणि लावलेली झाडे जगविणे हेही तितकेच गरजेचे आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात प्रत्येकाने झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वजण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो म्हणून यावर्षी साजऱ्या होत असलेल्या पर्यावरण दिनी सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाची शपथ घेऊन किमान एका रोपाची लागवड करावी.

- विश्वनाथ टाक, वनपरिक्षेत्र अधिकारी

पर्यावरण दिनी सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाची शपथ घेऊन किमान एकतरी रोप लावणे आवश्यक आहे. आंबा, जांभूळ, लिंब, पळस, आवळा, चिंच, वड, उंबर, पिंपळ, बदाम, बोर, करांज, साग, खैर, कवुट, बेल आदी झाडांपैकी एक तरी रोप लावून पर्यावरण दिन साजरा करावा.

- विश्वंभर पटवेकर महाराज, पर्यावरणप्रेमी

शहरातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध मोकळ्या जागेत,शेतामध्ये, बांधावर,पडीक जमिनीवर, रस्ता, दुतर्फा कॉर्नर, नदी,नाल्यांच्या काठावर वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. मानवाच्या अस्तित्वासाठी हे काम महत्त्वाचे आहे.

-जी.पी. मिसाळ,वन परिमंडळ अधिकारी