शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटप अखेर ६० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात ७५५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते, तर रब्बी हंगामासाठी ३५२ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ...

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात ७५५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते, तर रब्बी हंगामासाठी ३५२ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यंदा खरिपात ४५६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच चांगली टक्केवारी गाठल्याचे चित्र दिसून येत आहे.

यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरिपाचे ११८ कोटींचे उद्दिष्ट असताना ८०.८३ कोटींचे पीककर्ज वाटप केले. यात २७ हजार ५६८ शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले. वाटपाचे प्रमाण ६७.९३ टक्के आहे, तर राष्ट्रीयीकृत व व्यावसायिक बँकांच्या पीककर्ज वाटपाचा टक्का पहिल्यांदाच काही प्रमाणात वाढला आहे. या बँकांची उदासीनता मात्र कायम आहे. कारण ५१० कोटींचे उद्दिष्ट असताना त्यांनी २४२.४२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. यात २४ हजार ६७१ शेतकऱ्यांना कर्ज मिळाले, तर एकूण उद्दिष्टाच्या ४७.४९ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या बँकांनी ५० टक्केही उद्दिष्ट गाठले नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मात्र १०५ टक्के पीककर्ज वाटप करून जिल्ह्यात विक्रमी कामगिरी बजावली आहे. दरवर्षी याच एका बँकेमुळे पीककर्ज वाटपाची आकडेवारी समाधानकारक स्थिती गाठते असा अनुभव आहे. जिल्हा बँकेचे वाटप दरवर्षी त्याच तुलनेत असते. मात्र, ही बँक वाढीव पीककर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करीत असल्याचे दिसून येते. या बँकेला १२६.३६ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १७ हजार ८६९ शेतकऱ्यांना १३३.५० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले.

कर्जमाफीनंतरही वाटप नाही

राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीत घसघसशीत ६०० कोटी रुपये मिळविले आहेत. मात्र, २५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीनंतरही कर्जवाटप केले नाही. यंदा यातील तीन ते चार हजारजणांना कर्ज दिले. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांना नाहक खेटे मारायला लावून कर्जबाजारी केले. राष्ट्रीयीकृत बँकांनी मेळावे घेण्याचे दिलेले आश्वासनही पाळले नाही. आता रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना या बँका कर्ज देतील काय? हा प्रश्नच आहे. या बँकांना तब्बल २१० कोटींचे उद्दिष्ट रब्बीसाठी आहे.