शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

निवडून आलेले सदस्य आरक्षणानुसार नसल्याने पाच गावांमध्ये पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

हिंगोली : जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये विविध संवर्गातून उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, ...

हिंगोली : जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये विविध संवर्गातून उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, निकालानंतर ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने पाच गावांमध्ये पेच निर्माण झाला असून, दोन गावांमध्ये अद्यापही संभ्रम दिसूून येत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर २८ व २९ जानेवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये हिंगोली तालुक्यातील उमरा, खडकद बु. (अनुसूचित जाती महिला), देवठाणा (अनुसूचित जमाती), खांबाळा (अनुसूचित जाती महिला) आरक्षण जाहीर झाले आहे, तसेच वसमत तालुक्यातील कुरुंदवाडी येथे (अनुसूचित जमाती महिला)साठी आरक्षित झाले आहे. या गावांमध्ये आरक्षणानुसार सदस्य निवडून आले आहेत. मात्र, सरपंच आरक्षणामध्ये त्या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने किंवा पुरुष निवडून आले असताना महिलेसाठी जागा सोडण्यात आली आहे. यामुळे सरपंच निवडीचा पेच निर्माण होणार आहे. जिल्हास्तरावरून ८ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान सरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. नियोजित दिवशी सरपंच, उपसरपंचाची गावनिहाय निवड केली जाणार आहे. यावेळीही सरपंचपदाचे आरक्षण व उमेदवारांकडे असलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या आधारे निवड होणार आहे. यामुळे ऐन निवडीच्या दिवशीही पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या गावांमध्ये पेच

हिंगोली तालुक्यातील खांबाळा व वसमत तालुक्यांतील कुरुंदवाडी याठिकाणी सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये कुरुंदवाडी येथे या आरक्षणाची महिला निवडून आली नसल्याने उपसरपंचाची निवड केली जाणार आहे, तसेच खांबाळा याठिकाणी अनुसूचित जाती महिलेसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे.

पुढे काय होणार

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. यासंदर्भात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ८ ते १७ फेब्रुवारीदरम्यान तारखा निश्चित केल्या आहेत. आरक्षणानुसार उमेदवार निवडून न आल्यास त्याठिकाणी सरपंच, उपसरपंच, नियम व अधिनियम १९६० च्या कलम ३० नुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सरपंच निवडीची प्रक्रिया घेण्यात येणार आहे.