शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ...

कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

ग्रामपंचायत निडणुकीसाठी २४ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी एकही अर्ज भरला नाही. तर दुसऱ्या दिवशी १७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीतच तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने उमेदवार व पॅनलप्रमुख ऑनलाइन अर्ज भरण्यात गुंतले आहेत. कागदपत्रे जमा करण्यात उमेदवारांचा वेळ जात आहे. तसेच प्रत्येक पॅनल प्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. कोणाला कोणत्या वाॅर्डात उभे करावे याची चाचपणी करण्यात येत आहे.

१ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांना मात्र सातवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सरपंचाचे आरक्षणही शासनाने रद्द केल्यामुळे उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत आहे. गावातील चावडी, चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या गप्पांना चांगलेच उधाण आले आहे. प्रत्येक गावांत दोन-तीन पॅनल होत आहेत. उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांचा चांगलाच कस लागत आहे. इच्छुक मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला जात आहे. तुमची साथ असेल तर आम्ही उमेदवारी अर्ज भरतो असे मतदारांजवळ सांगताहेत. मतदार मात्र सर्वांनाच हो म्हणून वेळ निभावून नेत आहेत.

कोरोनाच्या भीतीचा ग्रामीण भागात विसर पडलेला असून कोणीही सामाजिक नियमांचे पालन करीत नाहीत. सामाजिक अंतर पाळल्या जात नाही, मास्कचा वापर होत नाही, कोरोना ग्रामीण भागात हद्दपार झाला काय? या आविर्भावात नागरिक वावरत आहेत. पॅनलप्रमुखांकडून मात्र अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. प्रत्येक पॅनल प्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. दिवसा वीज व इंटरनेटच्या अडथळ्यांमुळे उमेदवार आपले नामनिर्देशनपत्र रात्रीच्या वेळी भरत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये नेटवर्कचा खोडा निर्माण होत आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस उरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता सोमवारपासून तहसील कार्यालयात चांगलीच गर्दी राहणार आहे. निवडणुकीच्या गप्पांना ग्रामीण भागात चांगलेच उधाण आले आहे. थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पाही चांगल्याच रंगात आलेल्या आहेत. शेकोट्या पेटवून त्याच्या सभोवती बसून ग्रामस्थ निवडणुकीच्या गप्पा करीत आहेत. प्रत्येक पॅनलप्रमुख आपलेच उमेदवार निवडून येतील असे सांगत आहेत. आता सगळ्यांच इच्छुकांना निवडणुकीच्या ताेंडावर गाव विकासाची चिंता लागलेली आहे. तसेच मतदारांना आपणच गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो, असे पॅनलप्रमुख व इच्छुक उमेदवार सांगत आहेत.