शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

 पं.स.तील पडसाद जि.प.त उमटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:25 IST

जिल्हा परिषदेत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना व काँग्रेसमध्ये कळमनुरी पंचायत समितीच्या उपसभापती निवडीवरून शीतयुद्धाचा भडका उडाला आहे. पं.स.तील राजकारणाचे पडसाद जि.प.त उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना व काँग्रेसमध्ये कळमनुरी पंचायत समितीच्या उपसभापती निवडीवरून शीतयुद्धाचा भडका उडाला आहे. पं.स.तील राजकारणाचे पडसाद जि.प.त उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मोट बांधून सत्ता स्थापन केली आहे. याच कारणाने कळमनुरी पंचायत समितीत सेनेकडून कोणताच धोका होणार नाही, अशा भाबड्या आशेवर काँग्रेसची मंडळी होती. मात्र सेनेने काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला असा तडका दिला की, वरिष्ठ राजकीय मंडळींच्याही भुवया उंचावल्या. तसेही पंचायत समितीला फारसा निधी वा नवी कामे करण्याला कोणताच वाव उरला नसल्याने येथे पदाधिकारी होण्यात कुणाला फारसा रस नसतो. केवळ प्रतिष्ठेसाठी काहीजण या पदाला महत्त्व देतात. कळमनुरी पंचायत समितीत झालेला प्रकार नेमका यापैकी कोणत्या प्रकारात गणती करावा, हे कळण्यास मार्ग नाही. ज्या गटाला शिवराणी नरवाडे यांच्या रुपाने जि.प. अध्यक्षपद मिळाले. त्याच गटाच्या गणातील अजय सावंत हे उपसभापती झाले. विशेष म्हणजे सावंत यांचा जि.प.त अध्यक्षांच्या माध्यमातून प्रभाव होता. त्यामुळे पंचायत समितीत पदाधिकारी होण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.या प्रयत्नांमुळे मात्र भविष्यात काँग्रेस व सेनेतील संबंध ताणले जाण्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराबाबत तूर्त कोणी जाहीरपणे बोलत नसले तरी खट्टू झालेली मने घेवून ही मंडळी सोबत राहून एकमेकांना पाण्यात पाहील, हे तेवढेच खरे. विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा जि.प.तच हा संघर्ष वाढल्यास नवल नाही.मुटकुळेही ठामचएकीकडे काँग्रेस व शिवसेनेत बेबनाव निर्माण होत असताना भाजपाचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनीही दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे ही कामे थांबली आहेत. त्यामुळे भाजपाही या अंतर्गत कलहाचा फायदा घेण्यास सज्ज असल्याचे दिसत आहे. या कामांबाबत काही सरपंचांनी दबावगट तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आ.मुटकुळे यांनी दाद दिली नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण