शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

वसमत तालुक्यात पांदणमुक्ती कागदावरच भर; प्रत्यक्षात शौचालयाचा वापरच होईना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 18:38 IST

वसमत तालुक्यात पांदणमुक्तीचा संकल्प केलेला असला तरी प्रत्यक्षापेक्षा पांदणमुक्तीमुक्ती ही कागदावरच दाखविण्यावर भर दिसत आहे.

वसमत ( हिंगोली ) : वसमत तालुक्यात पांदणमुक्तीचा संकल्प केलेला असला तरी प्रत्यक्षापेक्षा पांदणमुक्तीमुक्ती ही कागदावरच दाखविण्यावर भर दिसत आहे. शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आकडे वाढले असले तरी तालुक्यात शौचालयाचा वापरच अत्यल्प असून ग्रामीण भागात आजही उघड्यावर जाणार्‍यांची संख्या प्रचंड दिसत आहे. अधिकारी -कर्मचार्‍यांचा अपडाऊनमुळे तालुक्यातील हगणदारीमुक्तीच्या संकल्पनेचा बोजवारा उडत आहे.  

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ग्रामीण भाग हगणदारीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी व त्याच्या वापरासाठी लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे अनुदानही दिले जाते. मात्र, हे अनुदान गुत्तेदार व कर्मचार्‍यांच्याच तावडीत सापडल्याचे चित्र वसमत तालुक्यात दिसत आहे. 

लाभार्थ्यांना अनुदान मिळून देण्यासाठी अनेक जण सक्रिय आहेत. काही महाभागांनी तर शौचालय बांधकामाचे गुत्ते घेवून बांधकाम केले आहे. परंतु, बांधण्यात आलेले शौचालय हे वापरायोग्य नसल्याचे समजते. दरम्यान, शौचालयांच्या बांधकामावर देखरेख बहुतेक अभियंता व ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष बांधकाम न पाहताच स्वाक्षर्‍या करून दिल्या व अनुदान उचलण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची शौचालये उभी राहिली आहेत. विशेष म्हणजे नियंत्रण ठेवणारे बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे अपडाऊन करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळा सांभाळून बांधलेल्या शौचालयाचा दर्जा तपासण्यासाठी त्यांना वेळ नाही. तर मग शौचालयाचा वापर केला जातो का, याची खातरजमा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. 

काही भागात तर शौचालय बांधण्यासाठी केवळ सक्ती केली म्हणून शौचालय बांधण्याचा केवळ दिखावा केला आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र, बांधण्यात आलेल्या शौचालयांचा वापर मात्र कुणी करताना दिसत नाही. 

शौचालय नावापुरतेच 

ग्रामस्थांनी नावापुरते शौचालय असावे म्हणून बांधकाम करून ठेवले असून अनेकांचे उघड्यावरच जाणे सुरू ठेवले असल्याने हगणदारीमुक्तीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. प्रत्यक्ष कृतीऐवजी आकडेवारी व कागदोपत्री उद्दिष्टपूर्ती करण्याच्या नादात अनेक गावांना हगणदारीमुक्तीचे प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. परंतु, आजही हगणदरीमुक्त झालेल्या अनेक गावांत प्रवेश करणेही अवघड आहे. त्यामुळे अशा गावातील प्रत्यक्ष परिस्थितीचा अहवालच वास्तवपणे मांडल्या जात नाही. उद्दिष्टपूर्तीच्या नावाखाली शौचालयाचे सांगाडे उभे राहत असून अनुदानापोटी कोट्यवधीचा खर्चही होत आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र शौचालयाचा वापर होताना दिसून येत नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानHingoliहिंगोली