शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होताना दिसून येत आहे. दोन ...

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होताना दिसून येत आहे. दोन महिन्यांपासून हिंगोली रेल्वेस्टेशनवरुन तीन एक्सप्रेस सुरु असून त्या रेल्वेचेही आरक्षण करावे लागत आहे.

२३ मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने केंद्राच्या आदेशाप्रमाणे सर्व पॅसेंजर रेल्वे बंद केलेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात मालसेलू, वसमत, धामणी, नांदापूर, बोल्डा, सिरली, चोंडी, मरसूल आदी छोटे रेल्वेस्थानक आहेत. प्रवाशांना बसने प्रवास करणे परवडत नाही. मागील नऊ महिन्यांपासून प्रवाशांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. अशा स्थितीत राज्य शासनाने प्रवाशांच्या सोयीकरकता आणि त्यांच्या खिशाला चाट बसू नये याकरीता एस. टी. भाड्यात कपात करुन प्रवाशांची गैरसोय दूर करायला पाहिजे. एकंदर नऊ महिन्यांपासून प्रवाशांची तारांबळ होत आहे.

गरीब प्रवाशांच्या खिशाला चाट

कोरोना संसर्ग पसरु नये यासाठी रेल्वे विभागाने मार्च महिन्यापासून सर्वच पॅसेंजर रेल्वे बंद केल्या आहेत. एस. टी. महामंडळाचा प्रवास गरिबांना परवडणारा नाही. त्यामुळे दूधवाले, चारा नेणारे, रोजंदारी करणारे मजूर हे हमखास रेल्वेने प्रवास करत होते. परंतु, आज सर्व गरिबांना बस किंवा अवैध वाहतुकीचा सहरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ होत आहे.

तीन एक्सप्रेस सुरू

कोरोना आजार कमी झाला नसला तरी रेल्वे विभागाने तीन एक्सप्रेस हिंगोली स्थानकावरुन सुरु केलेल्या आहेत. यामध्ये अमरावती ते तिरुपती, श्रीगंगानगर ते नांदेड आणि सिकंदराबाद ते जयपूर या एक्प्रेसचा समावेश आहे. पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याचा कोणताही संदेश नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रवासी रेल्वे सुरु करणे आवश्यक

प्रवाशांची होत असलेली तारांबळ आणि होत असलेला खर्च पाहता ते परवडेनासा झाला आहे. हिंगोली येथून दोन रेल्वे सुरु होत्या. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे सुरु होणे आवश्यक आहे.