शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

विहीर व साहित्याचे १३१७ पैकी ५३५ लाभार्थी टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे लांबलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांतीतील विहिरींसह इतर साहित्याची लॉटरी ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे लांबलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांतीतील विहिरींसह इतर साहित्याची लॉटरी निघाली. शिवाय अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतही विहिरी मंजूर झाल्या. मात्र अर्धवट कागदपत्रांमुळे १३१७ पैकी ५३५ लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ रद्द होण्याची भीती आहे.

विशेष घटकच्या विहिरींसह सर्वच विहिरींचा लाभ आता डीबीटीवर आला आहे. ही डीबीटीची प्रक्रिया करण्यासाठी मागच्या वर्षी निवडच झाली नाही. एक वर्ष विलंबाने कार्यवाही झाली. आता निवड झालेल्या लाभार्थ्यांना कोरोनात विविध कागदपत्रे न मिळाल्याने अर्धवट कागदपत्रांवरही लॉटरीमध्ये संधी मिळाली. मात्र या लाभार्थ्यांनी मागील महिनाभरापासून याद्या लागूनही उर्वरित कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करण्याची तसदी घेतली नाही. त्यातच अनेक शेतकरी पेरणीच्या कामात अडकल्याने त्यांना हे करणे शक्य झाले नाही. मात्र आता त्यातून उसंत मिळाली असल्याने त्यांनी ही माहिती सादर करणे अपेक्षित आहे. यासाठी आधी महिन्याचीच मुदत दिली होती. मात्र कोरोना व पेरणीचा काळ असल्याने पुन्हा कागदपत्रे सादर करण्यास मुदत दिली आहे. जर आता ही कागदपत्रे सादर नाही झाली तर या लाभार्थ्यांचा लाभ रद्द करून प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी दिली जाण्याची भीती आहे.

काय आहेत अडचणी?

या योजनेत लाभ मिळाल्याचेच अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. काहींनी आपला मोबाइल क्रमांक टाकण्याऐवजी इतरांचा अथवा सुविधा केंद्राचा क्रमांक टाकला. त्यामुळे त्यांना संदेश मिळाला नाही. पंचायत समितीत याद्या लावल्या तरीही त्या कुणी पाहिल्या नाहीत. शिवाय काहींना अजूनही कागदपत्रेच गोळा करता आली नाहीत.

योजनानिहाय स्थिती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

निवडलेले लाभार्थी ७२९

त्रुटीतील अर्ज ३५९

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

निवडलेले लाभार्थी १७३

त्रुटीतील अर्ज ७०

राष्ट्रीय कृषी विकास योजना (एसटी)

निवडलेले लाभार्थी १२८

त्रुटीतील अर्ज २३

राष्ट्रीय कृषी विकास योजना (एससी)

निवडलेले लाभार्थी २८७

त्रुटीतील अर्ज ८३

यापूर्वीचीही रक्कम रखडली

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना कामे पूर्ण करण्यासाठी पावसाची अडचण येऊ नये म्हणून धडपड चालविली आहे. मात्र कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देयकेच सादर केली जात नसल्याने लाभार्थी हैराण आहेत. या ठिकाणी कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते. तर ही देयके आता सादर झाल्याचे कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.

इतर साहित्याचाही मोठा लाभ

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विहिरींचे ४१, डिझेल इंजिनचे १३, पंपसेटचे ८, पीव्हीसी पाईपचे १९, विहीर दुरुस्तीचे ७१ व सौरपंपांचे १६ लाभार्थी आहेत. तर डॉ.आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत नवीन विहिरीचे ३३१, वीज जोडणीचे ३२, विहिरीतील बोअरचे ६२, पंपसेटचे ७७ व जुनी विहीर दुरुस्तीचे २२७ लाभार्थी आहेत. तर राष्ट्रीय कृषी विकासमध्ये फक्त नवीन विहिरीचाच लाभ मिळतो.

असा मिळतो लाभ

या योजनेत नवीन विहिरीसाठी २.५ लाख, विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५० हजार, विद्युत पंप घेण्यासाठी २० हजार, सौर कृषिपंप अथवा नवीन वीज जोडणीसाठी ३० हजारांपर्यंतचा लाभ देण्यात येतो. एका लाभार्थ्यास एकाचवेळी लाभ देण्यात येतो.

शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी

शेतकऱ्यांना पहिल्यांदाच ऑनलाइन अर्ज करून विहिरींसह इतर बाबी मंजूर झाल्या. मात्र कोरोनात अनेकांना कागदपत्रांची अडचण असल्याने तसेच अर्ज स्वीकारले. आता उर्वरित कागदपत्रे न सादर केल्यास लाभ रद्द होऊ शकते. सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ ही कागदपत्रे दाखल करावीत, असे आवाहन जि.प.चे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी केले.