शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पीककर्ज वाटप अखेर ६० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात ७५५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते, तर रब्बी हंगामासाठी ३५२ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ...

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात ७५५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते, तर रब्बी हंगामासाठी ३५२ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यंदा खरिपात ४५६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच चांगली टक्केवारी गाठल्याचे चित्र दिसून येत आहे.

यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरिपाचे ११८ कोटींचे उद्दिष्ट असताना ८०.८३ कोटींचे पीककर्ज वाटप केले. यात २७ हजार ५६८ शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले. वाटपाचे प्रमाण ६७.९३ टक्के आहे, तर राष्ट्रीयीकृत व व्यावसायिक बँकांच्या पीककर्ज वाटपाचा टक्का पहिल्यांदाच काही प्रमाणात वाढला आहे. या बँकांची उदासीनता मात्र कायम आहे. कारण ५१० कोटींचे उद्दिष्ट असताना त्यांनी २४२.४२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. यात २४ हजार ६७१ शेतकऱ्यांना कर्ज मिळाले, तर एकूण उद्दिष्टाच्या ४७.४९ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या बँकांनी ५० टक्केही उद्दिष्ट गाठले नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मात्र १०५ टक्के पीककर्ज वाटप करून जिल्ह्यात विक्रमी कामगिरी बजावली आहे. दरवर्षी याच एका बँकेमुळे पीककर्ज वाटपाची आकडेवारी समाधानकारक स्थिती गाठते असा अनुभव आहे. जिल्हा बँकेचे वाटप दरवर्षी त्याच तुलनेत असते. मात्र, ही बँक वाढीव पीककर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करीत असल्याचे दिसून येते. या बँकेला १२६.३६ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १७ हजार ८६९ शेतकऱ्यांना १३३.५० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले.

कर्जमाफीनंतरही वाटप नाही

राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीत घसघसशीत ६०० कोटी रुपये मिळविले आहेत. मात्र, २५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीनंतरही कर्जवाटप केले नाही. यंदा यातील तीन ते चार हजारजणांना कर्ज दिले. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांना नाहक खेटे मारायला लावून कर्जबाजारी केले. राष्ट्रीयीकृत बँकांनी मेळावे घेण्याचे दिलेले आश्वासनही पाळले नाही. आता रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना या बँका कर्ज देतील काय? हा प्रश्नच आहे. या बँकांना तब्बल २१० कोटींचे उद्दिष्ट रब्बीसाठी आहे.