शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होताना दिसून येत आहे. दोन ...

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होताना दिसून येत आहे. दोन महिन्यांपासून हिंगोली रेल्वेस्टेशनवरुन तीन एक्सप्रेस सुरु असून त्या रेल्वेचेही आरक्षण करावे लागत आहे.

२३ मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने केंद्राच्या आदेशाप्रमाणे सर्व पॅसेंजर रेल्वे बंद केलेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात मालसेलू, वसमत, धामणी, नांदापूर, बोल्डा, सिरली, चोंडी, मरसूल आदी छोटे रेल्वेस्थानक आहेत. प्रवाशांना बसने प्रवास करणे परवडत नाही. मागील नऊ महिन्यांपासून प्रवाशांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. अशा स्थितीत राज्य शासनाने प्रवाशांच्या सोयीकरकता आणि त्यांच्या खिशाला चाट बसू नये याकरीता एस. टी. भाड्यात कपात करुन प्रवाशांची गैरसोय दूर करायला पाहिजे. एकंदर नऊ महिन्यांपासून प्रवाशांची तारांबळ होत आहे.

गरीब प्रवाशांच्या खिशाला चाट

कोरोना संसर्ग पसरु नये यासाठी रेल्वे विभागाने मार्च महिन्यापासून सर्वच पॅसेंजर रेल्वे बंद केल्या आहेत. एस. टी. महामंडळाचा प्रवास गरिबांना परवडणारा नाही. त्यामुळे दूधवाले, चारा नेणारे, रोजंदारी करणारे मजूर हे हमखास रेल्वेने प्रवास करत होते. परंतु, आज सर्व गरिबांना बस किंवा अवैध वाहतुकीचा सहरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ होत आहे.

तीन एक्सप्रेस सुरू

कोरोना आजार कमी झाला नसला तरी रेल्वे विभागाने तीन एक्सप्रेस हिंगोली स्थानकावरुन सुरु केलेल्या आहेत. यामध्ये अमरावती ते तिरुपती, श्रीगंगानगर ते नांदेड आणि सिकंदराबाद ते जयपूर या एक्प्रेसचा समावेश आहे. पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याचा कोणताही संदेश नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रवासी रेल्वे सुरु करणे आवश्यक

प्रवाशांची होत असलेली तारांबळ आणि होत असलेला खर्च पाहता ते परवडेनासा झाला आहे. हिंगोली येथून दोन रेल्वे सुरु होत्या. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे सुरु होणे आवश्यक आहे.