शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

पीककर्ज वाटप अखेर ६० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात ७५५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते, तर रब्बी हंगामासाठी ३५२ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ...

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात ७५५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते, तर रब्बी हंगामासाठी ३५२ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यंदा खरिपात ४५६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच चांगली टक्केवारी गाठल्याचे चित्र दिसून येत आहे.

यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरिपाचे ११८ कोटींचे उद्दिष्ट असताना ८०.८३ कोटींचे पीककर्ज वाटप केले. यात २७ हजार ५६८ शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले. वाटपाचे प्रमाण ६७.९३ टक्के आहे, तर राष्ट्रीयीकृत व व्यावसायिक बँकांच्या पीककर्ज वाटपाचा टक्का पहिल्यांदाच काही प्रमाणात वाढला आहे. या बँकांची उदासीनता मात्र कायम आहे. कारण ५१० कोटींचे उद्दिष्ट असताना त्यांनी २४२.४२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. यात २४ हजार ६७१ शेतकऱ्यांना कर्ज मिळाले, तर एकूण उद्दिष्टाच्या ४७.४९ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या बँकांनी ५० टक्केही उद्दिष्ट गाठले नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मात्र १०५ टक्के पीककर्ज वाटप करून जिल्ह्यात विक्रमी कामगिरी बजावली आहे. दरवर्षी याच एका बँकेमुळे पीककर्ज वाटपाची आकडेवारी समाधानकारक स्थिती गाठते असा अनुभव आहे. जिल्हा बँकेचे वाटप दरवर्षी त्याच तुलनेत असते. मात्र, ही बँक वाढीव पीककर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करीत असल्याचे दिसून येते. या बँकेला १२६.३६ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १७ हजार ८६९ शेतकऱ्यांना १३३.५० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले.

कर्जमाफीनंतरही वाटप नाही

राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीत घसघसशीत ६०० कोटी रुपये मिळविले आहेत. मात्र, २५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीनंतरही कर्जवाटप केले नाही. यंदा यातील तीन ते चार हजारजणांना कर्ज दिले. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांना नाहक खेटे मारायला लावून कर्जबाजारी केले. राष्ट्रीयीकृत बँकांनी मेळावे घेण्याचे दिलेले आश्वासनही पाळले नाही. आता रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना या बँका कर्ज देतील काय? हा प्रश्नच आहे. या बँकांना तब्बल २१० कोटींचे उद्दिष्ट रब्बीसाठी आहे.