शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कीड नियंत्रणास सर्वेक्षक नेमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:35 IST

सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा पिकावर वारंवार कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व उत्पादनात घट होऊ नये, यासाठी कीडरोग सर्वेक्षण, व्यवस्थापन प्रकल्प क्रॉपसॅप २००९-१० पासून २०१७-१८ पर्यंत संस्थेमार्फत कीड सर्वेक्षक नेमून सर्वेक्षण करण्यात येत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा पिकावर वारंवार कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व उत्पादनात घट होऊ नये, यासाठी कीडरोग सर्वेक्षण, व्यवस्थापन प्रकल्प क्रॉपसॅप २००९-१० पासून २०१७-१८ पर्यंत संस्थेमार्फत कीड सर्वेक्षक नेमून सर्वेक्षण करण्यात येत होते.२०१८-१९ पासून सदर प्रकल्प सर्व क्षेत्रीय कर्मचाºयांच्या सहभागाने मोबाईल अ‍ॅपद्वारे किडरोगाची निरीक्षणे नोंदवून एनआयसी पुणे व कृषी विद्यापीठास अहवाल सादर करून अ‍ॅडव्हायजरी शेतकºयांपर्यंत पोहोचविली जात आहे. जिल्ह्यात नियमित सर्वेक्षणासाठी १४ मंडळ कृषी अधिकारी सज्जे, २८ कृषी पर्यवेक्षक व १६८ कृषी सहायकांचे रजिस्ट्रेशन केले असून नियमित सर्वेक्षण होत आहे.कापूस- नियमित सर्वेक्षणामध्ये कापूस पिकामध्ये शेंदरी बोंडअळी पतंग कोषावस्थेतून बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत एक किंवा दोन गावांत मोठ्या प्रमाणावर पतंग पकडून नष्ट करण्यासाठी निवड केली. फुलोरा अवस्था येण्यापूर्वी हे पतंग कामगंध सापळ्यात पकडून मारल्यास त्यांचे प्रजनन कमी होऊन किडीच्या संख्येवर काही प्रमाणात मात करता येणे शक्य आहे. फुलोरा, पाते अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करता येईल.कामगंध सापळ्याचा वापर एकरी ८ सापळे पिकापेक्षा १ फूट उंचीवर लावावेत. दर ६० दिवसांनी सापळ्यातील ल्यूर बदलणे आवश्यक आहे. ३ दिवस ८ पतंग सापळ्यात आढळल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे समजून ३५ ते ४५ व्या दिवशी पाते फुले अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. सोयाबीनवर सुरूवातीला पेरणी झालेल्या भागात पाने खाणारी उंटअळी व चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आहे. अळीसाठी क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी ३ मि.ली. किंवा इन्डोक्झाकार्ब १५.८ ईसी ७ एमएल १० लिटर पाण्यातून फवारावे. चक्रीभुंग्यासाठी ट्रायझोफॉस ४० ईसी १२ मि.ली. किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १५.५ एस.सी ३ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक व्ही.डी. लोखंडे व उपविभागीय अधिकारी एस.बी. कच्छवे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी