शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

विहीर व साहित्याचे १३१७ पैकी ५३५ लाभार्थी टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे लांबलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांतीतील विहिरींसह इतर साहित्याची लॉटरी ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे लांबलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांतीतील विहिरींसह इतर साहित्याची लॉटरी निघाली. शिवाय अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतही विहिरी मंजूर झाल्या. मात्र अर्धवट कागदपत्रांमुळे १३१७ पैकी ५३५ लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ रद्द होण्याची भीती आहे.

विशेष घटकच्या विहिरींसह सर्वच विहिरींचा लाभ आता डीबीटीवर आला आहे. ही डीबीटीची प्रक्रिया करण्यासाठी मागच्या वर्षी निवडच झाली नाही. एक वर्ष विलंबाने कार्यवाही झाली. आता निवड झालेल्या लाभार्थ्यांना कोरोनात विविध कागदपत्रे न मिळाल्याने अर्धवट कागदपत्रांवरही लॉटरीमध्ये संधी मिळाली. मात्र या लाभार्थ्यांनी मागील महिनाभरापासून याद्या लागूनही उर्वरित कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करण्याची तसदी घेतली नाही. त्यातच अनेक शेतकरी पेरणीच्या कामात अडकल्याने त्यांना हे करणे शक्य झाले नाही. मात्र आता त्यातून उसंत मिळाली असल्याने त्यांनी ही माहिती सादर करणे अपेक्षित आहे. यासाठी आधी महिन्याचीच मुदत दिली होती. मात्र कोरोना व पेरणीचा काळ असल्याने पुन्हा कागदपत्रे सादर करण्यास मुदत दिली आहे. जर आता ही कागदपत्रे सादर नाही झाली तर या लाभार्थ्यांचा लाभ रद्द करून प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी दिली जाण्याची भीती आहे.

काय आहेत अडचणी?

या योजनेत लाभ मिळाल्याचेच अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. काहींनी आपला मोबाइल क्रमांक टाकण्याऐवजी इतरांचा अथवा सुविधा केंद्राचा क्रमांक टाकला. त्यामुळे त्यांना संदेश मिळाला नाही. पंचायत समितीत याद्या लावल्या तरीही त्या कुणी पाहिल्या नाहीत. शिवाय काहींना अजूनही कागदपत्रेच गोळा करता आली नाहीत.

योजनानिहाय स्थिती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

निवडलेले लाभार्थी ७२९

त्रुटीतील अर्ज ३५९

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

निवडलेले लाभार्थी १७३

त्रुटीतील अर्ज ७०

राष्ट्रीय कृषी विकास योजना (एसटी)

निवडलेले लाभार्थी १२८

त्रुटीतील अर्ज २३

राष्ट्रीय कृषी विकास योजना (एससी)

निवडलेले लाभार्थी २८७

त्रुटीतील अर्ज ८३

यापूर्वीचीही रक्कम रखडली

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना कामे पूर्ण करण्यासाठी पावसाची अडचण येऊ नये म्हणून धडपड चालविली आहे. मात्र कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देयकेच सादर केली जात नसल्याने लाभार्थी हैराण आहेत. या ठिकाणी कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते. तर ही देयके आता सादर झाल्याचे कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.

इतर साहित्याचाही मोठा लाभ

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विहिरींचे ४१, डिझेल इंजिनचे १३, पंपसेटचे ८, पीव्हीसी पाईपचे १९, विहीर दुरुस्तीचे ७१ व सौरपंपांचे १६ लाभार्थी आहेत. तर डॉ.आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत नवीन विहिरीचे ३३१, वीज जोडणीचे ३२, विहिरीतील बोअरचे ६२, पंपसेटचे ७७ व जुनी विहीर दुरुस्तीचे २२७ लाभार्थी आहेत. तर राष्ट्रीय कृषी विकासमध्ये फक्त नवीन विहिरीचाच लाभ मिळतो.

असा मिळतो लाभ

या योजनेत नवीन विहिरीसाठी २.५ लाख, विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५० हजार, विद्युत पंप घेण्यासाठी २० हजार, सौर कृषिपंप अथवा नवीन वीज जोडणीसाठी ३० हजारांपर्यंतचा लाभ देण्यात येतो. एका लाभार्थ्यास एकाचवेळी लाभ देण्यात येतो.

शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी

शेतकऱ्यांना पहिल्यांदाच ऑनलाइन अर्ज करून विहिरींसह इतर बाबी मंजूर झाल्या. मात्र कोरोनात अनेकांना कागदपत्रांची अडचण असल्याने तसेच अर्ज स्वीकारले. आता उर्वरित कागदपत्रे न सादर केल्यास लाभ रद्द होऊ शकते. सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ ही कागदपत्रे दाखल करावीत, असे आवाहन जि.प.चे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी केले.