शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ...

कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

ग्रामपंचायत निडणुकीसाठी २४ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी एकही अर्ज भरला नाही. तर दुसऱ्या दिवशी १७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीतच तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने उमेदवार व पॅनलप्रमुख ऑनलाइन अर्ज भरण्यात गुंतले आहेत. कागदपत्रे जमा करण्यात उमेदवारांचा वेळ जात आहे. तसेच प्रत्येक पॅनल प्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. कोणाला कोणत्या वाॅर्डात उभे करावे याची चाचपणी करण्यात येत आहे.

१ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांना मात्र सातवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सरपंचाचे आरक्षणही शासनाने रद्द केल्यामुळे उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत आहे. गावातील चावडी, चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या गप्पांना चांगलेच उधाण आले आहे. प्रत्येक गावांत दोन-तीन पॅनल होत आहेत. उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांचा चांगलाच कस लागत आहे. इच्छुक मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला जात आहे. तुमची साथ असेल तर आम्ही उमेदवारी अर्ज भरतो असे मतदारांजवळ सांगताहेत. मतदार मात्र सर्वांनाच हो म्हणून वेळ निभावून नेत आहेत.

कोरोनाच्या भीतीचा ग्रामीण भागात विसर पडलेला असून कोणीही सामाजिक नियमांचे पालन करीत नाहीत. सामाजिक अंतर पाळल्या जात नाही, मास्कचा वापर होत नाही, कोरोना ग्रामीण भागात हद्दपार झाला काय? या आविर्भावात नागरिक वावरत आहेत. पॅनलप्रमुखांकडून मात्र अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. प्रत्येक पॅनल प्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. दिवसा वीज व इंटरनेटच्या अडथळ्यांमुळे उमेदवार आपले नामनिर्देशनपत्र रात्रीच्या वेळी भरत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये नेटवर्कचा खोडा निर्माण होत आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस उरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता सोमवारपासून तहसील कार्यालयात चांगलीच गर्दी राहणार आहे. निवडणुकीच्या गप्पांना ग्रामीण भागात चांगलेच उधाण आले आहे. थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पाही चांगल्याच रंगात आलेल्या आहेत. शेकोट्या पेटवून त्याच्या सभोवती बसून ग्रामस्थ निवडणुकीच्या गप्पा करीत आहेत. प्रत्येक पॅनलप्रमुख आपलेच उमेदवार निवडून येतील असे सांगत आहेत. आता सगळ्यांच इच्छुकांना निवडणुकीच्या ताेंडावर गाव विकासाची चिंता लागलेली आहे. तसेच मतदारांना आपणच गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो, असे पॅनलप्रमुख व इच्छुक उमेदवार सांगत आहेत.